Editor

पंतप्रधान मोदी यांच्याऐवजी आता ओम बिर्ला जाणार बांग्लादेशला तारिक रेहमान यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी बिर्ला जाणार

बांग्लादेशचे नवनिर्वाचित पंतप्रधान तारिक रहमान यांच्या शपथविधी समारंभात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला १७ फेब्रुवारी रोजी ढाका येथे भारताचे प्रतिनिधित्व करतील. बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) चे अध्यक्ष रहमान हे २०२४ मध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पदच्युतीनंतर झालेल्या पहिल्या राष्ट्रीय निवडणुकीत त्यांच्या पक्षाने प्रचंड विजय मिळवल्यानंतर पदभार स्वीकारणार आहेत. बांग्लादेशने पंतप्रधान …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची माहिती, अर्थसंकल्प हा तयारी आणि प्रेरणेतून तयार केलेला एका लेखी मुलाखती दरम्यान व्यक्त केली भावना

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ हा “आता किंवा कधीच नाही” हा जबरदस्तीतून निर्माण झालेला क्षण नव्हता तर तयारी आणि प्रेरणेतून निर्माण झालेला “आपण तयार आहोत” असा क्षण होता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (१५ फेब्रुवारी २०२६) सांगितले. ते भारताची विकसित राष्ट्र बनण्याची “तत्परता” प्रतिबिंबित करतात असे प्रतिपादन करतात. एका वृत्त संस्थेला …

Read More »

भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या राड्यात ९ जण जखमी काँग्रेसचे ३, भाजपा २,कार्यकर्त्ये जखमी आणि दोन पोलिस व दोन पत्रकार जखमी

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी करण्‍याच्‍या काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानाविरोधात पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना भिडले. रविवारी (१५ फेब्रुवारी २०२६) आंदोलनादरम्यान दगडफेकीचा आरोप विरोधी पक्षाने केला. सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी पत्रकारांना सांगितले की, या हाणामारीत तीन काँग्रेस कार्यकर्ते, दोन भाजपा कार्यकर्ते, दोन पोलिस …

Read More »

दीड वर्षाच्या बलात्कार पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा पुढाकार नायर रुग्णालयातील डॉक्टरांना चिमुकलीवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश

समाजाच्या काळ्याकुट्ट बाजूचे दर्शन घडवणारी एक हृदयद्रावक घटना दहिसर रेल्वे स्थानकाजवळ १० फेब्रुवारीच्या पहाटे घडली. दीड वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करण्यात आला. रस्त्यावर फुले विकून उदरनिर्वाह करणारे आणि जवळच्याच फूटपाथवर राहणाऱ्या कुटुंबातील ही मुलगी अज्ञात व्यक्तीने पळवून नेली, तिच्यावर अत्याचार करून तिला स्थानिक मासळी बाजाराजवळील कचऱ्याच्या गटारात फेकून दिले. त्या …

Read More »

डॉ श्रीकांत शिंदे यांचे थेट आव्हान, खुमखुमी असेल तर लोकसभेत आमच्यासमोर या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेनंतर दिले आव्हान

“जर एवढीच खुमखुमी असेल तर पुढील लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा, ठाणे लोकसभा किंवा हवे त्या मतदारसंघातून आमच्यासमोर येऊन निवडणूक लढवावी.” असे थेट आव्हान खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मंत्री गणेश नाईक यांना दिले. गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर अंबरनाथमध्ये माध्यमांशी बोलताना …

Read More »

मुलुंड मेट्रो दुर्घटना: कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे निलंबित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कारवाई

मेट्रो लाईन ४ (वडाळा-कासारवडवली) मार्गावर मुलुंड येथे आज झालेल्या दुर्घटने प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत. अपघातातील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतानाच जखमींच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीए करणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एमएमआरडीए प्रशासनाकडून दुर्घटनेची माहिती घेतानाच उपमुख्यमंत्री …

Read More »

हवाला व्यवहार करणारे जम्मू आणि काश्मीरमध्ये ८ हजार मुल अकाऊंट्सचा शोध ८ हजार बँक खात्यांचा सुरक्षा यंत्रणांकडून शोधली

सुरक्षा संस्थांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये तथाकथित “मुल अकाउंट्स” चे वेगाने वाढणारे नेटवर्क उघड केले आहे जे तपासकर्त्यांना आंतरराष्ट्रीय घोटाळ्याच्या सिंडिकेटचा आर्थिक आधार असल्याचे वाटते. या खात्यांद्वारे येणारे पैसे शेवटी फुटीरतावादी किंवा देशविरोधी कारवायांना पाठिंबा देऊ शकतात अशी अधिकाऱ्यांना चिंता असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले. गेल्या तीन वर्षांत, अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रदेशात …

Read More »

राहुल गांधी यांनी भारत-अमेरिका व्यापारी करारावरून पंतप्रधान मोदींना विचारले पाच प्रश्न व्यापारी करारावरून केंद्र सरकारवर केली टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी अमेरिकेसोबतच्या व्यापारी करारावरून केंद्रावर जोरदार हल्ला चढवला आणि पुन्हा एकदा म्हटले की ते भारतीय शेतकऱ्यांना “विश्वासघात” करू शकते आणि देशाच्या कृषी सार्वभौमत्वाशी तडजोड करू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाच विशिष्ट प्रश्न उपस्थित करत त्यांनी अनुवांशिकरित्या सुधारित पिके, व्यापार नसलेले अडथळे दूर करणे आणि …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, निवडणुकीत भाजपाच्या पोस्टर्स, बॅनर्सवर टिपू सुलतानचा फोटो कसा चालतो? सावरकर व कोश्यारींनी केलेल्या वक्तव्याबदद्ल भाजपा त्यांचे पुतळे कधी जाळणार?

छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत, आन, बान, शान आहेत, त्यांचा पराक्रम अद्वितीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणेतून संविधानाची निर्मिती झाली आहे. भाजपकडून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकण्याची गरज नाही. एपस्टिन फाईल्समध्ये भाजपाच्या नेत्यांची नावे आली आहेत, अमेरिकेबरोबरचा व्यापार कराराचा मुद्दा आहे आणि राज्यातही …

Read More »

पुण्यात टीपू सुलतानवरून काँग्रेस-भाजपाचे कार्यकर्त्ये आमने-सामने भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभर निदर्शने

महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर असताना भगतसिंग कोश्यारी यांनी छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु म्हणून समर्थ रामदासाचे नाव घेतले, तसेच शिवाजी महाराज हे जून्या काळातील आदर्श होते, अशी विधाने करत मुंबईच्या उभारणीत बिगर मराठी लोकांचे योगदान जास्त असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावेळी राज्यातील भाजपाने भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात कोणतीच भूमिका घेतली नाही. …

Read More »