पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केलेला ११ कलमी नमो शासकिय योजना म्हणजे बोलघेवडेपणा असून राज्य सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अवास्तव उदात्तीकरण सुरू असल्याची जोरदार टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या योजनांपैकी बहुतांश योजना …
Read More »सर्वोच्च न्यायालयाची नाराजीः विधानसभाध्यक्षांनी दोन आठवड्यात निर्णय घ्यावा शिवसेना अपात्रतेच्या निर्णयावर राहुल नार्वेकर यांना फटकारले
राज्यातील सत्तासंघर्षावरील आमदार अपात्रता आणि शिवसेना पक्ष नावासह चिन्ह या मुद्द्यावरुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काहीच कारवाई केली नसल्याच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावरील सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन आठवड्यात आमदार अपात्रतेच्याबाबत निर्णय घेऊन त्याबाबतची सगळी प्रक्रिया न्यायालयास सांगावी असे …
Read More »अंबादास दानवे यांचा टोला, मागील फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतील घोषणा अजूनही अपूर्णच ४१ हजार कोटींच्या घोषणा अद्यापही अपूर्णच
२०१६ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठक झाली होती.या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी ४१ हजार कोटी रुपयांचा कालबद्ध कार्यक्रम घोषित करण्यात आला होता.परंतु यामध्ये घेण्यात आलेले निर्णय अजूनही अपूर्ण असल्याची माहिती पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज दिली.सध्याच्या सरकारमध्ये फडणवीस हे सुपर सीएमच्या भूमिकेत आहेत …
Read More »अपात्रतेच्या मुद्दाप्रकरणी शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांना दोन आठवड्यांची मुदत विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती
आमदारांच्या अपात्रतेसंबंधी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतलेल्या सुनावणीत काही निर्णय होईल अशी अपेक्षा होती, मात्र या प्रकरणी आमदारांना दोन आठवड्यांचा अवधी वाढवून मिळाला आहे. या मुदतवाढीसाठी न मिळालेल्या कागदपत्रांबरोबरच गणेशोत्सवाचे कारण पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या तरी अपात्रतेची टांगती तलवार असणाऱ्या आमदारांना गणपती पावला असे म्हटले जात …
Read More »सत्तेत असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याची उद्धव ठाकरेंची इच्छा नव्हती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची टीका
अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी काहीही न करणारे उद्धव ठाकरे सध्या आरक्षण विषयावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पातळी सोडून टीका करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आपण स्वतः त्याच भाषेत उत्तर देऊ, असे केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी गुरूवारी सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयात …
Read More »संजय राऊत म्हणाले, बनावट फुल लावून काही होणार नाही… मार्शल्सच्या गणवेशावर भाजपाचे कमळ चिन्ह
संसदेच्या विशेष अधिवेशना दरम्यान संसद कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर भाजपाचे कमळ चिन्ह मुद्रीत केले जाणार आहे. या मुद्द्यावर काँग्रेसने मोदा सरकारवर टीका केली आहे. आता याच मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बनावट फुल लावून काही होणार नाही अशा शब्दात भाजपावर सडकून टीका केली. संजय राऊत यांनी, मोदी सरकारने संसदेतील …
Read More »अनिल परब म्हणाले, ते १६ आमदार अपात्र ठरणार शिवसेना ठाकरे गटाकडून दावा कायम
गुरुवारपासून मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरु होणार आहे पक्षांतर्गत बंदी बाबत सर्व असलेले नियम आता स्पष्ट आहेत. यामुळे सध्या सरकार वाचवण्यासाठी वेळ काढूपणा सुरु असून हे १६ आमदार अपात्र होणार असल्याचा दावा करतानाच भाजपने सरकार वाचविण्यासाठीच राष्ट्रवादीत फूट घडवून आणली असा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला …
Read More »संजय राऊतांच्या भेटीनंतर बबनराव घोलप एक पाऊल मागे उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय स्पष्ट होणार
नाशिकमध्ये शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप शिर्डी मधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. मात्र भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रवेशामुळे नाराज होत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, बबनराव घोलप यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी एक पाऊल मागे घेतल्याचे सांगण्यात येत …
Read More »उद्धव ठाकरे यांची टीका, शिवसेनेची स्थापना कमळाबाईला पालखीत… भाजपा आणि शिंदे गटावर केली सडकून टीका
शिवसेनेतील फुटीर गटाकडून आणि भाजपाकडून सातत्याने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शिवसेनेची काँग्रेस केल्याचा आरोप सातत्याने करण्यात येतो. त्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, २५ वर्षे ज्यांच्यासोबत राहिलो त्यांनी आतापर्यंत आमची दोस्तीच पाहिली. मात्र आता आमच्या मशालीची धगही सोसा असा गर्भित इशारा भाजपाला देत २५ …
Read More »उद्धव ठाकरे यांचा टोला, सरकार आपल्या दारी दुष्काळ उरावरी…. अहमद नगरच्या दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली टीका
काल मी असं ऐकलं की वीमा कंपन्यांना २५ टक्के रक्कम देता येतेय का ते पाहा, असं सरकारने सांगितलं. पण २५ टक्के कुठून काढलंत आपण. १०० टक्के नुकसान झाल्याचं दिसतंय, तिथे पंचनामे कधी करणार? पाऊस लागला तर सरकार म्हणेल की पाऊसच पाऊस चहुकडे. अशा परिस्थितीत सरकार आपल्या दारी आणि दुष्काळ उरावरी …
Read More »
Marathi e-Batmya