Editor

कोरोना : निर्बंध जाहिर केलेल्या जिल्ह्यांमध्ये बाधितांच्या संख्येत वाढ ६ हजार ११२ नवे बाधित, २ हजार १५९ बरे झाले तर ४४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने मुंबईसह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात टप्प्यानुसार संचार बंदी लागू करत काही प्रमाणात निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला. निर्बंध घातलेल्या पहिल्याच दिवशी नाशिक मंडळ, औरंगाबाद, पुणे, नागपूर, लातूर आदी मंडळात कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत चांगलीच वाढ झाल्याचे दिसून …

Read More »

खा. सुप्रिया सुळेंचे आव्हान, एक फडणवीस क्या करेगा, महाराष्ट्र एक तरफ है ५५ वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पवारसाहेबांना कधी अंतर दिले नाही

नवी मुंबई: प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते पवारसाहेबांनी रिटायर्ड व्हावं. छान मार्गदर्शन केले होते. मात्र महाराष्ट्राने पवारसाहेबांना रिटायर्ड करायचं नाही हे ठरवलं होतं. त्यामुळे ‘एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा महाराष्ट्र एक तरफ और देवेंद्र फडणवीस एक तरफ’ असा जोरदार टोला लगावतानाच पवार साहेब म्हटले असते मी आता देवेंद्र फडणवीस बोलत …

Read More »

नाना पटोले म्हणाले, फडणवीसांची वक्तव्य फारशी मनावर घ्यायची नसतात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे प्रत्युत्तर

मुंबई: प्रतिनिधी केंद्रात युपीएचे सरकार असताना पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून टीका करणारे बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार आता केंद्रातील भाजपा सरकारने दरवाढ केली तरी टीका करत नसल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकताच या दोघांना इशारा दिला. त्या इशाऱ्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पटोले हे नवे नवे अध्यक्ष झाल्याचा …

Read More »

राज्याच्या महसूल उत्पन्नात २५ ते २८ टक्के घट: मात्र कर्जात वाढ केंद्रानेही घेतला हात आखडता

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन आगामी १ मार्च २०२१ पासून सुरु होत आहे. यापार्श्वभूमीवर वित्तीय परिस्थिती पुन्हा बिकट असल्याचे दिसून येत असून मागील ८ ते ९ महिने कडक लॉकडाऊन राहिल्याचा परिणाम म्हणून राज्याच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर तूट आली आहे. तरीही लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यामुळे काही प्रमाणात आर्थिक क्षेत्रे काही …

Read More »

कोरोना: महाराष्ट्रातील या जिल्ह्यात संचारबंदीसह हे निर्बंध जारी राज्य सरकार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी आदेश

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्ह्यांमध्ये यासंदर्भातील निर्बंध आदेश जारी करण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दर रविवार संपूर्ण तर रात्रीही संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्ण तपासणीचा वेग वाढविण्याचे निर्देश देण्यात …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : पदोन्नतीतील १००% रिक्त जागा भरणार आरक्षित जागांसह तात्पुरत्या स्वरूपात भरण्याचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारी सेवेतील आरक्षित पदोन्नतीतील पदांसह सर्व पदे सेवा ज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला. त्या अनुषंगाने यासंदर्भात शासन निर्णयही जाहिर करण्यात आला आहे. मात्र पदोन्नतीतील आरक्षण देण्याबाबतची याचिका सध्या सर्वोच्च न्यायालयात असल्याने हि सर्व पदे तात्पुरत्या स्वरूपात सेवा ज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शासन निर्णयात …

Read More »

मुंबईकरांनो सावधान ! कोरोनाचे हे नियम मोडाल तर होणार गुन्हा दाखल महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांचे सक्‍त आदेश

मुंबई : प्रतिनिधी कोविड-१९ विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असतानाच मागील काही दिवसांत रुग्‍ण संख्‍या वाढत असल्‍याने संपूर्ण यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे आहे. वाढती रुग्‍ण संख्‍या पाहता घरी विलगीकरण राहणाऱ्यांच्‍या हातावर शिक्‍के मारावेत, त्‍यांनी नियम मोडला तर त्‍यांच्‍यावर गुन्‍हे दाखल करावेत. लग्‍न समारंभ आयोजनाचे नियम मोडणाऱया आयोजकांसह व्‍यवस्‍थापनांवरही गुन्‍हे दाखल …

Read More »

मंत्री संजय राठोडचे प्रकरण म्हणजे “नो वन किल्ड जेसिका” विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा टोला

मुंबईः प्रतिनिधी बीडच्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्याचे मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात पोलिसांकडे भक्कम पुरावे आहेत. मात्र त्या प्रकरणाची अवस्था नो वन किल्ड जेसिका या सटायर फिल्म सारखी असल्याचा उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित संसदीय कामकाज सल्लागार मंडळाच्या बैठकीनंतर ते बोलत होते. …

Read More »

विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन १ तारखेपासून पण…. एक आठवड्याचे कामकाज निश्चित त्यानंतर निर्णय पुढचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन १ मार्चपासून मुंबईत होत असून पहिल्या आठवडाभराचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी पुन्हा संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून त्यात पुढील कालावधीबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिली. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी …

Read More »

खर्डी आणि अंबरनाथमधील जमिनीत एमआयडीसीतील कोणाचा रस? डोंगराळ आणि संवेदनशील पर्यावरण भागातील जमिनीची खरेदी

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात उद्योजकांना सहजरीत्या जमिनी उपलब्ध व्हाव्यात यासाठी उद्योग विभागाच्या अखत्यारीत असलेल्या एमआयडीसीकडून प्रत्येक जिल्ह्यात-शहरात जमिनीची खरेदी केली जाते. याचाच भाग म्हणून एमआयडीसीने वाशिंद-शहापूरच्या दरम्यान संवेदनशील पर्यावरणीय क्षेत्रात मोडणारी १ हजार एकर आणि अंबरनाथ मधील डोंगराळ असलेली जमिन जी कोणत्याही स्वरूपात उद्योग उभारणीसाठी अनुकूल नसताना का खरेदी केली …

Read More »