मुंबई : प्रतिनिधी सातत्याने खोटे बोलून जनतेची फसवणूक आणि दिशाभूल करणे ही भाजप नेत्यांची जुनी सवय आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याच सवयीला जागून पत्रकार परिषदेत काश्मीरबद्दल बोलताना पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. खोटे बोलण्याच्या आणि जनतेला फसवण्याच्या सवयीमुळे राज्यातील जनतेने भाजपला …
Read More »कोरोना : दिवाळीचा परिणाम? तीन दिवसानंतर बाधित आणि मृतकांच्या संख्येत वाढ ५ हजार ११ नवे बाधित, ६ हजार ६०८ बरे झाले तर १०० मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी मागील तीन दिवस तीन हजाराच्या आत बाधितांची संख्या आढळून आल्यानंतर आता दिवाळीतील निष्काळजीपणाचा परिणाम दिसून आला असून या संख्येत थोडीशी वाढ होत ५ हजार ११ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधिकांची संख्या १७ लाख ५७ हजार ५२० वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ८० …
Read More »या चार सनदी अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या ओ.पी. गुप्ता नवे उच्च तंत्रशिक्षण विभागाचे सचिव
मुंबई : प्रतिनिधी दिवाळी झाल्यानंतर लगेच राज्य सरकारने चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या रिक्त प्रधान सचिव पदी ओ.पी.गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुप्ता यांच्यासह आणखी चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अरविंद कुमार यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळ मर्यादित …
Read More »पशुंना वेळेत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी मध्यवर्ती कॉल सेंटर १०८ या टोल फ्री प्रमाणे मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेसाठी १९६२ हा टोल फ्री क्रमांक प्रस्तावित
मुंबई : प्रतिनिधी पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी संनियंत्रणासाठी पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे येथे मध्यवर्ती कॉल सेंटरच्या स्थापनेसाठी इंडसइंड बँक यांची उपकंपनी असलेली भारत फायनांस इन्क्लुजन लिमिटेड या कंपनीसोबत मंत्रालयात सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व …
Read More »भाजपाच्या विरोधाची वर्षपूर्ती महाराष्ट्र विरोधी राजकारण करण्यात भाजपा यशस्वी होतेय ?
देशात आणि राज्यात वारंवार काँग्रेसची सत्ता येत असताना काँग्रेसेतर पक्षांना मिळणारी मते आणि त्यांना मिळणाऱ्या निवडणूकीतील जागांमुळे असं म्हटलं जायचं कि, लोकशाहीत जर सर्व काँग्रेस विरोधी पक्ष आले तर काँग्रेस कधीच सत्तेत येणार नाही आणि विरोधकच वर्षानुवर्षे सत्तेत राहीतील. या म्हणण्यातील सत्यता महाराष्ट्रात उतरली. परंतु ती काँग्रेसबाबतीत नाही तर काँग्रेसचा …
Read More »कोरोना : सलग ३ ऱ्या दिवशी ३ हजाराच्या आत बाधित आणि मृतकांच्या संख्येत घट २ हजार ८४० नवे बाधित, ५ हजार १२३ बरे झाले तर ६८ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी मागील तीन दिवसांपासून राज्यातील बाधितांची संख्या ३ हजाराच्या आत असून मागील २४ तासात २ हजार ८४० नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १७ लाख ५२ हजार ५०९ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ८१ हजार ९२५ इतक्यावर आली आहे. त्याचबरोबर ५ हजार १२३ जण बरे झाल्याने घरी …
Read More »गरीबीमुळे शिक्षण सोडाव्या लागलेल्या मंत्र्याने अखेर पदवी मिळवलीच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा अनोखा आदर्श
मुंबई : प्रतिनिधी घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडून स्वत:बरोबर घरच्यांच्या पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी नोकरी धरली. मात्र कालापरत्वे या विपरीत परिस्थितीवर मात करत सधनता मिळविल्यानंतरही आणि व्यस्त राजकिय जीवनातही आपले शिक्षण पूर्ण करून पदवी मिळणारे थोडेच असतात. या थोड्यांमध्ये आता राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश झाला असून त्यांनी नुकतीच …
Read More »खुशखबर: अनुसूचित जमातीमधील या विद्यार्थ्यांना मिळणार २६ हजाराचे आर्थिक सहाय्य मंत्री अॅड. के.सी. पाडवी यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षेची व मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी या वर्षापासून आर्थिक सहाय्य करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दरमहा १२ हजार रुपये विद्यावेतन व १४ हजार रुपये पुस्तक खरेदीसाठी असे एकूण २६ हजार रुपये देण्यात …
Read More »खोटं बोलणार्या ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार भाजपा आ. अतुल भातखळकर यांचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी कोरोना काळातील वाढीव व चुकीच्या वीज बिलांमध्ये सवलत देणार नाही असं सांगून खोटं बोलणार्या ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याचे भाजपचे नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी इशारा दिला. भाजपाने अन्यायी वीज बिलांच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर वीज बिलात सवलत देऊ असे सरकारने जाहीर केले, तसा प्रस्ताव …
Read More »वाढीव वीज बिलाबाबत ऊर्जामंत्र्यांची घोषणा आणि दोन पक्षातील राजकारण सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा नाहीच
मुंबई : प्रतिनिधी लॉकडाऊन काळातील मार्च ते जून अखेर पर्यंत या चार महिन्याच्या कालावधीत आलेल्या वाढीव वीज बिलाबाबत राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देता येणार नसल्याची स्पष्ट कबुली ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली. कोरोना लॉकडाऊनमधून सूट देण्यास सुरुवात केल्यानंतर वीज वितरण महामंडळाने सुरुवातीला चार महिन्याच्या एकूण मीटरचे रिडिंग घेवून सर्वच …
Read More »
Marathi e-Batmya