राज्यपालांनी आता प्र.कुलगुरू- परिक्षा नियंत्रक आणि कुलसचिवांची नियुक्ती करावी शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू संजय देशमुख यांच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर होण्यास वेळ लागला. तसेच त्याच्या फटका अनेक विद्यार्थ्यांना बसू लागल्याच्या विरोधात शिवसेनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी देशमुख यांना कुलगुरू पदावरून हटवित नवे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची नियुक्ती केल्याबद्दल राज्यपालांचे आभार मानत आता विद्यापीठाच्या प्र.कुलगुरु-परिक्षा नियंत्रक, कुलसचिव पदीही नव्याने नियुक्ती करावी अशी मागणी करत उपकेंद्रामध्ये सुरु असलेला गोंधळही आवरावा अशी मागणी शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांनी एका जाहीर प्रसिध्दी पत्रकान्वये राज्यपालांकडे केली.

यावेळी त्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचे अभिनंदन केले.

युवासेनेने केलेल्या आंदोलनानंतर, या आधीच्या कुलगुरूंना हटवण्यात आले होते. नव नियुक्त कुलगुरू यांच्यावर जबाबदारी मोठी आहे, विद्यापीठाचा भोंगळ कारभार आवरण्याची. चांगल्या कामांसाठी युवासेना त्यांच्या पाठीशी उभी राहील असे आश्वासनही त्यांनी दिले.

तसेच विद्यापीठाच्या कारभारावर देखील आमची नजर असणारच असे सांगत आज जसे कुलगुरू नियुक्त झाले, तसेच लवकरात लवकर प्र. कुलगुरू परिक्षा नियंत्रक (Pro VC, Controller of Examination) आणि कुलसचिव (Registrar) आदींची नियुक्ती करावी अशी मागणी करत  उपकेंद्रामधील (sub centers) चा गोंधळ आवरावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

About Editor

Check Also

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला गुरू तेग बहादूर यांच्या कार्याचा गौरव केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत खारघरमध्ये गुरु तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहीद समागम सोहळा संपन्न

“धर्मासाठी शिर दिले पण तत्त्वांशी तडजोड केली नाही, हा आदर्शच आजच्या भारताला दिशा देणारा आहे,” …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *