Editor

मुख्यमंत्री शिंदे यांनी डॉ सावंतांना दिले प्रशस्तीपत्रक, तर विरोधकांच्या पोटदुखीवर … डॉ.तानाजी सावंत यांना शिक्षणमंत्री करायचे होते पण...

ठाणे जिल्हा मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा शनिवारी, अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी केंद्रीय पंचायत राजमंत्री कपील पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यासह आमदार, खासदार उपस्थित होते. या सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना टोले लगावले. तसेच आरोग्य विभागाने गेल्या काही काळात …

Read More »

नाना पटोले यांचा टोला, चव्हाण सरकारबदद्ल… तर अजित पवारांनी तेव्हाच बाहेर पडायचे ना सत्यपाल मलिकांनी मोदींचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्यानेच सीबीआयकडून नोटीस

पुलवामा घटना झाली त्यावेळी सत्यपाल मलिक हे जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते, त्यावेळच्या घटनेचे सत्य त्यांनी जनतेसमोर उघड केले. आपल्या जवानांवर केलेला तो भ्याड हल्ला आहे, त्यावर पंतप्रधानांनी उत्तर दिले पाहिजे पण उत्तर न देता नरेंद्र मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणला म्हणूनच सत्यपाल मलिकांना सीबीआयकडून नोटीस पाठवण्यात आली आहे, असा …

Read More »

केंद्र सरकारने जारी केली अडचणीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी राष्ट्रीय हेल्पलाईन ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ ही राष्ट्रीय हेल्पलाईन सेवा सुरु

देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालयामार्फत १४५६७ क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन/एल्डरलाईन सेवा सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे. या टोल फ्री हेल्पलाईनच्या माध्यमातून निवृत्तीवेतन, ज्येष्ठ नागरिक योजना, कायदेशीर समस्या, बेघर आणि वृद्धांवरील अत्याचार इत्यादींची माहिती व मदत देण्यात येत आहे. राष्ट्रीय समाज …

Read More »

सत्यपाल मलिक यांनी केलेले आरोप नेमके काय ? वाचा भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर आता काय परिस्थिती

द वायर या संकेतस्थळासाठी ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काही दिवसांपूर्वी फेब्रुवारी २०१९ मधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा दावा केला होता. जवानांच्या सुरक्षेमधील कथित त्रुटींबाबत मी बोलू नये, शांत राहावे; असे मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले …

Read More »

पर्यटन महामंडळात फेलोशिपची तरुणांना संधीः दरमहा मिळणार छात्रवृत्ती आणि प्रवास भत्ता १५ मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन

राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत फेलोशिप उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत तरुणांना फेलोशिपची संधी उपलब्ध होणार असून या फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी १५ मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन, महामंडळाद्वारे करण्यात आले आहे. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली या फेलोशिप उपक्रमाची …

Read More »

सत्यपाल मलिक यांना अटक? दिल्ली पोलिसांनी दिले हे स्पष्टीकरण समाज माध्यमांवरील माहितीमुळे पोलिसांनी केला खुलासा

भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नुकतीच द वायर या संकेतस्थळासाठी ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांना दिलेल्या मुलाखत दिली. या मुलाखतीवेळी सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेसंदर्भात गौप्यस्फोट केला. तसेच जम्मू काश्मीरच्या राज्यपाल पदी असताना दोन फाईलींवर सही करण्याचे ३०० कोटी रूपयांची लाच देण्याचे आमिष दाखविण्यात आल्याचा …

Read More »

अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल कंपनी महाराष्ट्रात करणार ८० हजार कोटींची गुंतवणूक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कंपनीच्या शिष्टमंडळाची प्राथमिक चर्चा

अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल इंडिया लि. ही स्टील निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी असून कंपनीची महाराष्ट्रात हजारो कोटींची गुंतवणूक आहे. स्टील निर्मिती आणि प्रक्रिया, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कंपनी आणखी ८० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. याबाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा …

Read More »

शरद पवार यांचा सवाल, जर कुणी हल्लाच केला नाही तर हत्या झाली कशी… खारघर मृत्यूकांडाची चौकशी हायकोर्टाचे सिटींग न्यायाधीशांमार्फत व्हावी...

गुजरातमधील नरोडा पाटिया दंगलीतील ज्या लोकांची हत्या झाली. ती हत्या कशाने झाली. जर कुणी हल्लाच केला नाही तर हत्या झाली कशी? हत्या होते आणि हत्येकरु निर्दोष सोडले जातात म्हणजे एकादृष्टीने ज्यांची हत्या झाली त्यांचीही हत्या झाली तेही गेले आणि या देशात जो कायदा आहे जी कायद्याची व्यवस्था आहे. जे संविधान …

Read More »

नरोडा पाटिया हत्यांकाड प्रकरणी विशेष न्यायालयाकडून ६९ जणाची निर्दोष मुक्तता सर्वोच्च न्यायालयानेच नेमलेल्या विशेष न्यायालयाचा निकाल

२००२ साली गुजरातमधील गोध्रा कांडानंतर गुजरातमधील अनेक ठिकाणी हिंदू-मुस्लिम दंगली उसळल्या. या दंगली घडवून आणण्यात ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि त्याचा कबुली जबाब अनेकांनी कधी स्टींग ऑपरेशनच्या माध्यमातून तर काही लघुपटासाठी स्पष्ट कबुली जबाब दिला. त्यातील अनेकांना नरोडा पाटिया गावातील हत्याकांडप्रकरणी येथील विशेष न्यायालयाने सर्व ६९ आरोपींची गुरूवारी निर्दोष मुक्तता …

Read More »

मुख्यमंत्र्यांची ग्वाही, नवा आयोग नेमून मराठा समाजाचे विस्तृत आणि शास्त्रीय सर्वेक्षण करणार सर्वोच्च न्यायालयासमोर क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे बंद झालेले नाहीत. हे आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासन ठाम असून अधिक मजबूत कायदेशीर लढा लढण्यात येईल. यासाठी उपचारात्मक याचिका (क्युरेटिव्ह याचिका) दाखल करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या …

Read More »