Editor

वंदे मातरम राष्ट्रगान वरून प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा पंतप्रधान मोदींच्या दाव्यातील हवा काढून घेतली

काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वड्रा यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जवाहरलाल नेहरू यांनी सुभाषचंद्र बोस यांना लिहिलेल्या पत्रात वंदे मातरमची उत्पत्ती मुस्लिमांना भडकावू शकते असा दावा फेटाळून लावला. पंतप्रधानांनी लोकसभेत त्यांच्या भाषणादरम्यान पत्रातील निवडक उद्धृत केले होते, असे म्हटले आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना लिहिलेल्या …

Read More »

केंद्र सरकारची माहिती, जीएसटी कर संकलनात सात राज्यांचा वाटा जास्त अर्थ मंत्रालयाची संसदेत माहिती

केंद्राकडून विकेंद्रीकरण म्हणून मिळणाऱ्या वाट्यापेक्षा देशातील एकूण जीएसटी कर संकलनात सात राज्यांचा वाटा जास्त आहे, असे सरकारने संसदेत शेअर केलेल्या आकडेवारीच्या विश्लेषणातून दिसून येते. अर्थ मंत्रालयाने राज्यसभेला दिलेल्या उत्तरात दिलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की २०२०-२१ आणि २०२४-२५ दरम्यान देशातील एकूण जीएसटी कर गोळा करण्याच्या ४.६% भाग उत्तर प्रदेशचा …

Read More »

इंडिगो प्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल मक्तेदारी मोडून काढण्याची केली मागणी

इंडिगो विमानसेवेतील अलीकडील मोठ्या प्रमाणातील क्रायसिस आणि प्रवाशांना झालेल्या प्रचंड त्रासाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईतील गांधी भवन, कुलाबा येथे पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार, डिजीसीए DGCA आणि विमान कंपन्यांवर गंभीर आरोप केले. विमान वाहतूक क्षेत्रात वाढती मक्तेदारी, नियमांचे उल्लंघन आणि सरकार-एअरलाइन यांच्यातील कथित …

Read More »

आकाश फुंडकर यांचे आदेश, नवीन कामगार संहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांचे विभागातील अधिकाऱ्यांना आदेश

केंद्र शासनाने चार नवीन कामगार संहिता देशभरात लागू केल्या आहेत. या संहितांच्या तरतुदींची राज्यामध्ये प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिल्या आहेत. ना. मे. लोखंडे श्रम विज्ञान संस्था, नागपूर येथे नवीन कामगार सहितांच्या अंमलबजावणीबाबत आयोजित बैठकीत कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आढावा घेतला. बैठकीस कामगार …

Read More »

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच ७५ हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केल्या पुरवणी मागण्या

महायुती सरकार सत्तेत आल्यापासून एक नवी प्रथा निर्माण करण्यात आली असून या प्रथेनुसार विधिमंडळाचे कोणतेही अधिवेशन असो पण त्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या नव्या प्रथे प्रमाणे पुरवणी मागण्या सादर करायच्या आणि त्या अधिवेशन संपेपर्यंत मंजूर करून घ्यायचे. त्यानुसार राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नागपूरातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आज पहिल्या दिवशी …

Read More »

महाविकास आघाडीचा चहापानावर बहिष्कार, पत्राद्वारे सरकारला दिला इशारा हिवाळी अधिवेशानाला सोमवारपासून सुरुवात

राज्य विधिमंडशळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला सोमवारी ८ तारखेपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी अर्थात महाविकास आघाडीने बहिष्कार टाकत असल्याची घोषणा राज्य सरकारला पाठविलेल्या पत्राद्वारे केली. तसेच राज्य सरकारच्या कारभारावरून टीका केली. महाविकास आघाडीने सरकारला लिहिलेले पत्र खालीलप्रमाणे… प्रति. मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री …

Read More »

माधुरी मिसाळ यांची माहिती, नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त करार

महाराष्ट्र आणि जर्मनीतील बाडेन-वुटेमबर्ग राज्यादरम्यान नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण संयुक्त करार करण्यात आला आहे, यामुळे महाराष्ट्रातील नर्सिंग विद्यार्थ्यांनी जर्मनीत प्रशिक्षण घेऊन करिअरची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असल्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि बाडेन-वुटेमबर्ग राज्याचे मंत्री मॅनफ्रेड लुखा यांनी सह्याद्री अतिथीगृह मुंबई …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, इंदू मिलमधील डॉ आंबेडकर स्मारकाचे काम पूर्ण का होत नाही? स्मारकाच्या कामावरून सरकारला केला सवाल

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी अभिवादन केले. त्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य स्मारक बनवण्याकरिता इंदू मिलची …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, भाजपा सरकारच्या काळातच दलित, वंचित व महिलांवर अत्याचार वाढले मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही वेळेवर मिळत नाही

केंद्रात व राज्यात मनुवादी विचाराचे सरकार आल्यापासून दलित, मागास समाजावरील अत्याचारांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. महिला व मुलींवरील अत्याचार वाढले आहेत.ऑनर किलिंगच्या घटनाही वाढल्या आहेत. मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही वेळेवर मिळत नाही. सामाजिक न्याय विभागाचा निधी दुसऱ्या योजनांसाठी वळवला जातो. सरकारकडे तक्रार करूनही त्यात सुधारणा होत नाही. भाजपा सरकार जाणीव …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था दादरच्या चैत्यभूमी येथे ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इतक्या मोठ्या राष्ट्रात एकता, न्याय व समतेची संघटित भावना दृढ करण्यासाठी संविधान निर्माण करणे हे अत्यंत मोठे व ऐतिहासिक कार्य होते. देशाच्या सामाजिक विविधतेत सर्वांना एकत्र आणणारे आणि समान अधिकार प्रदान करणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्राला दिले, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत …

Read More »