ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला राज्यभरात अभुतपूर्व यश मिळाले आहे. भाजपा हा राज्यातील क्रमांक एकचा पक्ष झाला असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीतून दिसत आहे. महाराष्ट्रातील जनता आणि मराठी माणसामुळेच हे यश भाजपाला मिळाले असून आम्ही नम्रतेने हा विजय स्वीकारतो. जनतेची सेवा आणखी दुप्पट वेगाने करु, असा विश्वास व्यक्त करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्व. …
Read More »आंदोलनकर्त्या दुर्गप्रेमींच्या भेटीसाठी मुख्यमंत्री थेट आझाद मैदानावर
गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनाबाबत राज्यभरातील दुर्गप्रेमी तरुणांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केल. त्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट आझाद मैदान गाठले. आंदोलकर्त्यांची भेट घेतली. गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांचे …
Read More »जागतिक दर्जाचा इको पार्क उभारणार निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
पर्यावरण संरक्षण आणि संतुलन हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. या संदर्भात राज्याचा वन विभाग सतर्क असून निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून लोकजागृती करण्याच्या दृष्टीने जागतिक दर्जाचे नैसर्गिक उद्यान अर्थात इको पार्क उभारता येईल का याविषयी राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज वन विभागाचे प्रधान सचिव व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रायगड जिल्ह्यातील …
Read More »उध्दव ठाकरे यांच्या टीकेवरून नारायण राणे यांनी साधला निशाणा, मला फोन करावा मी सांगतो काँग्रेसच्या खुलाशावर मात्र साधली चुप्पी
आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधत नामिबियातून भारतातून आणण्यात आलेले ८ चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च्या हाताने मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडले. यानिमित्ताने तब्बल ७० वर्षानंतर नामशेष झालेला चित्ता भारतात पुन्हा दाखल झाला. नरेंद्र मोदी यांचा हा प्रकल्प मानण्यात येत आहे. मात्र, यावरुन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधत …
Read More »मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांची निती आयोगाला ग्वाही, १ ट्रिलीयनची अर्थव्यवस्था करणार महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तनासाठी निती आयोगाच्या धर्तीवर राज्यस्तरीय संस्था
महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तनासाठी निती आयोगाच्या धर्तीवर राज्यस्तरीय संस्था स्थापना होत असून त्यामाध्यमातून कृषी, आरोग्य, शिक्षण रोजगार, पर्यावरण या विषयावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. प्रत्येक क्षेत्रात सामान्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्यासाठी निती आयोगाने राज्याला सहकार्य करावे, असे आवाहन करतानाच देशाच्या पाच ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी …
Read More »नारायण राणे म्हणाले, त्या प्रकल्पाला कोणाचाही विरोध चालू देणार नाही काँग्रेस, शिवसेनेला दिला इशारा
फडणवीस सरकारच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नाणार येथील रिफायनरीला विरोध केला. त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर रिफायनरीचा प्रकल्प नाणारऐवजी बारसू गावात करण्याची तयारी दर्शविली. त्यातच आता या प्रकल्पावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोकणचा दौरा करत स्थानिक नागरिकांची मते जाणून घेतली. त्यानंतर या रिफायनरी प्रकल्पाला …
Read More »तैवानमध्ये २४ तासात तीनवेळा भूकंप जपानला त्सुनामीचा इशारा
तैवानमध्ये गेल्या २४ तासात तीन वेळा भूकंप आला आहे. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. तैवानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व भागातील तायतुंग काऊंटी भूकंपाचं मुख्य केंद्र आहे, शनिवारी याच भागात ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रविवारी सकाळी ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला. …
Read More »अन्न व औषध प्रशासनाचे वराती मागून घोडे, उत्पादन बंद झाल्यानंतर परवाना रद्द
मागील काही दिवसांपूर्वी अमेरिकेत जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीकडून लहान मुलांसाठी बनविण्यात येणारी पावडर धोकादायक असल्याचे सिध्द झाले. त्यानंतर या कंपनीने ही पावडर बंद करण्याचा निर्णय घेत जगभरातून सदरची उत्पादने परत मागवून घेत पावडरचे उत्पादन बंद करण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने जॉन्सन अँड जॉन्सन …
Read More »बंजारा सेना कार्याध्यक्षांचा भाजपात प्रवेश
अखिल भारतीय बंजारा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चेतन चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येत बंजारा सेनेच्या कार्यकर्त्यांना रविवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला. बंजारा समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या विकासासाठी पक्षप्रवेश करणारे कार्यकर्ते प्रयत्न करतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे …
Read More »पंढरपूरच्या विकास आराखड्यात सहभागी होण्याची संधी विकास आराखड्याबाबत 26 सप्टेंबरपर्यंत लेखी सूचना द्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडयामध्ये समाविष्ट कामाबाबत १२ सप्टेंबर २०२२ रोजी खासदार, आमदार, मंदीर समितीचे विश्वस्त, पालखी सोहळयाचे विश्वस्त, व्यापारी प्रतिनिधी, पत्रकार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली. आराखड्याबाबत आणखी काही सूचना असतील तर लेखी स्वरूपात 26 सप्टेंबर २०२२ पर्यंत देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. आराखड्याबाबत लोकप्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी, पालखी …
Read More »
Marathi e-Batmya