छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानांचा वध करताना वापरलेली वाघ नखांच्याबाबत शंका घेणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर म्हणून मुंबई भाजपाच्या वतीने ‘शंकेखोरांचा कोथळा बाहेर काढणारच – वाघ नखांच्या निमित्ताने’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते डॉ. राहुल …
Read More »अंबादास दानवे यांचा आरोप, सरकारने हाफकीनचे पैसे रखडवले… विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
सरकारने २०२२- २३ या काळात एक रुपयांचीही औषध खरेदी केली नसल्यामुळे राज्यात औषध तुटवडा निर्माण झाला असून एकप्रकारे सरकार जनतेच्या जीवाशी खेळतेय, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत सरकारवर केला आहे. पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, हाफकीन जीव औषध निर्माण …
Read More »ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच, तर शिंदे गटाचा ? दसरा मेळाव्या आडून पुनर्मिलनाची शक्यता
परंपरागत शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर पार पडत आला आहे. मात्र गतवर्षी शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड पुकारत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १३ खासदारांनी वेगळी चूल मांडली. त्यानंतर मागील वर्षी आणि यंदाच्यावर्षीही उद्धव ठाकरे यांच्याकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली असतानाही पुन्हा …
Read More »आदित्य ठाकरे यांचा भाजपावर निशाणा, आमदार विकत घ्यायला पैसै, मात्र रूग्णालयासाठी पैसे नाहीत नांदेड येथील रूग्णालयातील मृत्यूवरून सरकारला करून दिली आठवण
राज्यातील दोन तीन जिल्ह्यात मृत्यू संख्या वाढल्याचे दिसत होत त्याला काही कारण असू शकतात पण यात राजकारण न करता मार्ग काढावे लागतील. हेच डीन, डॉक्टर, नर्स असताना कोरोना काळात जगाने आपल कौतुक केले. हे उध्दव ठाकरे यांनी सांगितलं. काय कमी राहत आहे याची कारणं शोधावे लागेल असे युवासेना नेते आदित्य …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल, घरात बसून सरकार चालवणाऱ्यांना बोलण्याचा काय अधिकार? चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल
ज्यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुकवरून सरकार चालवले त्यांना रजेच्या मुख्यमंत्र्यांवर बोलण्याचा अधिकार आहे काय असा सवाल आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला अडीच वर्षे घरात बसून होते ते आज प्रश्न विचारतात हे म्हणजे उद्धवा अजब तुझा कारभार असा टोलाही बावनकुळे यांनी ठाकरे …
Read More »अहिंसावादी महात्मा गांधी यांच्या जयंती दिवशीच पोलिसांकडून बळाचा वापर मै भी गांधी इंडिया आघाडीची पदयात्रा पोलिसांनी रोखली
आज दोन ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. या जयंतीचे औचित्य साधत केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारच्या धोरण आणि मनमानी पध्दतीच्या कारभारा विरोधात इंडिया आघाडीच्या काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, समाजवादी पार्टी आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्ये आणि नेत्यांनी मै भी गांधी ही पदयात्रा काढली. परंतु, सदरची पदयात्रा फॅशन स्ट्रीटजवळ पोहोचताच …
Read More »आदित्य ठाकरे यांची टीका, न्यायाला उशीर करणं फक्त आमच्यावर नाही तर… ट्विट करत केला राहुल नार्वेकर यांच्यावर वार
लोकसभा निवडणूका जवळजवळ येत आहेत. तसे राज्यातील अपात्र आमदारांबाबतचा निकाल लांबविण्याचे काम सुरु असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून सातत्याने करण्यात येत आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वेळकाढूपणा करत आहेत असा ठपकाही ठेवण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ट्विटकरून निशाणा साधला. यावेळी …
Read More »अनिल परब यांचा सवाल, आम्ही काय प्रत्येक वेळी सर्वोच्च न्यायालयातच जायचं का? विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाईवर ठाकरे गटाचा आरोप
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर पक्षांतरबंदी कायदा आणि आमदार अपात्रतेचे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेले. सुनावणीनंतर न्यायालयाने संबधित यंत्रणेवर ताशेरे ओढत बंडखोर आमदारांच्या अपात्रते बाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी योग्य वेळेत घ्यावा असे सांगितल्यानंतरही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी करत प्रत्येक वेळी आम्ही …
Read More »शिंदे गटाचे संजय शिरसाट म्हणाले, आजची सुनावणी पुर्ण पण… वेळापत्रक जाहिर करून त्यानुसार सुनावणी घेणार
राज्यातील महत्वाच्या असा सत्तासंघर्ष आणि शिवसेना फुटीप्रश्नी महत्वाच्या असलेल्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात केली. यावेळी शिंदे गटाच्या आमदारांचे वकिल आणि काही आमदार प्रत्यक्ष सुनावणीला उपस्थित होते. तसेच आज एकाच दिवसात सुनावणीचा निर्णय अपेक्षित धरण्यात आला होता. परंतु आज सुनावणीत मोठा निर्णय होण्याऐवजी पुढील …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राहुल नार्वेकर यांची पहिली प्रतिक्रिया… निकालाची कागदपत्रे हाती आल्यानंतर बोलेन
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंबंधी निर्णय घेण्यासंबधी वेळेची मर्यादा दिलेली नाही याचा अर्थ न्यायालयाचा अवमान करणे असा होत नाही अशा कडक शब्दात आज सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुनावलं आहे यावर आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही विधानसभा …
Read More »
Marathi e-Batmya