२०१४ पासून देशातील राजकीय चित्र बदलले असून दबावाचे, दडपशाहीचे राजकारण सुरु झाले आहे. मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याचा आवाज बंद केला जातो. देशात जुलमी ब्रिटीशांप्रमाणे राज्यकारभार सुरु असून आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हे चित्र बदलण्याची गरज आहे. मोदींचा अहंकार लोकशाहीला घातक आहे, हे अहंकारी सरकार घालवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे त्यासाठी …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी ७५ व्हर्चुअल क्लासरूमचे उद्घाटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये ७५ व्हर्चुअल क्लासरूमचे १५ ऑगस्ट २०२३ रोजी दु. १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन होणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे दूरदृष्य प्रणालीद्वारे उद्घाटन होणार आहे. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री …
Read More »त्या टीकेवरून अजित पवार यांचा सवाल, आम्ही दोघे काय मुर्ख आहोत का? नाना पटोले यांच्या त्या टीकेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संताप
नुकतेच उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील वॉर रूमच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या पाठोपाठ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा असल्याची टीका केली. त्यावरून अजित पवार यांनी पुण्यातील चांदनी चौकातील पूलाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी नाना पटोले यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न …
Read More »सर्व शासकीय रूग्णालयांमधून आता नि:शुल्क ‘उपचार’ १५ ऑगस्ट पासून अंमलबजावणी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांची घोषणा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २८ डिसेंबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना पुरविण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा, तपासणी व त्याबाबतचे शुल्क निश्चित करण्यात आले होते. यापुढे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा, तपासणीसाठी शुल्क द्यावे लागणार नाही. रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा नि:शुल्क उपलब्ध …
Read More »माजी मंत्री नवाबभाई मलिक यांना जामीन; राष्ट्रवादी काँग्रेसचा जल्लोष… मलिक यांना न्यायव्यवस्थेने दिलासा दिला त्याचा आनंद
राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री नवाबभाई मलिक यांना आज सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून आणि पेढे वाटून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे …
Read More »आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा निलंबित बनावट सह्याप्रकरणी राज्यसभेत केंद्राचा निर्णय
बनावट सह्यांच्या प्रकरणात आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. खासदार राघव चढ्ढा यांच्याविरोधात राज्यसभेत प्रस्ताव मांडला जात आहे. सभागृहात त्यांचं वर्तन अत्यंत निषेधार्ह असल्याचं भाजपा खासदारांचं म्हणणं होतं. त्यांच्यावर आता कारवाई करण्यात आली आहे. राज्यसभेचे खासदार पियुष गोयल राघव चढ्ढांवरील कारवाईवर म्हणाले, हे खूप …
Read More »अमित शाह यांनी मांडलं नवं राजद्रोह क्रिमिनल सुधारणा विधेयक मॉब लिचिंग प्रकरणी मिळणार मृत्यूदंड
ब्रिटीश राजसत्तेने त्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कारवायांना आळा घालण्यासाठी राजद्रोह कायद्याची तरतूद केली होती. या कायद्याचा वापर करत देश स्वातंत्र्य झाल्यानंतरही केंद्र सरकारकडून गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप काहीजणांनी केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याप्रश्नी सुनावणी घेताना ब्रिटीशांच्या काळातील राजद्रोह कायदा अद्याप कशासाठी ठेवला आहे अशी विचारणा केंद्र सरकारला करत हा …
Read More »सुनिल तटकरे यांची माहिती, लोकसभानिहाय दौरा आणि मंत्र्यांचा प्रदेश कार्यालयात जनता दरबार राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक प्रदेश कार्यालयात पार...
लोकसभानिहाय राज्याचा दौरा आणि राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचे जिल्हावार दौरे व नऊ मंत्र्यांचा जनता दरबार राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. राज्यात काम करणाऱ्या पदाधिकार्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी कार्यालयात बैठक पार पडली. …
Read More »कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्राला होणार या निर्णयाचा फायदा वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाची पीएम गतीशक्ती अंतर्गत शिफारस
महाराष्ट्रातील वैभववाडी-कोल्हापूर या ३४११.१७ कोटी रुपये खर्चाच्या पीएम गतीशक्ती अंतर्गत प्रस्तावित रेल्वे मार्गाची शिफारस, ५३ व्या राष्ट्रीय नियोजन गटाच्या (एनपीजी) बैठकीत करण्यात आली. उद्योग आणि व्यापार प्रोत्साहन विभागाच्या अंतर्गत (DPIIT) लॉजिस्टिक्स सचिव सुमिता दावरा यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत या रेल्वे मार्गाबाबत शिफारस करण्यात आली. या बैठकीत तीन रेल्वे प्रकल्प …
Read More »डोळे येण्याच्या संसर्गावर वारंवार हात धुण्याच्या सवयींना प्रतिबंध करा आरोग्य विभागाचे आवाहन
राज्यातील अनेक भागात ‘डोळे येणे’ या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. डोळे येणे मुख्यत्वे ॲडिनो वायरसमुळे होतो. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे या रुग्णामध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्याला सुज येणे अशी लक्षणे आढळतात. डोळे आलेल्या व्यक्तींनी स्वत:ला घरामध्ये विलगीकरण करणे गरजेचे आहे. आजाराचा संसर्ग …
Read More »
Marathi e-Batmya