सुप्रिया सुळे यांचा आरोप, राज्यात गुन्हेगारीत वाढ, हे गृहमंत्र्यांचे अपयश महाराष्ट्रातला क्राईम वाढला, अगोदर नागपूर केंद्र असायचं आता पुणे

गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात आणि जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रामध्ये देखील गुन्हेगारीच्या घटनांत वाढ झाली आहे. पोर्शे कार अपघात, ड्रग्ज, आणि महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे मी नव्हे तर केंद्र सरकारचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे हे पूर्णपणे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, राज्यात आज अतिशय गंभीर परिस्थिती असून पुण्यात सातत्याने क्राईम वाढत आहे. मी आरोप करत नाही हा डेटा सांगतो आहे, हा केंद्र सरकारचा डेटा असेल. महाराष्ट्रात क्राईम वाढला आहे, अगोदर नागपूर केंद्र असायचं आता पुणे आहे. आधी नागपूर क्राईम कॅपिटल होते आता पुणे होत आहे, अशा शब्दात पुण्यातील गुन्हेगारीवरुनही राज्य सरकार आणि गृहमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्र सरकार काय करते? महाराष्ट्राचे गृहमंत्री काय करतात? सातत्याने हे सुरू आहे. या राज्यात सर्व सावळा गोंधळ सुरू आहे. २०० आमदारांचे सरकार आहे, पण तुमच्या आणि माझ्या पदरात काय पडले, विकास कोणाचा केला या सरकारने ? महाराष्ट्राचा आज देशात नंबर खाली जायला लागला आहे, असा आरोपही यावेळी केला.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, मुंबईत आदर्श सोसायटीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा हात आहे. असा आरोप भाजपाने केला. सातव्या दिवशी ते भाजपमध्ये गेले आणि पंधराव्या दिवशी ते भाजपाचे खासदार झाले. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टवादी पक्ष म्हणाले. मोदींनी राज्य सहकारी बँक आणि जलसंपदा विभागातील घोटाळ्याचे आरोप केला होता. मात्र घडलं काय, ज्यांच्यावर आरोप केले आज ते भाजपामध्ये आहेत. त्यामुळं भाजपा म्हणजे वॉशिंग मशीन झालेली आहे. भाजपा म्हणजे भ्रष्टाचार जुमला पार्टी असल्याचा आरोपही केला.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष अगोदर लोकांवर आरोप करतात, त्यानंतर त्यांचा भाजपा किंवा मित्र पक्षात प्रवेश घेतात आणि नंतर मंत्री, आमदार किंवा खासदार पदावर बसतात. भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारांची टोळी आहे. रवींद्र वायकर हे भ्रष्टाचारी आहेत की नाही याचे उत्तर फक्त देवेंद्र फडणवीस देऊ शकतात. कारण ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहे. महाराष्ट्रातले जे आमदार खासदार आज महायुती बरोबर आहेत, ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सिद्ध झाले नाही. खरं काय खोटं काय याची एक पारदर्शक श्वेतपत्रिका या राज्याने मागितली पाहिजे. नक्की भ्रष्टाचारी कोण, या राज्यात भ्रष्टाचार कोण करत आहे, असा सवाल करत केंद्रीय संस्थांचा तपास मागे लावायचा, नंतर वॉशिंग करायचं आणि पक्षात घ्यायचं अशी खोचक टीकाही यावेळी केली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यातील महायुतीचे सरकार हे म्हणजे “मुन्नाभाई एमबीबीएस सरकार” आहे. महागाई, बेरोजगारी आणि भष्टाचारी वाढवणारे सरकार आहे या सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचे काय हाल आहे हे आपण सर्व पाहतच आहेत. दुधाला, साखरेला काय भाव आहे हे आपल्याला माहीतच आहे त्यामुळे ऑक्टोंबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर हे एमबीबीएस सरकार जाणार आहे असे भाकितही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा सल्ला, ‘उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा’ रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा

आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे आवश्यक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *