Editor

महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार

मुद्रांक शुल्क न भरलेल्या किंवा नियमापेक्षा कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या अथवा नोंदणी न केलेल्या दस्तांसाठी सरकारने महाराष्ट्र शुल्क अभय योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. १ डिसेंबर २०२३ पासून ३१ जानेवारी २०२४ आणि १ फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ अशा दोन टप्प्यांत ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा जास्तीत …

Read More »

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश दिले. नागरिकांनी घाबरून …

Read More »

उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्ती योजनेत अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. या योजनेसाठी सन २०२३ -२४ या वर्षाकरिता अर्ज मागविण्यात आले होते, मात्र नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने या योजनेसाठी अर्ज करण्यास ४ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली …

Read More »

ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या मित्राची अध्यक्ष पदी वर्णीः साक्षी मलिक यांनी घेतली निवृत्ती

देशात ब्रिटीशकालीन मानसिकतेतून बाहेर पडत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर करत नव्या संसद इमारतीच्या सेंट्रल व्हिस्टाचे विधिवत हिंदू रितू रिवाजाप्रमाणे उद्घाटन केले. नेमके त्याच दिवशी नवी दिल्लीतील जंतर मंतर येथील रस्त्यावर कुस्ती पटू आणि ऑलिंपिक विजेत्या महिला कुस्तीगीरांनी भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी लैगिंक शोषण केल्याचा आरोप महांघाच्या …

Read More »

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, उपराष्ट्रपतींचा अपमान सहन करणार नाही…

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसद भवन परिसरात उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांचा अवमान करणारे असभ्य वर्तन केले आणि खासदार राहुल गांधी यांनी त्याचे चित्रण केले. सदर घटनेचा प्रखर विरोध करण्यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भारतमाता सिनेमा ते लालबाग पोलीस स्टेशन परिसरात मोर्चा काढण्यात …

Read More »

शरद पवार यांचा इशारा,…किंमत मोजावी लागेल

सरकार विरोधकांकडे दुर्लक्ष करून कारभार करण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील जनता सर्वकाही पाहत आहे. याची सरकारला जबरदस्त किंमत मोजावी लागेल असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज खासदार निलंबनाच्या मुद्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शरद पवार म्हणाले, १३ डिसेंबर रोजी लोकसभेत दोन तरुणांनी घुसखोरी केली. …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचा सभापती यांच्यावर पलटवार, …मग मी दलित कार्ड वापरायचे का?

संसद सुरक्षा भंग प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात निवेदन करावे या मागणीवरून राज्यसभेत आणि लोकसभेत प्रश्न उपस्थित केला म्हणून जवळपास १४३ खासदारांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर संसदेच्या अधिवेशन सुरु असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे संसदेच्या सभागृहात निवेदन करण्याऐवजी देशातील …

Read More »

संसद सुरक्षेच्या मुद्यावरून निलंबित खासदारांचे आंदोलन सुरुच

संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांच्या मागणीला प्रतिसाद न देता निवेदन अद्याप केले नाही. उलट विरोधकांच्या गैरहजेरीतच राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज चालविले जात आहे. या पार्श्वभूमीवर संसदेतील दोन्ही सभागृहाच्या निलंबित सदस्यांनी महात्मा गांधी पुतळ्याच्या समोर लोकशाही वाचवा अशी मागणी करणाऱे फलक …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र तर फडणवीस म्हणाले, NCRB ने फक्त …

मागील १० दिवसांपासून नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असल्याने विधानसभेत विरोधी पक्षाने मांडलेल्या २९२ अन्वयेखाली अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विरोधी पक्ष गोंधळलेला असल्याचे वक्तव्य भाषणाच्या सुरुवातीलाच केले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर जयंत पाटील …

Read More »

कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ या मराठी कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार

नामवंत लेखक व कादंबरीकार कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ कादंबरीसाठी मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला. अकादमीचे सचिव के.श्रीनिवासराव यांनी साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने, येथील कॉपर्निकसमार्ग स्थित साहित्य अकादमीच्या रविंद्र सभागृहात वर्ष २०२३ साठी साहित्य पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे …

Read More »