शेतकरी, ठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी नाशिक, बीड, नागपूर, वर्धा, बुलढाणा या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अडचणी दूर करून त्यांना सुस्थितीत आणणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सहकार्याने आवश्यक बाबतीत तातडीने कठोर पावले उचलण्यात यावीत. वित्त व नियोजन आणि सहकार विभागाने यासंदर्भात समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार …
Read More »मुंबईतील म्हाडा इमारतीत राहणाऱ्या ५० हजार रहिवाशांना दिलासा
म्हाडाच्या ५६ वसाहतीतील सहकारी गृहनिर्माण संस्थांकडील सन १९९८ ते २०२१ या कालावधीतील वाढीव सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. यामुळे सुमारे ३८०.४१ कोटींचे वाढीव सेवा शुल्क माफ होणार असून या निर्णयामुळे मुंबईतील ५० हजार सदनिकाधारांना दिलासा मिळाला असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. मंत्री अतुल सावे …
Read More »सुधाकर बडगुजर म्हणाले, व्हिडीओ मॉर्फ.., सुषमा अंधारे यांचा प्रत्यारोप, त्या पार्टीत भाजपा नेतेही…
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे संपर्क प्रमुख सुधाकर बडगुजर आणि १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलिम कुत्ता याच्यासोबत पार्टी करतानाचे फोटोग्राफ सादर करत शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधण्याचा आरोप केला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे संपर्कप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेत त्या …
Read More »नितेश राणे यांचा आरोप, बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत ठाकरे गटाच्या नेत्याची पार्टी
मागील काही महिन्यांपासून राज्यात शिवसेना ठाकरे गट आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यात चांगलेच वाक् युध्द रंगलेले आहे. तसेच या दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडत आहेत. तसेच विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर …
Read More »काँग्रेस स्थापना दिनी २८ डिसेंबरला नागपूरात काँग्रेस फुंकणार लोकसभेचे रणशिंग
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या महारॅलीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी, काँग्रेस पक्षाचे सर्व मुख्यमंत्री, वर्किंग कमिटीचे सर्व सदस्य, विधिमंडळ पक्षनेते, …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, पेमेंट गेटवे कंपनीच्या रक्कमेप्रकरणी ‘एसआयटी’ चौकशी
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये असलेल्या पेमेंट गेट वे आणि पे आऊट सुविधा देणाऱ्या एका कंपनीचे बँक खाते हॅक करून १६ हजार १८० कोटी रुपयांचा व्यवहार करण्यात आला. हा व्यवहार वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास २६० पेक्षा जास्त बँक खाती उघडून करण्यात आला आहे. यासाठी ९७ बनावट नोटराईज्ड करारनामे करण्यात आले. हे संपूर्ण प्रकरण …
Read More »आदिवासी बिर्हाड मोर्चेकऱ्यांचा प्रश्न थेट विधानसभेत … देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
धुळे नंदुरबार नाशिक जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी, कष्टकरी,बांधवाच्या विविध मागण्या आणि दुष्काळ जाहिर करावा या मागणीसाठी निघालेल्या बिर्हाड मोर्चाचा आवाज धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांनी विधानसभेत बुलंद केला. आ.कुणाल पाटील यांनी शेतकरी,कष्टकर्याच्या मागण्यांचा एल्गार विधानसभेत पुकारला. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि सत्याशोधक शेतकरी सभेचा बिर्हाड मोर्चा मुंबईत धडकण्याआधीच शासनाने मध्यस्थी करुन …
Read More »एसआरएच्या सदनिका विकण्याची मुदत मर्यादा कमी करणार
झोपडपट्टी प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडीधारक लाभार्थ्यास प्राप्त झालेली विनामूल्य सदनिका कोणत्याही प्रकारे हस्तांतरीत करण्यास दहा वर्षे कालावधीपर्यंत मनाई आहे. ही मर्यादा कमी करून सात वर्षे करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. तथापि ही मर्यादा पाच वर्षापर्यंत कमी करण्याच्या लोकप्रतिनिधींच्या मागणीसंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडला जाईल, असे गृहनिर्माण मंत्री …
Read More »कायमस्वरूपी संक्रमण शिबिरातील सदनिका प्रकल्पबाधितांकरिता देण्याबाबत मार्ग काढू
मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतील (एसआरए) बाधितांसाठी कायमस्वरूपी संक्रमण शिबिरांची (पीटीसी) आवश्यकता असते. एमएमआरडीए, महानगरपालिका आदी यंत्रणांच्या विकासकामांमुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांसाठी (पीएपी) देखील सदनिकांची आवश्यकता आहे. तथापि एसआरएला संक्रमण शिबिरांची आवश्यकता असल्याने यामधील सदनिका प्रकल्पबाधित शिबिरामध्ये रुपांतरित करून देण्याबाबत लवकरच बैठक आयोजित करून मार्ग काढण्यात येईल, असे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे …
Read More »जयंत पाटील यांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाणी वाटप करारासाठी…
दुष्काळी परिस्थितीत कर्नाटक सरकार महाराष्ट्राकडे पाणी मागते. त्यानुसार महाराष्ट्र सरकार पाणी कर्नाटकला देते. मात्र राज्याला पाणी आवश्यक असल्यास कर्नाटककडे पाणी मागितले जाते. तेव्हा कर्नाटक कडून सहजरीत्या मिळत नसल्याचा अनुभव आहे. त्यासाठी कर्नाटकसोबत कायम स्वरुपी पाणी वाटप करार करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत लक्षवेधी …
Read More »
Marathi e-Batmya