मुंबई : प्रतिनिधी दूध प्रश्नावर शेतकऱ्यांची मागणी अत्यंत माफक असल्याने ती मागणी कशाप्रकारे पूर्ण करणार याबाबत चर्चेअगोदर प्रस्ताव द्यावा अशी विनंती संघर्ष समितीने राज्य सरकारला केली आहे. राज्य सरकारने सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास पुढे चर्चा केली जाईल अशी भूमिका संघर्ष समितीने घेतली असल्याचे महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले …
Read More »शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे खरीप पीक हंगाम आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुढील महिना-दीड महिना महत्वाचा असून खरीपात गुणवत्तापूर्ण बियाणे, खते पुरवठा करतानाच हंगामातील शेतकऱ्यांची आर्थिक गरज भागवण्याची आवश्यकता आहे. ज्या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळाली आहे. अशांना नव्याने कर्ज मिळते की नाही, याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार विभागाच्या यंत्रणेची मदत घेऊन खरीप पीक कर्ज …
Read More »लिटरला २७ रूपये द्या अन्यथा भाजपच्या आमदार, खासदारांना फुकट दुध देणार गरज पडल्यास शहरांचा दुध पुरवठा रोखण्याचा संघर्ष समितीचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी दुधाला सरकारने जाहीर केल्या प्रमाणे प्रतिलिटर किमान २७ रुपये भाव द्या या प्रमुख मागणीसाठी राज्यभर आंदोलनाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. जर राज्य सरकारने २७ रूपये लिटरला दुधाचा भाव न दिल्यास हेच दूध भाजपच्या आमदार आणि खासदारांना फुकट वाटप करणार असल्याचा इशारा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे …
Read More »कर्जमाफी योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी आता २० मे पर्यंतची मुदत वन टाईम सेटलमेंटसाठी ३० जून पर्यंतची मुदतवाढ
मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ज्या शेतकऱ्यांना काही कारणाने अर्ज करता आले नाहीत, त्यांच्यासाठी अर्ज करण्याची मुदत आता आणखी वाढवून २० मे २०१८ अशी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली आहे. १ मे ऐवजी आता २० मेपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. वन टाइम सेटलमेंट …
Read More »“लुटता कशाला फुकटच न्या की” म्हणत दुध उत्पादक शेतकऱ्यांचा यल्गार सात दिवस आंदोलन करण्याचा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचा इशारा
अहमदनगर : प्रतिनिधी लुटता कशाला फुकटच न्या असा संताप व्यक्त करत ग्रामसभेचा पहिला ठराव करणा-या औरंगाबाद जिल्ह्यातील लाखगंगा गावात सकाळी भजन कीर्तन करत दुध सरकारला फुकट देत ३ मे रोजी व अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनच्या पूर्वसंध्येला दगडाच्या सरकारवर दुग्धाभिषेक करून आंदोलनाची सुरुवात करण्यात येत आहे. यावेळी डॉ.अजित नवले, धनंजय धोरडे, …
Read More »शेतकरी कर्जमाफी योजनेत आता २००१ ते २००९ मधील थकित शेतकऱ्यांचा समावेश राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी मंत्रिमंडळाच्या आजच्या निर्णयानुसार १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ पर्यंत उचल केलेल्या पीक किंवा मध्यम मुदत कर्जाची ३० जून २०१६ रोजी थकित झालेल्या रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून ३१ जुलै २०१७ पर्यंतच्या मुद्दल व व्याजासह एकूण दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. तसेच इमूपालन, शेडनेट, पॉलीहाऊस यासाठी मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या थकित शेतकऱ्यांनाही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून दिलासा देण्याचा महत्त्वाचा …
Read More »तूर साठवणुकीसाठी खासगी गोदाम ताब्यात घेणार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी तूर खरेदी गोदामाअभावी अडू नये यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीतील गोदामासह जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत खासगी गोदाम ताब्यात घेण्याचे निर्देश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांना आज दिले. यावेळी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. तूर खरेदीचा आढावा आज सहकारमंत्र्यांच्या दालनात घेण्यात आला. यावेळी राज्यभरात १९१ खरेदी केंद्रावर ९ एप्रिलपर्यत २१ लक्ष ५० हजार ६४५ क्विंटल तूर …
Read More »सरकारने कर्जमाफी तर दिली, पण माहीतीच नाही दप्तरी जिल्हानिहाय माहिती शासनाकडे उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारात उघड
मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य सरकारच्यावतीने करत १४ हजार ३८८ कोटी रूपयांच्या कर्जमाफीचा लाभ ४६ लाख ५२ हजार देण्यात आला. मात्र या कर्जमाफीचा लाभ मिळविणाऱ्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय माहितीच राज्य सरकारकडे नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारात उघडकीस आली आहे. त्यामुळे …
Read More »नानाजी देशमुख कृषी संजीवनीच्या पहिल्या टप्प्यात १०११ गावांची निवड कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे प्रकाशन
मुंबई : प्रतिनिधी नानाजी देशमुख प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यातील १०११ गावांची निवड करण्यात आली असून १०६ गावांच्या कामांचे प्रत्यक्षात नियोजन करण्यात आले आहे, असे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी येथे सांगितले. या प्रकल्पाच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाचे उदघाटन कृषिमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री सदाभाऊ …
Read More »कर्जमाफी योजनेसाठी अर्ज भरण्याची तारीख आता १४ एप्रिलपर्यंत वंचित शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे सहकार मंत्री देशमुखांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ऑनलाईन अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्याची मुदत आता १४ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी अशा शेतकऱ्यांनी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले. तसेच मुद्दल व व्याजासह दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठीही …
Read More »
Marathi e-Batmya