राज्यात महायुती सरकारचे बहुमतात सरकार आले. या सरकार आल्यावर परभणी आणि बीड इथे घडलेल्या घटना या राज्याला काळीमा फासणाऱ्या आहेत. राज्यात गुंडांना संरक्षण देण्यासाठी बहुमत मिळाले का असा सवाल आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज विरोधकांनी पायऱ्यांवर परभणी आणि बीड प्रकरणी आंदोलन केले. त्यानंतर कामकाज …
Read More »नाना पटोले यांची मागणी, बीडमध्ये दोन वर्षात ३२ हत्या, उच्च न्यायालयाच्या मार्फत चौकशी करा सरकारला अधिवेशनात जाब विचारु, सरकारने पळ काढू नये
नागपूर अधिवेशनात विदर्भातील समस्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे परंतु सरकारने केवळ पाच दिवसांचे अधिवेशन ठेवल्याने विदर्भातील जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या विदर्भात होत आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही, शेतमालाची खरेदी केंद्रे सुरु नाहीत. बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे, या सर्व महत्वाच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे. राज्यातील जनतेच्या प्रश्नावर …
Read More »शेतकरी विरोधी, दलितांवर अत्याचार करणारे व दिवसा ढवळ्या खून करणारे सरकार सत्तेवर सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर महाविकास आघाडीचा बहिष्कार
शेतकरी विरोधी, दलितांवर अत्याचार करणारे व दिवसा ढवळ्या खून करणारे हे सरकार असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत प्रथेप्रमाणे राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतल्याची माहिती विधान परिषदेचे शिवसेना उबाठाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज दिली. नागपूरात उद्या सोमवारपासून …
Read More »प्रियांका गांधी यांचा हल्लाबोल, नरेंद्र मोदींच्या राजवटीत…फक्त उद्योगपती अदानीच सेफ काँग्रेस सरकारने भेदभाव न करता सर्व राज्यांचा विकास केला, भाजपा सरकारकडून मात्र महाराष्ट्राशी भेदभाव
विधानसभेच्या निवडणुकीच्या भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी एक हैं तो सेफ हैं चा नारा देत आहेत. सेफ म्हणजे सुरक्षित पण नरेंद्र मोदींच्या ११ वर्षातील राजवटीत देशातील शेतकरी, कामगार, महिला, वा तरूण कोणाही सेफ नाही जर कोणी सेफ असेल तर ते फक्त उद्योगपती गौतम अदानीच आहेत, असा हल्लाबोल अखिल …
Read More »राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूरात ‘संविधान संमेलन’ विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची माहिती
भारताचे संविधान हेच सर्वोच्च आहे. मनुस्मृती विरोधात काँग्रेसची लढाई सुरुच आहे. त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी लढा उभारणे काळाची गरज आहे. हा लढा अधिक बुलंद करण्यासाठी विदर्भातील सामाजिक संस्थानी नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात संविधान संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याची माहिती विधानसभा …
Read More »काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहिरः मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी, सोनिया गांधी नांदेड पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणूकीसाठी ४० स्टार प्रचारक
राज्यातील विधानसभा निवडणूकीची घोषणा झाली असून २९ ऑक्टोंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज उमेदवारी अर्जाची छाणणी करण्यात आली असून आजच्या दिवशी अनेक उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. महाराष्ट्रात विधानसभेबरोबरच राज्यातील नांदेड पोट निवडणूकही जाहिर करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसकडून ४० नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून यादी जाहिर …
Read More »काँग्रेसची ४थी यादी १४ उमेदवारांच्या नावाची घोषणाः काँग्रेस-शिवसेना उबाठा समोरासमोर सोलापूरात शिवसेनेचा उमेदवार आणि काँग्रेसचाही उमेदवार
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने काल जाहिर केलेल्या यादीनंतर आज संध्याकाळी पर्यंत चवथी यादी जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली होती. त्यानुसार १४ उमेदवारांची यादी रात्री ९ ते ९.३० च्या दरम्यान काँग्रेसने जारी केली. काँग्रेसने यावेळी अंमळनेरमधून डॉ अनिल नाथू शिंदे यांना उमेदवारी जाहिर केली असून …
Read More »समाजवादी गणराज्य पक्षाचे कपिल पाटील यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि सतेज बंटी पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश
लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत शिक्षक भारती संघटनेचे प्रमुख तसेच जनता दल संयुक्तचे प्रदेशाध्यक्ष कपिल पाटील यांनी जनता दल संयुक्तचा राजीनामा देत नव्या समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापना केली. मात्र आता स्वतःच स्थापन केलेल्या पक्षाचा त्याग करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सतेज बंटी पाटील आदी …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, मविआच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचे भाजपा-शिंदे सेनेचे षडयंत्र महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक अधिका-यांची भेट
विधानसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक झाली पाहिजे, मतदान वाढले पाहिजे असे निवडणूक आयोग सांगत असते पण निवडणूक आयोगाच्या कामातच पारदर्शकता व निष्पक्षपातीपणा दिसत नाही. सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर अधिकारी काम करत आहेत. ऑनलाईन फॉर्म ७ च्या माध्यमातून मविआच्या मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून वगळली जात आहेत, यामागे एकनाथ शिंदे व …
Read More »नाना पटोले यांची टीका, मोदी-शाहांनी लुटले, काँग्रेसचा ‘प्रचाररथ’ लुटीची माहिती… मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी रुपये व ५ लाख रोजगार गुजरातने पळवले
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेत काँग्रेस पक्षाने भाजपा युती सरकारच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारा चित्ररथ बनवला आहे. महाभ्रष्ट युती सरकारने मोदी शाह यांच्या आदेशानुसार गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठवले आहेत. राज्यातील ७.५ लाख कोटी रुपये व ५ लाख रोजगार गुजरातने पळवले आहेत. नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी महाराष्ट्राला …
Read More »
Marathi e-Batmya