इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी बुधवारी सांगितले की, आपल्या सर्वोच्च सुरक्षा अधिकाऱ्याचा मृत्यू होऊनही इराणचा लढा सुरूच राहील. कतारच्या अल जझीरा या वृत्तवाहिनीशी बोलताना अराघची म्हणाले, “एका व्यक्तीच्या उपस्थितीचा किंवा अनुपस्थितीचा इराणच्या राजकीय आणि आर्थिक रचनेवर परिणाम होत नाही.”
आखात्यातील युद्धाला तीन आठवडे पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना, अमेरिका-इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख अली लारीजानी यांच्या मृत्यूनंतर अराघची यांनी ही टिप्पणी केली. युद्धाच्या सुरुवातीपासून दिसून येत असलेल्या इराणच्या संरक्षण धोरणाचे शिल्पकार मानले जाणारे लारीजानी, तेहरानजवळ त्यांच्या मुलीच्या घरावर झालेल्या हवाई हल्ल्यात त्यांचा मुलगा, उपप्रमुख आणि अंगरक्षकांसह ठार झाले.
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायलने सुरू केलेल्या लष्करी आक्रमणाच्या पहिल्याच दिवशी माजी सर्वोच्च नेते, अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूशी तुलना करत सय्यद अब्बास अराघची म्हणाले, “(सर्वोच्च) नेते शहीद झाले, तरीही यंत्रणेने आपले काम सुरूच ठेवले,” असे ते म्हणाले.
दोहास्थित वृत्तवाहिनीशी बोलताना, सय्यद अब्बास अराघची यांनी मध्य-पूर्वेतील संघर्षासाठी अमेरिकेला जबाबदार धरले आणि पुढे म्हटले की, मानवी आणि आर्थिक नुकसानीसाठी वॉशिंग्टनला जबाबदार धरले पाहिजे.
इराणच्या परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी पुढे सांगितले की, अणुशस्त्रांच्या विकासाविरोधातील इराणच्या भूमिकेत लक्षणीय बदल होणार नाही. परंतु त्यांनी सावध केले की, इराणचे नवीन सर्वोच्च नेते, मोजतबा खामेनी यांनी अद्याप या विषयावर आपले मत व्यक्त केलेले नाही.
माजी सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांनी २००० च्या दशकाच्या सुरुवातीला जारी केलेल्या फतव्याद्वारे, म्हणजेच धार्मिक आदेशाद्वारे, सामूहिक संहारक शस्त्रांच्या विकासाला विरोध केला होता.
अमेरिका आणि इस्रायलसह पाश्चात्य देशांनी अनेक वर्षांपासून तेहरानवर अण्वस्त्रे मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला, तर इराणी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की त्यांचा अणुकार्यक्रम केवळ नागरी उद्देशांसाठी आहे असा स्पष्ट खुलासा केला.
सय्यद अब्बास अराघची पुढे म्हणाले की, मध्य-पूर्वेकडील देशांना युद्ध संपल्यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीसाठी एक नवीन करारनामा तयार करण्याचे आवाहन केले. सय्यद अब्बास अराघची पुढे म्हणाले की, असा करारनामा इराणी आणि प्रादेशिक हितसंबंधांना हानी न पोहोचवता या अरुंद जलमार्गातून सुरक्षित मार्ग सुनिश्चित काढू शकतो.
सय्यद अब्बास अराघची यांनी पुढे सांगितले की, इराणने हा महत्त्वाचा ऊर्जा मार्ग बंद केला आहे, ज्यातून जागतिक तेल आणि द्रवीकृत वायूचा पाचवा भाग जातो. इराणने म्हटले आहे की, ते अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या भागीदारांपर्यंत “एक लिटर तेलसुद्धा पोहोचू देणार नाही”.
मंगळवारी, इराणच्या संसदेच्या अध्यक्षांनी ट्विट केले की होर्मुझच्या सामुद्रधुनीची परिस्थिती युद्धापूर्वीच्या स्थितीत परत येणार नाही.
अमेरिकेने या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांना संरक्षण देण्यासाठी नौदल आघाडी तयार करण्याचा प्रयत्न केला आहे, तर बहुतेक नाटो मित्र राष्ट्रांनी इराणविरुद्धच्या लष्करी कारवायांमध्ये सामील होऊ इच्छित नसल्याचे म्हटले आहे.
इराणच्या वरिष्ठ राजदूताने असेही म्हटले की, २८ फेब्रुवारीपासून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाल्यासच युद्ध संपुष्टात येऊ शकते.
Marathi e-Batmya