शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळात हनुमान चालिसावरून रान पेटविणारे रवि राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांचे भाजपाबरोबरील सख्य काही लपून राहिले नाही. तसेच हनुमान चालिसावरून उध्दव ठाकरे आणि शिवसेनेला जेरीस आणणाऱ्या रवि राणा यांचा या नव्या सरकारमध्ये समावेश होईल असे सांगण्यात येत असताना पहिल्या …
Read More »“तिरंग्यावरही भाजपाचे नाव” काँग्रेसने फाडला “हर घर तिरंगा” घोषणेचा बुरखा परभणीतील व्हिडिओ जारी करत केली भाजपाने माफी मागावी केली मागणी
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ ऑगस्टला हर घर तिरंगा या योजनेची घोषणा केली. या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी देशाच्या विविध भागात सर्वसामान्य नागरिकांना झेंडा खरेदी करण्यासाठी कशा पध्दतीची अडवणूक आणि छळवणूक करण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्यातच आता महाराष्ट्रात तिरंगा झेंड्यावर भाजपाचे नाव …
Read More »पालकमंत्री, खाते वाटप रखडणार, १५ ऑगस्टला कोणता मंत्री कोठे झेंडा फडकाविणार? मुख्यमंत्री कार्यालयाकडून सर्वांना आदेश जारी
विरोधकांच्या सततच्या टीकेला घाबरून अखेर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने अखेर राज्य मंत्रिमंडळाचा पहिल्या टप्प्यातील विस्तार केला. या मंत्रिमंडळ विस्तारात २० जणांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. मात्र मंत्रिमंडळ विस्तार करूनही दोन दिवस होत आले तरी कोणाला कोणते खाते द्यायचे आणि कोणाला कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री नेमायचा याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »जालन्यात वऱ्हाडी म्हणून आले अन् ३९० कोटींची मालमत्ता जप्त करून गेले आयकर विभागाने महाराष्ट्रात केलेली सर्वात मोठी कारवाई
मागील महिन्यांपासून राज्यातील राजकिय नेत्यांच्या मागे ईडी, आयकर विभागाचा ससेमिरा लागला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योजकांकडे फारशी अवैध मालमत्ता असते याची माहितीच पुढे येत नव्हती. मात्र आज आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी जालन्यात वऱ्हाडी असण्याचे सोंग घेत जालन्यातील स्टील कारखानदार, रिअल इस्टेट डेव्हलपर आणि कपडे व्यापाऱ्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापा टाकला. या छाप्यात …
Read More »राष्ट्रवादीचा सवाल, बाळासाहेबांचे दर्शन घेता मग डॉ. आंबेडकरांचे स्मारक लांब होते का… शिंदे गटाची बाळासाहेबांशी आस्था किती आणि लालसा किती हे राज्यातील जनतेला कळले आहे - महेश तपासे
ईडी सरकारमधील मंत्र्यांनी आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. हे दर्शन आस्थेपोटी घेतले असते तर त्यांनी शिवसेना फोडली नसती. शिवसेनेत बंड करायचे आणि आस्था आमची बाळासाहेबांशी आहे हे दाखवायचं यामध्ये आस्था किती आणि लालसा किती हे राज्यातील जनतेला कळून चुकलं आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य …
Read More »काळ्या कपड्यातील आंदोलनावरील मोदींच्या टीकेला राहुल गांधी यांचे प्रत्युत्तर काळे कपडे दिसले देशातली महागाई, बेरोजगारी दिसत नाही का?
नुकतेच काही दिवसांपूर्वी महागाईच्या विरोधात केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून आंदोलन केले. या आंदोलनाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने कितीही काळी जादू करण्याचा प्रयत्न केला तरी जनतेच्या मनात ते विश्वास निर्माण करू शकत नाही अशी टीका …
Read More »नाना पटोले म्हणाले, शिवसेनेने काँग्रेसशी चर्चा करायली हवी होती… शेतकऱ्यांना भरीव मदत द्या अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही
भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी २०१९ साली राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर स्थापन करण्यात आले होते. आता राज्यातील सत्तेची समिकरणे बदलली असली तरी महाविकास आघाडी म्हणून विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबद्दल शिवसेनेने काँग्रेस पक्षाशी चर्चा करायला हवी होती. विरोधी पक्षनेते ठरवताना शिवसेनेने काँग्रेसशी …
Read More »नव्या सरकारचे ९ दिवसांचे पावसाळी अधिवेशन, मात्र ३ दिवस सुट्टीचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्ट पासून
राज्यातील नव्याने स्थानापन्न झालेल्या पण अद्यापही अस्थिरतेच्या भावनेने ग्रासलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर प्रथेप्रमाणे नियमित पावसाळी अधिवेशन बोलाविण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ठरविण्यासाठी आज विधिमंडळ कामकाज समितीची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत नव्या सरकारचे नऊ दिवसांचे पावसाळी अधिवेशन बोलाविले असून त्यातील तीन दिवस सुट्टीचे राहणार आहेत. सदरचे सन २०२२ …
Read More »जयंत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा अनेकदा दिल्ली दौरा पण राज्यासाठी… शिवसेनेने विरोधी पक्षनेता निवडण्यापूर्वी आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करायला पाहिजे होती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा दिल्ली वाऱ्या केल्या. मात्र महाराष्ट्रातील जनतेसाठी त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची काहीच मागणी केली नाही. जनतेला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतःचे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात व्यस्त होते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. विधान भवनातील विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे …
Read More »मंत्री संजय राठोड यांचा चित्रा वाघ यांना इशारा, तर मी कायदेशीर मार्ग अवलंबणार चित्रा वाघ यांच्या टीकेनंतर राठोड यांचा इशारा
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या संजय राठोड यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रिमंडळातून नारळ देण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेत बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या सहकार्याने सरकार स्थापन केले. मात्र या सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात संजय राठोड यांचा समावेश करताच भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्या …
Read More »
Marathi e-Batmya