काल विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनाकाळात मृत पावलेल्या लोकांना सोडणार नाही असा गर्भित इशारा ठाकरे गटाला दिला. त्यास २४ तास उलटत नाही तोच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पुढे येत असून त्यांच्यावर मृतांसाठी लागणाऱ्या बँगेच्या …
Read More »सर्व जिल्हा परिषदांधील या पदाकरीता १९ हजार ४६० पदांची मेगा भरती; जाहिरात उद्याच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची माहिती
ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सरळसेवेची आरोग्य विभागाकडील १०० टक्के व इतर विभागाकडील ८० टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरणेची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील गट-क मधील ३० संवर्गांतील एकूण १९,४६० इतकी पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरात ०५ ऑगस्ट, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, विरोधी पक्षाच्या प्रस्तावाची सत्ताधाऱ्यांकडून थट्टा… खाजगी व सरकारी रुग्णालयात मोफत उपचाराचा कायदा करणार का?
पावसाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षाकडून अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात येतो, हा प्रस्ताव राज्यातील जनतेचे प्रश्न मांडणारा असतो पण विरोधी पक्षाच्या या प्रस्तावाची सत्ताधारी पक्षाकडून थट्टा करण्यात आली. भाजपाप्रणित सरकार जनतेच्या प्रश्नांवर गंभीर नाही. महागाई कमी करण्यासाठी या सरकारकडे कोणतेही धोरण नाही. सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. १०-१५ हजार …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती,… फडणवीस आणि आरएसएस म्हणजे देश नव्हे औरंगजेब बाबत देवेंद्र फडणवीस यांच्या वकक्तव्याला प्रकाश आबंडेकर यांचं प्रत्युत्तर
महाराष्ट्रात दोन महिन्यांपूर्वी अनेक ठिकाणी औरंगजेबाचे पोस्टर्स आणि सोशल मीडिया स्टेटसवरून दंगली घडल्या होत्या. या दंगलींचा मुद्दा विधीमंडळाच्या अधिवेशनातही गाजला. याबाबत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्याला अस्थिर करण्यासाठी हा प्रयत्न झाला होता. परंतु, कुणी औरंगजेबाचं महिमामंडन करणार असेल, तर त्याला सोडणार …
Read More »म्हाडा प्राधिकरणांतर्गत इमारत पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करून देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत इमारतींची पुनर्बांधणी करण्यासाठी निधीची कमतरता असल्यास त्याचा वित्त आणि गृहनिर्माण विभागाच्या मंत्री आणि सचिवांच्या स्तरावर बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल. त्यानंतर म्हाडा प्राधिकरण अन्यथा शासनामार्फत पुढील अधिवेशनात तरतूद करून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत सांगितले. …
Read More »राज्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात घट; विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
महाराष्ट्रात मागील वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये घट झाली असून विविध कारणांनी बेपत्ता महिला परत येण्याची टक्केवारी देशाच्या तुलनेत १० टक्क्यांनी अधिक असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. उद्योग क्षेत्रात मागील एका वर्षात १०९ देकार पत्र (ऑफर लेटर) दिले असून एक लाख चार हजार ८२५ कोटींची गुंतवणूक झाली आहे. विदेशी …
Read More »महसूल सप्ताहात हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांचे, माजी सैनिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
महसूल विभागाशी संबंधित सामान्य नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करण्याच्या उद्देशाने १ ऑगस्ट या महसूल दिनापासून ‘महसूल सप्ताह ‘ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहात हुतात्मा सैनिकांचे तसेच माजी सैनिकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा उपक्रम राबवला जात आहे, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी …
Read More »नाना पटोले म्हणाले,… शिक्षेला स्थगिती हा सत्याचा विजय व हुकुमशाही वृत्तीला चपराक देशातील हुकूमशाही शक्तींच्या पुढे काँग्रेस झुकली नाही व झुकणारही नाही
काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीचे काँग्रेस पक्ष स्वागत करत असून हा सत्याचा विजय आहे. देशात हुकुमशाही व मनमानी कारभार सुरु असून या शक्तींच्या विरोधात काँग्रेस न डगमगता उभी आहे. राहुलजी यांच्यावर खोट्या तक्रारीच्या माध्यमातून शिक्षा देण्याचे काम झाले होते पण देशात आजही न्यायव्यवस्था जिवंत आहे. …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची मागणी, …अन्यथा पंतप्रधान मोदींनी शरद पवार आणि राष्ट्रवादीची माफी मागावी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची बदनामी केली
मध्य प्रदेशातील भोपाळ येथे भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर सिंचन घोटाळा, सहकारी बँक घोटाळा आणि बेकायदेशीर खाण घोटाळा यासह अनेक घोटाळ्यांचे आरोप केले, त्या आरोपानुसार खटले दाखल करावेत किंवा जाहिरपणे माफी मागावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, औरंगजेब इथल्याचा आदर्श कसा? निवडणूका आम्हालाही हव्यात पण… बारसू प्रकल्प पाकिस्तानात गेला
मागील काही दिवसांमध्ये औरंगजेब याच्या स्टेटसवरून दंगली घडल्या जात होत्या. याबाबत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करताना म्हणाले, औरंगजेब हा तुर्की मंगोल वंशाचा होता. तो इथल्या मुस्लिमांचा आदर्श कसा असू शकतो असे सांगत राज्याला अस्थिर करण्यासाठी हा प्रयत्न झाला होता. पण, कुणी औरंगजेबाचं महिमा मंडन करणार …
Read More »
Marathi e-Batmya