२४ तासापूर्वी शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या १६ आमदारांवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या गटाकडून अपात्रतेच्या कारवाईचा बडगा उगारला होता. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही लढाई लढली गेली. मात्र ती अद्याप अनिर्णित स्थितीत आहे. तर दुसऱ्याबाजूला उध्दव ठाकरे यांच्या समर्थक असलेल्या आमदारांची संख्याही १६ आहे. आता या १६ …
Read More »एकनाथ शिंदे बंड; ३ ऱ्या अंकाचा शेवट उध्दव ठाकरे यांच्या पद आणि आमदारकीच्या राजीनाम्याने त्यांना त्यांचा आनंद पेढे खाऊन घेवू द्या कोणीही आडवे येणार नाही
राज्यातील शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयाचा धक्कादायक निकालानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आमदारकी आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार आज कोसळले. ज्या शिवसैनिकांनी त्यांच्या विजयाचा गुलाल उधळला त्याच शिवसैनिकांच्या रक्ताने मुंबईचे रस्ते रंगविणार होतात का असा सवाल करत सूरतहून …
Read More »तीन तासाहून अधिक काळ सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद, मात्र मविआला धक्का राज्यपालांच्या आदेशानुसार बहुमत सिध्द करावे लागणार
बहुमत सिध्द करण्याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत सिध्द करण्यासंदर्भात दिलेल्या आदेशाच्या विरोधात शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याप्रकरणी तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुर्यकांत आणि जे.पी. पर्डीवाला यांनी याप्रकरणी तब्बल तीन तासाहून अधिक काळ सर्व याचिकाकर्त्यांची मते ऐकून घेतली. त्यानंतर अखेर महाविकास आघाडी सरकारने उपस्थित …
Read More »अखेर राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री आले मंत्रालयात बघ्या कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी गर्दी
राज्यात साधारणतः अडीच वर्षापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ उध्दव ठाकरे यांनी घेतल्यानंतर पहिल्यांदाच मंत्रालयात आले होते. त्यावेळी त्यांच्या प्रवेशाच्यावेळी प्रवेश द्वारापासून ते मंत्रालय इमारतीच्या आत मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत मंत्रालयातील कर्मचाऱ्यांकडून उध्दव ठाकरे यांना पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. मात्र त्यानंतर आता राज्यातील राजकिय अस्थिर वातावरणात जवळपास मधला काही अपवादात्मक स्थिती वगळता …
Read More »अस्थिर राजकिय परिस्थितीवर अमोल मिटकरी म्हणाले, अजून बरंच काही… राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबाबत व्यक्त केला संशय
राज्यात शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेवून सांगितले. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले. या आदेशाच्या विरोधात राज्य सरकार आणि शिवसेनेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत दाद मागितली. …
Read More »उध्दव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितले, माझ्या विरोधात मतदान करणाऱ्यांना बघायचाय काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबरील बैठकीत केली भूमिका स्पष्ट
राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सुरु केलेल्या कारवाईप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. तसेच त्यासंदर्भातील सुनावणी अद्याप प्रलंबित असतानाच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज अचानक महाविकास आघाडी सरकारला आपले बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले. त्यामुळे निर्माण झालेल्या पेच प्रसंगावर शिवसेना, …
Read More »राज्यपालांच्या आदेशानंतर शिवसेना सर्वोच्च न्यायालयात, निर्णय संध्याकाळी कागदपत्रे तयार करून सादर करा
राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडाळीच्या पार्श्वभूमीवर आणि सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर काल रात्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीहून परतल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत राज्य सरकार अल्पमतात आल्याचे सांगत बहुमत सादर करण्याची मागणी केली. या मागणीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तात्काळ दखल महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिध्द करण्याचे आदेश …
Read More »एकनाथ शिंदे बंड; २ रा अंक संपण्याच्या आधीच ३ रा सुरु फडणवीस यांच्या भेटीनंतर राज्यपाल कोश्यारी यांचे बहुमत सिध्द करण्याचे आदेश
राज्यातील महाविकास आघाडी मधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधातच मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकाविला. या बंडात सहभागी झालेल्या १६ आमदारांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने विधानसभा उपाध्यक्षांनी अपात्रतेची नोटीस बजाविल्यानंतर त्याविरोधात शिंदे गटाने भाजपाच्या मदतीने एकप्रकारे स्थगिती मिळविली. मात्र या न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच राज्यपाल भगतसिंग …
Read More »चंद्रकांत खैरेचा खोचक टीका, तो खर्च टरबुजाने केला की कुणी केला? राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने ७,००० कोटी रुपये खर्च केले
गुवाहाटीतील बंडखोर आमदारांना ७,००० कोटी रुपये देण्यात आले असा आरोप शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी करत तसेच हा खर्च टरबुजाने केला की कुणी केला? असा सवाल उपस्थित शिवसैनिकांना केला. यावर शिवसैनिकांनी टरबुजाने केला असं उत्तर दिले. यावर खैरेंनी टरबुजाने खर्च केला असा आरोप करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे …
Read More »एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमागे नेमके कोण? काँग्रेसने घेतले पहिल्यादांच नाव काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतले सूत्रधाराचे नाव
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडखोरीच्या मागे नेमके कोण याविषयीच्या चर्चा महाराष्ट्रातील घराघरात रंगल्या आहेत. मात्र या बंडखोरीमागे नेमके कोण याविषयी आतापर्यंत राजकारणात तरी कोणीही कोणत्याही पक्षाचे नाव अथवा भाजपाच्या नेत्याचे नाव घेतले नाही. मात्र काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडामागील व्यक्तीचे नाव घेतले. त्यामुळे राजकिय वर्तुळात …
Read More »
Marathi e-Batmya