पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुक्रवारी ११,७१८.२४ कोटी रुपयांच्या खर्चाने २०२७ ची भारताची जनगणना Population census करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. भारतीय जनगणना Population census ही जगातील सर्वात मोठी प्रशासकीय आणि सांख्यिकीय प्रक्रिया आहे. भारताची जनगणना दोन टप्प्यात …
Read More »एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, मुंबई पागडीमुक्त सुयोग्य व न्याय्य पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली
मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसेच पागडी इमारतींचा सुयोग्य व न्याय्य पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली करण्याची ऐतिहासिक घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केली. भाडेकरू तसेच घरमालकांचा हक्क सुद्धा अबाधित ठेवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, साधारणत १९ हजारांपेक्षा जास्त सेस इमारती पागडी इमारती म्हणून …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू करा
राज्याला लाभलेला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा, निर्माणाधीन वाढवण बंदर आणि सागरी क्षेत्रातील अपार संधी लक्षात घेता २०२६ मध्ये देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधान भवन स्थित मंत्रीपरिषद सभागृहात आयोजित बैठकीत बंदरे विकास विभागाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. यावेळी मत्स्यव्यवसाय …
Read More »कोल्हापुरी चपलांच्या प्रसारासाठी प्राडा, लिडकॉम आणि लिडकार यांच्यात सामंजस्य करार पारंपारिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ
भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) आणि लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ) यांच्यात सामंजस्य करार झाला. मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात, इटली–भारत व्यापारी परिषदेनिमित्त या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. शतकांपासून वापरात असलेल्या पारंपरिक चप्पल निर्मितीच्या पद्धती, …
Read More »पंकज भोयर यांचे आश्वासन, शिक्षक बदली धोरणात महिलांना प्राधान्य देणार ग्रामविकास विभागासमवेत लवकरच बैठक घेणार
राज्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या बदल्यांमध्ये महिला शिक्षकांना प्राधान्य द्यावे, विशेषतः मुलींची संख्या अधिक असलेल्या शाळांमध्ये त्यांची नियुक्ती करावी, या संदर्भात ग्रामविकास विभागासोबत बैठक घेतली जाईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले. सदस्य अरुण लाड यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून या विषयी उपस्थित केलेल्या …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, अद्ययावत मतदार याद्या प्रसिद्ध करा मुंबईच्या मतदार याद्यांतील त्रुटी दूर करण्याची केली मागणी
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होत आहेत. परंतु मतदारयाद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहेत. या मतदार याद्यांमध्ये दुबार मतदारांची संख्या तब्बल ११ लाख असून दुबार नावे असलेल्या मतदारांना शपथपत्र द्यावे लागणार आहे. हा मतदारांना नाहक त्रास असून यामुळे मतदानासाठी मोठ्या रांगा लागतील हे सर्व टाळून मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी मतदार याद्यातील …
Read More »नाशिक कुंभमेळा बोधचिन्ह स्पर्धेसाठी २० डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याची तारीख सर्वोत्कृष्ट बोधचिन्हास मिळणार तीन लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक
श्रद्धा, पावित्र्य आणि अध्यात्माचा संगम असलेला सिंहस्थ कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणार आहे. यानिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणातर्फे बोध चिन्ह स्पर्धेचे (लोगो डिझाईन) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी आता अवघे दहा दिवस राहिले आहेत. त्यामुळे या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात …
Read More »दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन, लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही कृषी योजनांचा लाभ सर्व शेतकऱ्यांना विधान परिषदेत माहिती
राज्य शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असून कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कृषी योजनांच्या लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध योजनांचा निधी व अनुदान प्रलंबित असल्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात कृषी मंत्री भरणे यांनी ही …
Read More »मतचोरीवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात खडाजंगी राहुल गांधी यांचे चर्चेचे खुले आव्हान, तर अमित शाह यांचा काँग्रेसवर मतचोरीचा आरोप
काँग्रेस खासदार तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात मतचोरीच्या मुद्यावरून लोकसभेत जोरदार खडाजंगी झाली. राहुल गांधी यांनी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदांमधील मुद्यांवर खुल्या चर्चेचे आव्हान अमित शाह यांना दिले. तर अमित शाह यांनी काँग्रेसवरच मतचोरीचा आरोप केला. अमित शाह… है हिम्मत ❓ pic.twitter.com/kbNNlJxhnQ — Congress …
Read More »राहुल नार्वेकर यांचे सरकारला निर्देश, घेतलेला टोल परत द्या ई-वाहनांना टोलमाफीची आठ दिवसात अंमलबजावणी करा
राज्यातील ईव्ही व ई-बाइक वापरकर्त्यांना टोलमाफी देण्याबाबत पुढील आठ दिवसांत कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश देत या निर्णयाच्या अंमलबजावणी पासून आज पर्यंतच्या काळात टोल घेतला गेला असल्यास पुरावा सादर केल्यावर नागरिकांना टोल परतावा द्यावा, असे आदेश विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी दिले. ई वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय राज्य …
Read More »
Marathi e-Batmya