Editor

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, संघटना-व्यक्ती कोणीही असो कारवाई करणार पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर अधिकृत माहिती देणार

परिस्थिती बिघडेल असं वाटत नाही. पण आम्हीदेखील पुर्ण तयारीत आहोत. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी काळजी घेत आहोत. कोणत्याही वक्तव्यामुळे, कृतीमुळे समाजात तेढ, अशांतता निर्माण होत असेल तर अशी कोणतीही कृती कारवाईला पात्र ठरते. मग ती संघटना, व्यक्ती कोणीही असो. कारवाई केली जाईल असा गर्भित इशारा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे …

Read More »

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भात संजय राऊत म्हणाले, ही आमची पायवाट दौऱ्यासंदर्भात शिवसेना भवनात झालेल्या बैठकीनंतर दिली माहिती

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या आधी शिवसेना नेते तथा मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नियोजित अयोध्या दौऱ्याच्या अनुषंगाने आज शिवसेना भवनात सेना नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत म्हणाले, ही आमची पायवाट आहे. अयोध्या शिवसेनेसाठी नवीन नाही. गेली ३० वर्षे शिवसेना आणि अयोध्या यांचं एक नात निर्माण झालेलं …

Read More »

मागासवर्ग आयोगाचे आवाहनः ओबीसी आरक्षणप्रश्नी सूचना पाठवा १० मे पर्यंत सूचना, अभिवेदन पाठविण्याचे केले आवाहन

मागील काही महिन्यापासून राज्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे संपुष्टात आले. त्यामुळे हे गेलेले आरक्षण परत मिळविण्यासाठी राज्य सरकार आणि भाजपाकडून एकमताने विधिमंडळात आणि विधिमंडळाच्या बाहेर ठराव करून आरक्षण मिळाल्याशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घ्यायच्या नाहीत असा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार इम्पिरियल डाटा आणि नागरीकांची मते जाणून …

Read More »

वीज प्रश्नी आता मुख्यमंत्री ठाकरेंचा पुढाकार, दर आठवड्याला घेणार आढावा राज्याला वीजेबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी तात्कालीक तसेच दीघकालीन धोरण निश्चित करा-मुख्यमंत्री

राज्याला वीजेबाबत स्वंयपूर्ण करण्यासाठी विभागाने तात्कालीक स्वरूपात करावयाच्या तसेच दीर्घकालीन स्वरूपात करावयाच्या कामांचे धोरण निश्चित करावे, सध्याची वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन ८ हजार मे.वॅट औष्णिक वीज निर्मितीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज उर्जा विभागाची …

Read More »

रथाच्या तोडफोडीवरून फडणवीस म्हणाले, यात्रा थांबणार नाही ती सुरुच राहणार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

आगामी मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात पोलखोल यात्रा भाजपाने सुरु केली. परंतु चेंबूरमध्ये या रथयात्रेचे उद्घाटन होण्यापूर्वीच पोल-खोल यात्रेच्या रथाची तोडफोड करण्यात आल्याचे दिसून आले. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, पहिल्या सभेने विरोधक हादरले आहेत. मात्र आमची यात्रा थांबणार नसून ती सुरुच राहणार असल्याचा इशारा दिला. …

Read More »

परवानगी घेवून अक्षयतृतीयेला राज्यभरात महाआरती करणार मनसे नेते बाळा नांदगावकर यांची माहिती

जून महिन्यात मनसेप्रमुख राज ठाकरे हे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असून त्यादृष्टीने नियोजन करण्याची तयारी सध्या मनसेकडून करण्यात येत आहे. याशिवाय आगामी काळात राज ठाकरे यांनी केलेल्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर पक्षाची पुढील रणनीती आखण्यात येत असून अक्षय तृतीयेला राज्यात सर्व ठिकाणी महाआरती करण्यात येणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. …

Read More »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी चुलत भावाची समजूत काढावी माजी आमदार लक्ष्मण माने यांची मागणी

गुढी पाडव्याल्या झालेल्या मनसे मेळाव्यात मस्जिदीवरील भोंगे काढण्याच्या मुद्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भूमिका घेत मौलवींसह राज्य सरकारला तीन मे चा अल्टीमेटम दिला. क्यामुळे राज्यात तणाव निर्माण होवू शकतो अशी भीती व्यक्त करत माजी आमदार लक्ष्मण माने यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपले चुलत बंधू राज ठाकरे यांना आवरावे …

Read More »

भाजपा म्हणते, दिल्लीसह देशभरातील १९ ठिकाणच्या रामनवमी दंगली मागे काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी लिखित केला आरोप

१० एप्रिल रोजी रामनवमी दिनाच्या दिवशी नवी दिल्लीसह देशभरातील १९ ठिकाणी जातीय हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्यावरून काँग्रेससह सर्व विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवित या हिंसाचारावर पंतप्रधान गप्प का? असा सवाल उपस्थित केला. यापार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी खुले पत्र लिहीत या हिंसाचारामागे देशातील इतिहास जमा होत असलेला …

Read More »

ब्राह्मणांनी समर्थ रामदास व दादोजी कोंडदेव यांना महाराजांच्या गुरुपदी लादले माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची टीका

ब्राह्मणांमधील काही विद्वानांनी समर्थ रामदास व दादोजी कोंडदेव यांना महाराजांच्या गुरुपदी लादले. तर महाराजांचे शत्रू मुसलमान असल्याचा भास निर्माण करताना अफजलखानाच्या वधाचे उदाहरण दिले, पण अफजलखानाचा वध महाराजांनी स्वराज्याचे शत्रु म्हणून केला, हे या विद्वानांना ठाऊक नाही असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी …

Read More »

देशाचे नवे लष्करप्रमुख मनोज पांडे ३० एप्रिलला स्विकारणार सुत्रे

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांचे नाव देशाच्या नव्या लष्कर प्रमुख पदी निश्चित करण्यात आलं आहे. विद्यमान लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे हे येत्या ३० एप्रिलला निवृत्त होत आहेत. नवी दिल्लीत लष्कर प्रमुखांच्या कार्यालयात मनोज पांडे हे नरवणे यांच्याकडून लष्कर प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारतील. सध्या लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या श्रेणीत मनोज पांडे हे …

Read More »