२०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचे कंबरडे मोडायचे असल्याचे सांगत अचानकच देशातील एक हजार, ५०० रूपयाच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहिर केला. त्यामुळे संबध देशवासियांकडे असलेल्या ५०० आणि एक हजार रूपयांच्या नोटा कागदाचे गोळे ठरले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दोन हजार रूपयांची आणि पाचशे रूपयांची नवी …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, …सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई का होत नाही? कायदा सुव्यवस्थेसंदर्भात काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली अतिरिक्त पोलीस महासंचालकांची भेट
महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य असून सामाजिक एकोपा राखण्यात महाराष्ट्राचा लौकिक आहे परंतु मागील काही महिन्यातील घटना पाहता राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम काही लोक करत असल्याचे दिसत आहे. दोन धर्मात तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न काही संस्था, संघटना करत आहेत. काही लोक भडकाऊ विधाने करुन वातावरण गढूळ करत …
Read More »देशातील वैशिष्ट्यपूर्ण अशा सुशासन नियमावलीस मुख्यमंत्र्यांची मान्यता प्रशासन अधिक उत्तरदायी, गतिमान होणार
देशातील वैशिष्ट्यपूर्ण अशा सुशासन नियमावली २०२३ ला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिल्याने राज्याचे प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शी होण्यास मदत होणार असून यात वातावरणीय बदलाच्या परिणामावरील कार्यवाहीसाठी स्वतंत्र कक्षाच्या निर्मितीचा देखील अंतर्भाव असणार आहे. राज्याचे प्रशासन उत्तरदायी, सुलभ, गतिमान आणि पारदर्शी व्हावे यासाठी स्थापन समितीच्या अहवालावर आज सह्याद्री अतिथीगृह …
Read More »मनिष सिसोदीयांची कवितेतून जनतेला साद तर मोदींवर टीकास्त्र,… तो चौथी पास राजा का,… समाज माध्यमातून भरलेच व्हायरल
दिल्लीच्या दारू धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी राजधानी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया सध्या तुरुंगात आहेत. मनिष सिसोदिया यांनी तुरुंगातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. एका चौथी पास राजाच्या राजमहलचा (राजमहाल) पाया हादरत आहे असा खोचक टोला त्यांनी एका कवितेतून लगावला आहे. …
Read More »जाधवांच्या मी चापट मारली या स्वःकबुलीवर सुषमा अंधारे यांनी सांगितली हकिकत… अप्पासाहेब जाधव हे स्वतः बोलतायत यावरून ते आधीच ठरवून आलेले
मागील दोन दिवसांपासून शिवसेना (ठाकरे गट) च्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना आपण दोन चापटा मारल्या असा दावा करणारा ठाकरे गटाचे बीड जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जाधव यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे या व्हिडिओची चर्चा सध्या राजकिय वर्तुळात सुरु झाली. यापार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी याप्रकरणी सविस्तर घटनाक्रम सांगत खरचं मारहाण …
Read More »जयंत पाटील यांची मागणी,… फक्त त्या उमेदवारांचीच कौशल्य चाचणी पुन्हा घ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र लिहीत केली मागणी
फक्त तांत्रिक अडचणी आलेल्या उमेदवारांचीच कौशल्य चाचणी पुन्हा घ्या अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना लिहिले आहे. जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट-क अंतर्गत सहाय्यक आणि लिपीक नि टंकलेखक या पदाकरीता परीक्षा घेण्यात आली होती. मात्र टंकलेखनाच्या ऑनलाइन चाचणी दरम्यान उमेदवारांना …
Read More »देवेंद्र फडणवीस यांनी मविआच्या नेत्यांना केले लक्ष्य, अडीच वर्षाच्या काळात मुख्यमंत्री फक्त… टीआरपीचे कसा घ्यायचा याचं प्रशिक्षण शरद पवारांकडून घेतले पाहिजे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य केलं आहे. आपल्या खास शैलीत त्यांनी शरद पवारांवर टोलेबाजी केली आहे. टीआरपी कसा घ्यायचा याचं प्रशिक्षण आपण शरद पवारांकडून घेतलं पाहिजे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी २ मे रोजी लोक माझे सांगाती …
Read More »मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिले ‘हे’ निर्देश नाल्यांचे अधिकाधिक खोलीकरण करून पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्यावी
मुंबईतील सुमारे २२०० किमी लांबीच्या नाल्यांची सफाई व्यवस्थित आणि खोलपर्यंत केल्यास यंदा पावसाळ्यात पाणी साचण्यापासून मुंबईकरांना होणारा त्रास वाचेल. त्यामुळे किती मेट्रीक टन गाळ काढला यापेक्षा मुंबईत पाणी कुठे तुंबणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाईच्या कामांचा प्रत्यक्ष जागेवर जात आढावा …
Read More »अतुल लोंढे यांचे टीकास्त्र; निवडणूकीत चारीमुंड्या चित झालेल्या नड्डांची मुंबईत पोकळ गर्जना अपयशी भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डांचे गद्दारांच्या साथीने मुंबई जिंकण्याचे दिवास्वप्न
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे गृहराज्य असलेल्या हिमाचल प्रदेशात काँग्रेसने भाजपाचा दारूण पराभव करत विधानसभेवर विजयी पताका फडकवली आहे. शिमला महानगरपालिकेतही भाजपाचा पराभव काँग्रेसने केला आहे. त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात भाजपचा एकही उमेदवार ते निवडून आणू शकले नाहीत. कर्नाटकातही नड्डांच्या भाजपाचा सुपडासाफ झाला. नड्डा म्हणजे पराभव हे …
Read More »राज्य सरकारच्या परवानगीने आता तुरुंगातील कैदीही वापरणार स्मार्ट कार्ड फोन स्मार्ट कार्ड फोन वापरास गृह विभागाची मान्यता
सध्या राज्यातील विविध तुरुंगातील कैद्यांना नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी कॉईन बॉक्सची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र ज्या बंद्यांना अतिसुरक्षा विभाग, सुरक्षायार्ड व विभक्त कोठडयांमध्ये सुरक्षेच्या कारणास्त ठेवण्यात आलेले आहे, अशा बंद्यांना फोन करण्यासाठी ज्या ठिकाणी कॉईन बॉक्स आहे तिथे न्यावे लागत असल्याने ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. …
Read More »
Marathi e-Batmya