Editor

नाना पटोले यांचे आवाहन, भाजपा सरकारकडून राज्याची होत असलेली अधोगती थांबवूया कामगारांना उद्ध्वस्त करणाऱ्या भाजपालाच आता घरी बसवा

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर देशात पहिल्या नंबरचे राज्य अशी महाराष्ट्राची ओळख निर्माण करण्यात काँग्रेस सरकारचेच मोठे योगदान आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत काँग्रेसच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी राज्याला प्रगतीपथावर आणून ठेवले. परंतु मागील काही वर्षांपासून दिल्लीच्या आदेशावरून भाजपा सरकार महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जात आहे. ही अधोगती थांबवून पुन्हा एकदा …

Read More »

संजय राऊत यांचा “त्या” व्हिडिओवरून सवाल, भाजपाचं हिंदूत्व इथे काय करत होते? फडणवीस आणि पोलिस खात्याला दिले चौकशीचे आव्हान

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते मोहित कंबोज यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. मोहित कंबोज रात्री साडेतीन वाजता बारमध्ये मुलींना घेऊन नाचत असल्याचा दावा त्यांनी केला. याप्रकरणी गृहमंत्री आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्याचीही मागणी केली. संजय राऊत यांनी संभाजी ब्रिगेड संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला …

Read More »

राज्यपाल बैस यांची ग्वाही, कोविडनंतर अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करून रोजगार निर्मितीवर भर राज्यपालांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय समारंभ संपन्न

सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकास घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात केले. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित समारंभात राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, …

Read More »

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मार्फत देखो आपला महाराष्ट्र टुर पॅकेज जाहीर ७५ ठिकाणी फिरण्याची संधी

राज्यातील पर्यटनाला चालना देण्याकरिता तसेच राज्यातील पर्यटन स्थळांना देशांतर्गत – विदेशी पर्यटकांना मोठया प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्षांत महाराष्ट्र अंतर्गत ७५ टुर पॅकेज ०१ मे २०२३ रोजी सुरु करण्यात येत आहे. पर्यटन कौशल्य विकास आणि उद्योजकता महिला आणि बाल …

Read More »

मुंबईत ५ हजार ठिकाणी ‘मन की बात’ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या ऐतिहासिक संवादाचा शतकोत्सव मुंबईसह उपनगरातील ३६ विधानसभा क्षेत्रात तब्बल ५ हजाराहून अधिक ठिकाणी प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलेपार्ल्यातील म. ल. डहाणूकर महाविद्यालयातल्या केशवराव घैसास सभागृहात हजर राहून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण …

Read More »

राज्याच्या मुख्य सचिवपदाचा मनोज सौनिक यांनी स्वीकारला पदभार मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडून स्विकारला सुत्रे

महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज मावळते मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्याकडून मंत्रालयात पदभार स्वीकारला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल व वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे, …

Read More »

बावनकुळेंच्या टीकेवर अजित पवार यांचा खोचक टोला, मी नागपूरला जाऊन टिप्स घेणार… त्यांच्याकडून माहिती घेऊन तसे काम करेन

राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी लोकसंख्येच्या मुद्द्यावरून जोरदार टोलेबाजी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं उदाहरण देत लोकसंख्येबाबत लोकांच्या वर्तनावर एक खंतही व्यक्त केली. त्याचबरोबर पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार या जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर …

Read More »

नाना पटोले यांची टीका, लोकशाहीमध्ये ‘मन की…’ नाही तर ‘जनता की बात’ करावी लागते महागाई, बेरोजगारी, बँक लुटेरे, कर्नाटकातील ४०% च्या भ्रष्ट सरकारवर ‘मन की बात’ कधी?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’च्या १०० व्या भागाचा मोठा गाजावाजा करण्यात आला. ‘मन की बात’चे १०० भाग पूर्ण केले पण पंतप्रधान मोदींनी देशातील ज्वलंत मुद्द्यांचा एकाही भागात उल्लेख केला नाही. महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, चीनची दादागिरी, महिला कुस्तीपटूंवर भाजपा खासदाराने केलेले लैंगिक अत्याचार, कर्नाटकातील ४०% भ्रष्ट सरकार, बँक लुटेरे, …

Read More »

अजित पवारांच्या स्पष्टोक्तीनंतर जयंत पाटील यांचे मोठे वक्तव्य, पुढचा मुख्यमंत्री ठरला… आमचा पक्ष महाविकास आघाडीत मोठा

काही दिवसांपूर्वी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उध्दव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर लगेचच अजित पवार यांच्या भाजपासोबत जाण्याची आणि राज्याच्या नेतृत्वबदलाची चर्चा महाराष्ट्रात सुरु झाली. त्यातच एका जाहिर कार्यक्रमात अजित पवार यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी बसायला आवडेल का असा प्रश्न …

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा पडली पार, पण विद्यार्थ्यांना हजेरीच लावता आली नाही आयोगाच्या इतिहासातील सर्वात मोठी परिक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती प्रक्रियेतील महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत पार पडली असल्याचे लोकसेवा आयोगाने म्हटले आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांना परिक्षेला उपस्थित राहुनही आपली हजेरी दाखविता आली नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल, २०२३ रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क …

Read More »