Editor

छगन भुजबळ यांचा सवाल, अमृतचे मुख्यालय नेण्याचे कारणच काय ? कार्यालयाच्या स्थलांतराचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करणार

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील युवक युवतींना व इतर उमेदवारासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी म्हणजेच अमृत या संस्थेची निर्मिती केलेली आहे. महाविकास आघाडी सरकारने या संस्थेचे मुख्यालय नाशिकला मंजूर केले होते. मात्र शिंदे सरकारने लगेच नाशिकचे मुख्यालय पुणे येथे स्थलांतरित केले. हे अमृतचे मुख्यालय नाशिकहून …

Read More »

मोदी सरकारच्या कारभारावरून उध्दव ठाकरे म्हणाले, आपण पुन्हा गुलामगिरीत… राज्य सरकार आहे कुठे शेतकरी बेहाल

आपण स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली. त्यापूर्वी १५० वर्षे ब्रिटीशांच्या पारतंत्र्यात होतो. त्यावेळी आपण गुलामगिरीत होतो. पण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना पुन्हा आपण गुलामगिरीकडे जात आहोत का? हा विचार करण्याची वेळ आली आहे असे सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी करत ते पुढे म्हणाले की, व्यंगचित्रकारांना एवढंच सांगतो, …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, यांची बावन असतील नाहीतर एकशेबावण पण शिवसेनेला… हर घर तिरंगा म्हणे पण घर नाही त्याने काय करायचे

शिवसेना कोणाची? आणि अपात्रतेच्या मुद्यावरून सध्या निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात सध्या न्यायालयीन लढाई सुरु आहे. मात्र मागील काही दिवसांपासून उध्दव ठाकरे यांनी जाहिरपणे बोलण्याचे टाळले होते. यापार्श्वभूमीवर मार्मिकच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेले होते. मात्र …

Read More »

जयंत पाटील यांच्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ते त्यांचे कामच पण… बिन खात्याचे मंत्री करणार ध्वजारोहण

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला असतानाही अद्याप मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात आलेले नाही. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यादाच बिन खात्याचे मंत्री ध्वजारोहण करणार असल्याची टीका केली. त्यावर जयंत पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधकांचे कामच आरोप करण्याचे आहे, सरकारचे काम मात्र लोकहिताचे …

Read More »

महाराष्ट्रातील या ११ पोलिसांना “केंद्रीय गृहमंत्र्यांचे उत्कृष्ट तपास पदक” “केंद्रीय गृहमंत्री तपासात उत्कृष्टता पदकां”ची घोषणा

पोलीस भरती

सन २०२२ च्या “केंद्रीय गृहमंत्री तपासात उत्कृष्टता पदकां”ची घोषणा करण्यात आली. पदक विजेत्यांमध्ये  महाराष्ट्रातील ११ पोलीसांचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सन २०२२ साठी उत्कृष्ट तपासासाठीचे “केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्टता तपास पदक” (Union Home Minister’s Medal for Excellence in Investigation) आज जाहीर करण्यात आले. देशभरातील एकूण १५१ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. या पुरस्काराची सुरुवात सन २०१८ पासून करण्यात आली. यावर्षी महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना “केंद्रीय गृहमंत्री …

Read More »

जयंत पाटील प्रति सेनाभवनावरून म्हणाले, ताकद मोठी पण देव पहिल्या सेनाभवनात… पूजा अर्जा करण्यासाठी स्वतंत्र मंत्री नेमावा

जवळपास सव्वा महिना होत आला राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न होवून. मात्र या सव्वा महिन्यात जितकी चर्चा एकनाथ शिंदे यांच्या उठावाची झाली तितकीच त्यांच्या प्रार्थनास्थळांना भेटी देण्याचीही झाली. तसेच आता शिवसेनेला प्रत्युत्तर म्हणून प्रतिसेनाभवनही बांधण्यात येणार असल्याची घोषणा शिंदे गटाकडून करण्यात आली. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता …

Read More »

बंडखोर संजय शिरसाट यांची सारवासारव, मोबाईलची तांत्रिक चुक उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आधी पोस्ट नंतर डिलीट

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ४० आमदारांनी उठाव केला. यापैकी एक असलेले औरंगाबाद पश्चिम महाराष्ट्राचे आमदार संजय शिरसाट यांनी काल रात्री अचानक महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख असा उल्लेख करत त्यांचा विधानसभेतील भाषणाचा एक व्हिडिओ ट्विटद्वारे शेअर केला. त्यामुळे शिरसाट हे मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज …

Read More »

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिली समीर वानखेडे यांना क्लिन चीट: वाचा निकाल मुस्लिम धर्मांतर केल्याचे दिसून येत नाही

आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्र आणि त्यांच्या मुस्लिम पध्दतीने केलेल्या विवाहाचा मुद्दा उपस्थित झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर समीर वानखेडे यांच्या विरोधात जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रारींचा ओघ सुरु झाला. या तक्रारींवर सुनावणी घेत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने आपला निकाल …

Read More »

अजित पवार म्हणाले, सध्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा एकच आवडता शब्द… शहिद आणि सरकारच्या भवितव्यावरून अजित पवार यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला जवळपास सव्वा महिना पूर्ण झाला. त्यानंतर या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारही झाला. परंतु या मंत्र्यांना अद्याप खात्यांचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुळ गावी अर्थात तापोळा-दरे गावात स्थानिक नागरीकांकडून नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बंड करताना थोडाजरी …

Read More »

राऊत कोठडीत गेल्यानंतर सर्वानाच एक प्रश्न, ईडी कोठडीत काय करत असतील? नवाब मलिक, अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्या मिटींगा

पत्रावाला चाळ प्रकरणी सध्या शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत हे ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ऐरवी त्यांचा दिवस राजकिय घडामोडी आणि वक्तव्यात जातो. मात्र संजय राऊत यांना तुरूंगात गेल्यानंतर त्यांचा दिवस कसा जात असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे आपच्या मराठी ई-बातम्या.कॉमच्या प्रतिनिधीने याविषयीचा कानोसा घेतला असता संजय राऊत …

Read More »