Editor

दावोसमध्ये २ दिवसात ३ लाख ५३ हजार कोटी गुंतवणूकीचे विक्रमी सामंजस्य करार

स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य करार केले असून उद्या ४२ हजार ८२५ कोटींचे करार होत आहेत. अशा रितीने ३ लाख ५३ हजार ६७५ लाख कोटींचे विक्रमी सामंजस्य करार करीत असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज समाज माध्यमांतून …

Read More »

केंद्र सरकारच्या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना ‘डीबीटी’ मार्फत अनुदान वाटप करा

राज्याच्या विकासाची गती वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी प्रत्येक विभागाने प्रयत्न करावा. केंद्र सरकारच्या मॅचिंग ग्रँटच्या सर्व योजनांसाठी शंभर टक्के निधीची तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी सर्व योजना आधार लिंकींग …

Read More »

दावोसमधील परिषदेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईच्या माध्यमातून देशात गुंतवणूक…

महाराष्ट्रातील गावे, शहरांमध्ये आर्थिक विकासाला मोठी गती देणारे नाविन्यपूर्ण उद्योग- व्यवसाय सुरु करण्यात येतील. देशाच्या विकासासाठी मुंबईचाही कायापालट करण्यात येत असून याठिकाणी आपली गुंतवणूक करावी असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषद सुरु असून तेथील काँग्रेस सेंटर सभागृहात नागरी क्षेत्रातील आव्हाने, नाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत …

Read More »

राज्यातील १० विद्यार्थिनींना न्यूयॉर्कच्या बरो ऑफ मॅनहॅटन कॉलेजची शिष्यवृत्ती

न्यूयॉर्क येथील बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज (बीएमसीसी) या समुदाय महाविद्यालयाने सन २०२४ मध्ये महाराष्ट्रातील दहा विद्यार्थिनींना इयत्ता बारावी नंतरच्या पदवी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले आहे. या शिष्यवृत्तीमुळे महाराष्ट्रातील दहा विद्यार्थिनींना उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी न्यूयॉर्क स्थित या महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. या शिष्यवृत्तीच्या रूपाने राज्यातील विद्यार्थिनींना आंतरराष्ट्रीय शिक्षणाची …

Read More »

सुशिलकुमार शिंदेंच्या त्या वक्तव्यावरून नाना पटोले यांचे भाजपावर टीकास्त्र

सोलापूर शहरातील एका शासकिय कार्यक्रमानिमित्त उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांची भेट घेत भाजपा प्रवेशाचे आमंत्रण दिल्याची चर्चा आज दुपारपासून सुरु झाली. या सगळ्या घडामोडींवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीकास्त्र सोडत भारतीय जनता …

Read More »

अंबादास दानवे यांची मागणी, रुग्णवाहिका टेंडर निविदा रद्द करून चौकशी करा

राज्य सरकारने १०८ रुग्णवाहिकाच्या सेवेसाठी नव्याने काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठया प्रमाणात घोटाळा झाला असून या टेंडरप्रकरणी आरोग्य विभागाच्या आयुक्तांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत या टेंडरची निविदा रद्द करून निःपक्षपातीपणे याची चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली. अंबादास दानवे म्हणाले की, …

Read More »

आशिष शेलार यांचा पलटवार, जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर..!!

मुख्यमंत्रीपदासाठी “महा”कपट, “महा”धोका केला नसता; अडीच वर्षे..असं काही ठरलं नसताना ही “महा”खोटं बोलला नसता;रोज सकाळी खोटं बोलणाऱ्या “महा” शकुनीला आवरले असते तर अशी “महा” पत्रकार परिषद घेण्याची, नौटंकीची वेळ आली नसती…जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर… अश्या म्हणत मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, तलाठी भरतीची एसआयटीमार्फत चौकशी करा

पेपरफुटी झाल्यामुळे तलाठी भरतीची संपूर्ण प्रक्रीया रद्द करण्यासाठी राज्यभरात परीक्षार्थींची आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाला आमचा पाठींबा आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी सरकारने परीक्षार्थींवर गुन्हे दाखल करायला सुरूवात केली आहे. सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत. परीक्षार्थींच्या भावना लक्षात घेऊन सरकारने तलाठी पद भरती प्रक्रीया रद्द करावी. या संपूर्ण तलाठी पद भरतीची …

Read More »

राहुल नार्वेकर यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, त्यांच्या कागपत्रांमध्ये तो मुद्दाच नाही

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा गटाची महापत्रकार परिषदेत राहुल नार्वेकर आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे निकाल दिलेला नसल्याचा आरोप करत खोचक शब्दात टीका केली. त्यानंतर काही वेळातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आणि तीन क्रायटेरियानुसारच निर्णय घेतल्याचे सांगत अनिल परब …

Read More »

उद्धव ठाकरे यांची टीका, न्यायालयाच्या आदेशानुसार लवाद नव्हे तर लबाडाने…

मागील दिड वर्षापासून आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर शिवसेना कोणाची आणि कोणी शिवसेना खरी याविषयीचा निर्णय देण्याचे अधिकार न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला. त्यावरून सर्वचस्तरातून टीकेला सुरुवात झाली. दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल कायद्याच्या कसोटी बाहेरचा असल्याचा आरोप करत शिवसेना …

Read More »