Editor

आदित्य ठाकरे यांचा निर्धार, लबाड लांडगा ढ्गाव करतंय आमचे सरकार आल्याबरोबर `टोल`बंद करणार

आमचे सरकार आल्यास मुंबईतल्या दोन्ही महामार्गावरील टोल बंद करणार असल्याचे आश्वासन ठाकरे गटाचे आंदार आदित्य ठाकरे यांनी दिले. यावेळी त्यांनी दोन्ही महामार्गांचे मेंटनन्स महापालिका करते, तर टोलचा पैसा एमएसआरडीसीकडे जात असल्याचे सांगत यात मोठा घोटाळ होत असल्याचे सांगितले. आदित्य ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एमएसआरडीसीचा टोल घोटाळा उघड …

Read More »

पुढील २४ ते ४८ तासात बेस्ट ची सेवा पूर्ववत होणार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपवार पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आश्वासन

बेस्टमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था, येत्या २४ ते ४८ तासात पूर्ववत करणार असल्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मंत्रालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. यावेळी परिवहनचे प्रधान सचिव पराग जैन, बीईएसटीचे आयुक्त विजय सिंघल उपस्थित होते. बेस्टच्या ताफ्यात एकूण ३०५२ बसेस आहेत. …

Read More »

बहुजन समाजाला न्याय मिळण्यासाठी नाना पटोले म्हणाले, जातनिहाय जनगणना गरजेची जातनिहाय जनगणनेला मोदी सरकारचा विरोध, भाजपा व मोदी बहुजन समाजविरोधी..

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बहुजन समाजाचेही मोठे योगदान आहे पण आजची परिस्थिती वेगळी आहे, जे लोक स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नव्हते त्यांच्या हातात सत्ता गेली असून हेच लोक संविधान संपवण्याचे काम करत आहेत. भाजपा व मोदी सरकार हे बहुजन समाजाला फक्त मतांसाठी वापरून घेतात, अधिकार मात्र काहीच देत नाहीत. बहुजन समाजाला न्याय …

Read More »

उद्धव ठाकरे यांचे आवाहन, सुनो द्रोपदी….. मणिपूरवरून पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती, राज्यपालांवर साधला निशाणा

मणिपूर येथील हिंसाचारावरून शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मणिपूरच्या महिला राज्यपाल आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्यावर निशाणा साधला. तसेच यावेळी महिलांवर होत असलेल्या अत्याचारावरून देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनाही ठोस निर्णय घेण्याचे आवाहन करत जेव्हा परदेशात जाता तेव्हा इंडियन मुजाहिदचे प्रतिनिधीत्व करता की हिंदूस्थानचे प्रतिनिधीत्व करता असा …

Read More »

येताय ना ? भंडारदरा आणि आंबोलीत वर्षा महोत्सवाचा आनंद लुटायला पर्यटन विभागाचा १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान मान्सून फेस्टिवल

पावसाची अनेकविध रुपे आपल्याला माहित आहेत. घराच्या कौलांवरून कोसळणार्‍या सरी, अंगणात साचलेल्या डब्यात विहरणार्‍या कागदाच्या होड्या, दूर रानात पानापानावर टपटपणारा मुसळधार पाऊस आणि एका छत्रीतल्या दोन जीवांना शीलगावणारा पाऊस… पाऊस म्हणजे उत्सव, पाऊस म्हणजे धमाल… पावसाचा हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने येत्या १२ ऑगस्ट ते …

Read More »

अखेर मिटकर यांचे पितळ उघड याचिकेत करण्यात आला आरोप

झोपडपट्टी पुनर्वसन योजना गेली अनेक वर्ष सहमुख्य अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या रामभाऊ मिटकर यांच्या विरोधात अखेर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करून मिटकर यांनी मुदतवाढ मिळवण्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. पुनर्वसनाचे शेकडो प्रकल्प रखडून पडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत नागरिकांच्या विकासापेक्षा विकासक दलाल आणि पुनर्वसन …

Read More »

पंतप्रधान मोदी म्हणाले, नकारात्मक विचाराच्या बाहेर…. देशभरात पाचशे आठ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा आरंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातल्या 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची कोनशीला बसवत एक ऐतिहासिक पाऊल उचलले. २४,४७० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या पुनर्विकासात २७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 508 स्थानकांचा समावेश आहे. यात इतर काही राज्यांसह उत्तर प्रदेश आणि राजस्थानातील प्रत्येकी 55, बिहार मधील ४९, महाराष्ट्रातील …

Read More »

अमित शाह यांना गुपचूप भेटल्याची जोरदार चर्चा; जयंत पाटील यांची स्पष्टोक्ती,… त्यात काय विशेष आपण शरद पवार यांच्या बंगल्यावर होतो; गेलो तर तुम्हाला सांगणारच

नुकतेच विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपले. या अधिवेशनाच्या शेवटच्या एक दिवस किंवा त्या आधी भर विधानसभेत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक नंबर आणि दोन नंबर उपमुख्यमंत्री कोण असा सवाल करत दोन्ही उपमुख्यमंत्ऱ्यांचे लक्ष नसन्यावरून अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. त्याच ४८ तासही …

Read More »

अमित शाह म्हणाले, अजितदादा हीच तुमची योग्य जागा, तर अजित पवार म्हणाले, …जरा जास्त प्रेम सहकार विभागाच्या पोर्टलच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकाच मंचावर

समस्त भारतीय आणि विशेषत: भारतीय राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांचा आज पुणे जिल्ह्यात केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेल्या केंद्रीय निबंधक सहकारी संस्था (CRCS) कार्यालय या पोर्टलचे अनावरण करण्यासाठी पुण्यात आले. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आवर्जून उल्लेख …

Read More »

अजित पवार यांनी उदघाटनवेळी आवाहन करताना म्हणाले, व्यायाम करा, डोळ्यांची काळजी घ्या…. राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्यावतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून निर्णयाचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना होणार आहे, असे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले. स्व. आमदार …

Read More »