भाजपा आमदार अतुल भातखळकर आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रावाला चाळ प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव घेत आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाला खोचक उत्तर देत म्हणाले, भाजपाला आता राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्याशिवाय कोणी दिसत नाही. त्यामुळे ते …
Read More »भाजपाचा नवा आरोप: पत्राचाळ प्रकरणात शरद पवारांचा हात अतुल भातखळकरांच्या आरोपापाठोपाठ भाजपा प्रदेशाध्यक्षांचीही मागणी
मुंबईतील बहुचर्चित पत्रावाला चाळप्रकरणी भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव घेत त्यांच्या चौकशी करण्याची मागणी केली. भातखळकर यांच्या मागणी पाठोपाठ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बवानकुळे यांनीही अतुल भातखळकर हे अभ्यासू आमदार असल्याचे सांगत या मागणीला पाठींबा दिला. पत्राचाळ प्रकरणात शरद पवारांची चौकशी करावी अशी मागणी …
Read More »अजित पवार यांचे आव्हान, ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाऊ द्या देशात चित्ते आले ठिक आहे परंतु यातून लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का?
तुमच्या – माझ्या देशात व महाराष्ट्रात जे महागाईचे, बेरोजगारीचे व कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत त्यांना व्यवस्थितपणे बाजूला ठेवून तिसरेच प्रश्न पुढे आणले जातात. आता देशात चित्ते आले ठिक आहे. ते वाढावेत, पशूधन वाढावे हे ही ठीक आहे. परंतु यातून लोकांच्या रोजी-रोटीचा प्रश्न सुटणार आहे का? वेदांताचे काय होणार आहे …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे मराठी कलाकारांसोबत, ‘मला तुमचं ऐकायचंय…आता एकमेकांशी बोलुया’
‘आपली संस्कृती, कला जोपासलीच पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे. त्यामुळे मराठी नाट्य, चित्रपट आणि कला क्षेत्राला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,’अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी ‘मला तुमचं ऐकायचंय…! आपण एकमेकांबद्दल बोलत असतो. आता एकमेकांशी बोलुया.., असं म्हणत …
Read More »बीडीडी चाळीतील १५४ पोलिसांच्या सदनिका निश्चित ना. म. जोशी मार्ग परळ बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे ना. म. जोशी मार्ग परळ बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये पात्र पोलीस कर्मचारी गाळेधारकांना वितरित करावयाच्या १५४ पुनर्वसन सदनिकांची संगणकीय प्रणालीद्वारे निश्चिती आज करण्यात आली. या पात्र गाळेधारकांना पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या व मालकी तत्वावर दिल्या …
Read More »नाना पटोले म्हणाले, भाजपाचा तो दावा खोटा… देवेंद्र फडणवीस, तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात का गुजरातचे ?
राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत भारतीय जनता पक्ष खोटी माहिती देऊन विजयाचा दावा करत आहे तो चुकीचा आहे. काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना या निवडणुकीत घवघवीत मिळाले असून काँग्रेस पक्षाला १७५ ग्रामपंचायतींमध्ये घवघवीत विजय मिळाला आहे, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी …
Read More »तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाची शिंदेंकडून कॉपी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट स्थापन
केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कार्यगटात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण, शालेय शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय, कौशल्य विकास व उद्योजकता या खात्यांचे मंत्री यांचा समावेश केला होता. …
Read More »मराठा आरक्षणासाठी भाजपा-शिंदे गटाच्या प्रत्येकी तीन जणांची मंत्रिमंडळ उपसमिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मान्यता
मुंबई उच्च न्यायालयात गेलेले मराठा समाजाचे आरक्षण परत मिळविण्यासाठी आता शिंदे-फडणवीस सरकारने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची आज स्थापना केली. या समितीत 6 मंत्ऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या उपसमितीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे या समितीत भाजपा आणि शिंदे गटाच्या …
Read More »सर्वाधिक काळ सत्तास्थानी राहिलेल्या महाराणी एलिझाबेथ द्वितीयला अखेरचा निरोप ५०० हून अधिक राजघराणी आणि देशाच्या प्रमुखांनी दिली अखेरची मानवंदना
अर्ध्याहून अधिक पृथ्वीतलावर राज्य करणाऱ्या आणि ब्रिटनच्या साम्राज्यवादाच्या सर्वोच्च काळापासून ते अस्तापर्यतचा काळ पाहणाऱ्या आणि इतिहासातील अनेक घटनांची साक्षीदार राहिलेल्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या अंत्यसंस्काराला जगभरातील ५०० हून अधिक राजघराणी आणि राष्ट्रप्रमुखांनी अंत्ययात्रेत सहभागी होत अखेरची मानवंदना दिली. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर लंडनच्या वेस्टमिन्स्टर …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘या’ आश्वासनानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक
राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबद्दल शासन सकारात्मक असून जनतेला दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि अखंडित सेवा पुरविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर २७ सप्टेंबर रोजी पुकारलेले ‘लक्षवेध दिन’ आंदोलन मागे घेत असल्याचे महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाने जाहीर केले आहे. महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी- कर्मचारी महासंघाच्या विविध मागण्यांसंदर्भात …
Read More »
Marathi e-Batmya