Tag Archives: varsha gaikwad

आता १ ते १० वी मराठी विषय राहणारच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावी इयत्तेत मराठी भाषा हा विषय येत्या शैक्षणिक वर्षांपासून अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज येथे विधानसभेत दिली. राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याबाबत  शिवसेनासदस्य मंगेश कुडाळकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला …

Read More »

विद्यार्थ्यांचे १६ शुल्क सरकार भरणार बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई: प्रतिनिधी विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागासप्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी आता 16 इतर शुल्कांचा समावेश केला असून त्याचे अनुदान अनुदानित व विनाअनुदानित/ कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळणार असल्याची माहिती बहुजन कल्याण विभागाचे (ओबीसी) मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. सन 2005-06 पासूनच्या …

Read More »

मुंबईसाठी १२४ कोटींच्या वार्षिक प्रारुप आराखड्यास मान्यता पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी मुंबई शहर जिल्ह्याच्या सन 2020-2021 च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या १२४ कोटी ११ लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास व नियतव्ययास वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री अस्लम रमजान अली शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वाढविण्यासाठी वित्त मंत्री …

Read More »

राज्यातील शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम सुरु करा शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांची सूचना

मुंबई: प्रतिनिधी शासनातर्फे शाळांना अनुदान दिले जाते मात्र, अशा शाळांमधून देखील दर्जेदार शिक्षण दिले जाते आहे का हे तपासावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करत बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षण पद्धतीत बदल होणे आवश्यक असून राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘व्हर्च्युअल क्लासरुम’ उभारण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने तातडीने सादर करावा असे स्पष्ट निर्देश …

Read More »

अनुसूचित जाती-जमातीच्या कायद्यासाठी ८ जानेवारीला विशेष अधिवेशन राखीव जागांच्या कायद्याच्या समर्थनासाठी

मुंबईः प्रतिनिधी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३४ मधील अनुसूचित जाती-जमातीच्या संदर्भातील राखीव जागांबाबत अनुसमर्थन करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन ८ जानेवारी २०२० रोजी बोलवावे, असेही मंत्री परिषदेच्या बैठकीत ठरल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली. जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेले अनुभवी आणि उत्तम नेते आज आपल्या राज्य मंत्रिमंडळात असून ही एक …

Read More »

विद्यमान मंत्रिमंडळात तिन्ही पक्षांची घराणेशाहीच मुख्यमंत्र्यांचा मुलगा कॅबिनेट, तर खासदाराची मुलगी राज्यमंत्री

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. मात्र या विस्तारात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे चिंरजीव आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्री म्हणून स्थानापन्न झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते सुनिल तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात यांचे भाचे तनपुरे यांची राज्यमंत्री म्हणून …

Read More »

काँग्रेसकडून चव्हाण, थोपटे आणि गायकवाड यांची नावे निश्चित लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

मुंबई-नवी दिल्लीः प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार २७ डिसेंबर पूर्वी करण्याचा निर्णय शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची यादी जवळपास निश्चित मानली जात असताना काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पुण्याच्या भोर तालुक्यातील संग्राम थोपटे आणि मुंबईतील धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांची नावे …

Read More »

राहुल गांधीही १३ तारखेला मुंबईत भाजप शिवसेना सरकारच्या कामाचा करणार पंचनामा

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ काँग्रेस नेते राहुल गांधी हे ही १३ ऑक्टोंबरला मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. या एकाच दिवशी ते लातूर जिल्ह्यातील औसा, मुंबईतील चांदिवली आणि धारावी येथे त्यांची काँग्रेस उमेदवारांसाठी प्रचारसभा होणार आहे. मुंबईतील दोन मतदारसंघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नसीम खान, वर्षा …

Read More »

राज्यात भयंकरस्थिती तर मुख्यमंत्री मत मागतायत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य सचिव अजोय मेहता यांची भेट

मुंबई: प्रतिनिधी गेल्या पाच सहा दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे भयंकर पूरस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक गावेच्या गावे, घरे, संसार, शाळा, कॉलेजेस, रस्ते सर्वच उध्वस्त झालेले आहे. सगळीकडे पाणीच पाणी साचल्याने महाराष्ट्रातील जनता भयभीत झालेली आहे. महाभयंकर परिस्थिती ओढवली आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पनवेल, संपूर्ण कोकण, नाशिक, …

Read More »

एल्गार मोर्चाचे विधानसभेत पडसाद भिडेला पाठीशी घालत असल्याचा विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी भिमा कोरेगांव प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे या दोघांची नावे एफआयआर मध्ये आहेत. त्यातील मिलिंद एकबोटे याला अटक करण्यास अडीच महिने लागतात. तर संभाजी भिडे सगळीकडे फिरत असून पत्रकार परिषदा घेवून वावरतो. मात्र राज्य सरकारला तो सापडत नाही. यावरून राज्य सरकार भिडे यास पाठीशी घालत असल्याचे …

Read More »