Editor

नाना पटोले यांची मागणी; अनाचार्य भोसले, दवे, नितेश राणेंचीच एसआयटी चौकशी करा त्र्यंबकेश्वरमध्ये दंगल घडवण्याचा भाजपाचा कुटिल डाव गावकऱ्यांनी उधळून लावला

महाराष्ट्रात जातीय तणाव वाढवून दंगली घडवण्याचे षडयंत्र भारतीय जनता पक्ष व त्यांच्याशी संलग्न संघटना करत असल्याचे मागील काही दिवसापासून दिसत आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरला धूप दाखवण्याच्या प्रकरणाला भाजपाशी संबंधित लोकांनी जाणीवपूर्वक वादाचा रंग देऊन वातावरण बिघडवण्याचे काम केले आहे. त्र्यंबकेश्वरला धूप दाखवण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली असून …

Read More »

बैलगाडा शर्यतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

बैलगाडा शर्यतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनापासून स्वागत केले आहे. “हा विजय सर्वस्वी बैलगाडा शर्यतप्रेमींसह शेतकऱ्यांचा आहे, १२ वर्षांपासून सुरू असलेला लढा सर्वांच्या प्रयत्नामुळे जिंकता आल्याचे समाधान आहे”, असे मंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे. न्यायालयाच्या निकालानंतर प्रतिक्रिया व्यक्त …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, …समुपदेशन शिबिरं मोलाची भूमिका बजावतील युवा पिढीच्या ताकदीवर देश महाशक्तीकडे वाटचाल करतोय

“जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी राज्यशासन प्रयत्नशील असून कुशल आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरं नक्कीच मोलाची भूमिका बजावतील”, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० वर्षपूर्ती महोत्सवात… भाजपा कार्यकर्त्यांना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे आमचा आदर्श आहेत. रयतेसाठी कल्याणकारी राजा म्हणून महाराजांची ख्याती आहे; म्हणून राजमाता जिजाऊ यांनी महाराजांना राज्याभिषेकाचा सांगितलेला अर्थ आजच्या पिढीपर्यंत प्रबोधन, कीर्तन आणि विविध उपक्रमातून पोहोचविण्याचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा शिवसेना सरकारने केला. महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे …

Read More »

सोनिया गांधी यांची शिष्टाई आणि मुख्यमंत्री पदाचा पेच सुटलाः शनिवारी शपथविधी सिध्दरामय्या मुख्यमंत्री तर डि.के.शिवकुमार होणार उपमुख्यमंत्री

मागील तीन दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण सिद्धरामय्या की डि.के.शिवकुमार बसणार यावरून चर्चेच्या फेऱ्या सातत्याने होऊनही पेच सुटत नव्हता. डि.के.शिवकुमार आणि सिध्दरामय्या याच्यात माघार घ्यायलाही कोणी तयार नव्हत. या दोघांमध्ये समन्वय साधण्याचे काम काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांनी केले. पण डि.के.शिवकुमार आपला मुख्यमंत्री पदावरील दावा सोडविण्यास तयार …

Read More »

विधि व न्याय विभागाने नव्व्या वर्षात पाहिला ५ वा मंत्रीः किरेन रिजीजू यांची उचल बांगडी सर्वोच्च न्यायालयाबरोबरील वाद चांगलाच नडला

देशात केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या जवळपास सर्वच केंद्रीय यंत्रणांमध्ये आपल्याच पसंतीच्या व्यक्ती नेमून त्या मार्फत त्या यंत्रणेच्या कारभारावर एक नियंत्रण ठेवण्यात येत असल्याची चर्चा २०१४ साली केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचे सरकार आल्यापासून सातत्याने होत आहे. याच अनुषंगाने मागील नऊ वर्षात विधि व न्याय (Law and …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा दावा, राष्ट्रवादीत अजून दोन बॉम्ब फुटायचेत, त्यानंतर… शिवसेनेकडून दक्षिण मध्य मुंबईची जागा वंचितला देण्याची तयारी

नुकत्याच महाविकास आघाडीच्या बैठकीत मविआतील घटक पक्षांच्या मित्र पक्षांनाही आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत चर्चा झाली. त्यामुळे ठाकरे गटासोबत असलेल्या वंचित बहुजन आघाडीला मविआत स्थान मिळणार असल्याची शक्यता वक्त करण्यात येत असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात खळबळजनक दावा केला. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, …

Read More »

कार्यक्रम भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा अन अदानीची वीज गेली मोदी सरकारच्या पावला वर पाऊल ठेवत शिंदे सरकारची कामगिरी!:नड्डा

आगामी मुंबई महापालिका निवडणूका आणि मध्यावधी निवडणूकांची शक्यता गृहीत धरून सध्या सर्वच राजकिय पक्षांकडून तयारी सुरु केली. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार असतानाही दोन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा याच्या ऐन कार्यक्रमात कांदीवलीतील अदानी पॉवरच्या वीज यंत्रणेकडून वीज गेली. त्यामुळे अखेर कार्यकर्त्यांच्या मोबाईल टॉर्चमध्ये कार्यक्रम पार …

Read More »

छत्रपती संभाजी नगर नव्हे तर आता औरंगाबादच, उच्च न्यायालयाचा आदेश जिल्हाधिकाऱ्याकडूनही आदेश जारी

औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर सर्वत्र संभाजीनगर उल्लेख होत आहे. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर या याचिकांवर अंतिम निर्णय होईपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने जिल्ह्याचा उल्लेख आधीप्रमाणे औरंगाबादच करण्याचे निर्देश दिले. यानंतर औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला तसे आदेशही दिले. मात्र, जिल्ह्याचा उल्लेख संभाजीनगरच होत असल्याने आता इनामदार सय्यद …

Read More »

पुणे मेट्रोच्या १ हजार ९२६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, पाच वर्षांतील मेट्रो प्रकल्पासाठीचा वाढीव अतिरिक्त विकास शुल्क माफ

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राधिकरणाच्या या वर्षांच्या १ हजार ९२६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता यावेळी देण्यात आली. जुलै २०१८ ते एप्रिल २०२३ या पाच वर्षांच्या काळातील प्राधिकरणाकडून विकास आणि बांधकाम प्रकरणांमध्ये वसुल करण्यात येणारे १०० टक्के वाढीव अतिरिक्त विकास शुल्क माफ …

Read More »