कृषी

‘ब्लॅक राईस’ उत्पादनाचा राज्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी शेतकरी गटामार्फत ७० एकर क्षेत्रावर उत्पादन

पूर्व विदर्भातील पारंपरिक पद्धतीने भात शेती कमी उत्पादनामुळे किफायतशीर ठरत नसल्यामुळे कमी दिवसात जास्त उत्पादन देणाऱ्या भात पिकांच्या रोवणीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्यात प्रथमच औषधी गुणधर्म असलेल्या ‘ब्लॅक राईस’ (काळा तांदूळ) उत्पादनाला प्रोत्साहन दिल्यामुळे जिल्ह्यातील ७० एकर क्षेत्रावर ‘ब्लॅक राईस’चा प्रयोग यशस्वी ठरला आहे. या धानाला मोठ्या प्रमाणात काळ्या लोंब्या(ओंबी) …

Read More »

२५ हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कृषी पंपाचे वाटप करणार १ लाख सौर कृषी पंपाच्या योजनेस शासनाची मान्यता

मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत १ लाख शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचे वाटप करण्यात येणार आहे. साधारणतः ३ वर्षात ही योजना राबविण्यात येणार असून १ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांचे दिवसा वीज पुरवण्याचे स्वप्न या योजनेमुळे पूर्ण केले जाणार आहे. या योजनेसाठी शासन ३ वर्षात ८५८.७५ …

Read More »

तूर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची देय रक्कम तातडीने देण्यात यावी पणन मंत्री सुभाष देशमुख यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी तूर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची देय असलेली रक्कम पणन महासंघाने तातडीने देण्यात यावी असे स्पष्ट निर्देश पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी येथे दिले. हंगाम 2018-19 मधील हमीभावाने मूग, उडिद व सोयाबीनच्या खरेदी संदर्भातील पूर्व नियोजनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.योगेश म्हसे, वखार …

Read More »

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा कवठा गाव गहाण ठेवणार उस्मानाबाद जिल्ह्यातील कवठा गावातील गावकऱ्यांचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्याना आर्थिक संकटाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारने केली. तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोण थांबत नसल्याने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील कवठा गावच्या गावकऱ्यांनी आपले गावच गहाण ठेवण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतल्याची माहिती सेवाग्राम स्कूल ऑफ नेचर अँण्ड कल्चरचे विनायकराव पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी …

Read More »

भूजल अधिसूचना राज्यातील शेतकऱ्यांना संकटात नेणारी! स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कडाडून विरोध

मुंबई : प्रतिनिधी नुकत्याच जाहीर केलेल्या महाराष्ट्र भूजल अधिसूचनेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध दर्शविला आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या या नियमावलीची तातडीने अंमलबजावणी केल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार असल्याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे. तसेच, या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी असणाऱ्या तोकड्या व अकार्यक्षम यंत्रणेमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागेल, …

Read More »

मुहूर्त पाहून द्राक्षबागेच्या छाटण्या घेणे कितपत योग्य ? द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांनी विचार करावा असा अभिजित झांबरे यांचा लेख

सध्या द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांची द्राक्षबागेच्या आगाप तसेच ऑक्टोबर पीक छाटणी घेण्याच्या दृष्टीने लगबग सुरु झाली आहे. परंतु ही सर्व तयारी करीत असताना आपल्याकडील बऱ्याच शेतकऱ्यांचा मुहूर्त पाहून छाटण्या घेण्यावरच अधिकत्तर भर असलेला दिसून येतो. आता मुहूर्त पाहून छाटण्या घेणे हा ज्याचा-त्याचा श्रध्देचा भाग आहे. याबाबत कोणतीही टीका-टिप्पणी या ठिकाणी करायची नाही. …

Read More »

द्राक्ष बागायतदार संघाचे कार्य आता शेतकऱ्यांच्या शिवारात पोहचावे द्राक्षसंघाकडून शेतकऱ्यांच्या असलेल्या अपेक्षा मांडणारा अभिजित झांबरे यांचा लेख

पुणे येथे नुकत्याच झालेल्या वार्षिक अधिवेशनात महाराष्ट्र राज्य द्राक्षबागायतदार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये संघाचे नूतन अध्यक्ष म्हणून श्री. राजेंद्रदादा पवार तर उपाध्यक्ष म्हणून श्री. शिवाजी पवार यांची निवड करण्यात आली. त्याचसोबत इतर विभागवार पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. सुरुवातीस या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करीत असतानाच त्यांच्या …

Read More »

द्राक्ष हंगामाचं बिगुल वाजलंय, शेतकऱ्यांनो सावध रहा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या सुरक्षतेसाठी आवाहन करणारा अभिजित झांबरे यांचा लेख

साधारण मे, २०११ सालची गोष्ट असावी, तासगाव तालुक्यातील बिरणवाडी या गावातील द्राक्षउत्पादक शेतकरी कै.निवास महादेव मोरे यांच्या कुटुंबासोबत घडलेली ही दुर्दैवी घटना आहे. निवास मोरे हे त्यांच्या द्राक्षशेतीत काबाडकष्ट करुन आपल्या संसाराचा गाडा हाकीत होते. तसा त्यांचा कोणाशी वैरभाव नव्हता, त्यामुळे परिसरात एक चांगलं व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. एके …

Read More »

राज्यातील सोयाबीन पेंड चीन खरेदी करणार कौन्सुलेट जनरल टॅन्ग गुओकाई यांची मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा

मुंबई  : प्रतिनिधी राज्यात उत्पादित होणाऱ्या सोयाबीन पेंडच्या (De-oiled cake) (DOC) खरेदीसाठी चीन पुढे आले असून यासंदर्भात चर्चा करण्यासाठी चीनचे कौन्सुलेट जनरल टॅन्ग गुओकाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री वर्षा निवासस्थानी भेट घेतली. शेती उत्पादनांची चीनमध्ये आयात आणि या क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी चीन उत्सुक असल्याचे यावेळी कौन्सुलेट जनरल टॅन्ग …

Read More »

दूधदरवाढीच्या आंदोलनातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेणार विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूरः प्रतिनिधी राज्यातील दूधाला चांगला दर मिळावा आणि प्रतिलिटर दूधापोटी ५ रूपयांचे अनुदान शेतकऱ्याला मिळावे यासाठी सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून या हिंसाचारात खरोखरच शेतकरी सहभागी असतील तर त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील असे आश्वासन …

Read More »