Editor

विरोधी पक्षनेत्यांच्या आठवणीनंतर २६-११ तील शहिदांना आदरांजली शहिदांचा सरकारला विसर पडल्याचा विरोधकांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याला १० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभर या शहिदांना आदरांजली अर्पण केली जात आहे. मात्र राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाही २६-११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांचा विसर राज्य सरकारला पडल्याचे दिसून येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत केला. अखेर विरोधी पक्षनेत्यांनी …

Read More »

आरक्षणाबाबत निर्णय घेता येत नसल्याने सरकार पळ काढतेय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी आरक्षणाबाबत सरकार चालढकलपणा करण्याचा प्रयत्न करत असून सरकारला निर्णय घेता येत नसल्याने सरकार यापासून पळ काढत आहे असा आरोप विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केला. सभागृहनेते चंद्रकांत पाटील हे मागील आठवडयात तेच बोलत आहे आणि आजही तेच बोलत आहेत. त्यामुळे सरकारकडे आलेला मागास आयोगाचा अहवाल आणि टीसचा अहवाल …

Read More »

चर्चेसाठी सरकारच्या विरोधकांना मिनतवाऱ्या विरोधकांकडून सभागृहातच ठिय्या आंदोलन सुरु

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आणि धनगर आरक्षणासंद़र्भातील टीसचा अहवाल मांडवा या मागणीवरून विरोधकांनी सभागृहातच ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज चालविणे अशक्य बनल्याने अखेर राज्य सरकारकडून विरोधकांना भर सभागृहातच कामकाज चालवायचे असल्याने विरोधकांनी आंदोलन सोडून चर्चेला येण्यासंदर्भात राज्य सरकारकडून विरोधकांना मिनतवाऱ्या करण्यात येत …

Read More »

आरक्षणासंबधीचे दोन्ही अहवाल सादर करा, अन्यथा कामकाज चालू देणार नाही विरोधकांकडून दुसऱ्या आठवड्यातही विधानसभेचे कामकाज तहकूब

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोग आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा धनगर आरक्षणासंदर्भातील अहवाल विधानसभेत मांडण्याची मागणी विरोधकांनी दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी पुन्हा केली. तसेच हे दोन्ही अहवाल सभागृहात मांडल्याशिवाय कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा दिला. तरीही अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कामकाज रेटण्याचा प्रयत्न केला. …

Read More »

सनातन संस्थेला वाचवणारे सरकारमधील साधक कोण? प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी कर्नाटक सरकारच्या विशेष तपास पथकाने गौरी लंकेश हत्या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात सनातन संस्थेचे नाव आरोपी म्हणून घेतले आहे. यातूनच सनातन संस्था ही अत्यंत घातक संस्था असून हिंसक कारवायांमध्ये गुंतलेली आहे, या वस्तुस्थितीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. या अगोदरही या संदर्भातील अनेक पुरावे समोर आले असतानाही …

Read More »

मोदी हटाव देश बचाव…संविधान बचाव …देश बचाव…इन्कलाब जिंदाबाद राजगृह ते चैत्यभूमी संविधान पालखी; परिसर युवाशक्तीने फूलुन गेला

मुंबई: प्रतिनिधी हम सब एक है…इनकलाब जिंदाबाद…संविधान आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे…लाठीकाठी खायेंगे संविधान बचायेंगे…मोदी हटाव देश बचाव अशा घोषणा देत आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार करत आज देशातील १४ युवा संघटनांनी अभूतपूर्व अशी संविधान बचाव रॅली काढली. देशातील १४ राजकीय प्रमुख युवा संघटना एकत्र येवून ‘यूनायटेड …

Read More »

अयोध्येतल्या राम मंदीरासाठी शिवसेनेकडून मुंबईसह राज्यभरात महाआरती राम मंदीर आणि हनुमानाच्या मंदीरात संध्याकाळी आरत्या होणार

मुंबई : प्रतिनिधी “पहिले राम मंदीर फिर सरकार” चा नारा देत अयोध्येत शिवसेने महाआरतीचे आयोजन केले. ही महाआरती आज शनिवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास होणार असून नेमक्या त्याचवेळेत मुंबईसह राज्यात ठिकठिकाणच्या राम मंदीरात आणि हनुमान मंदीरात या महाआरत्या शिवसेनेकडून करण्यात येणार आहेत. त्यामुळे आज संध्याकाळी संपुर्ण मुंबईत महाआरत्यांचे चित्र पाह्यला …

Read More »

जिग्नेश मेवाणी, कन्हैयाकुमार, हार्दीक पटेल यांच्या उपस्थितीत संविधान बचाव रँली १४ संघटनांच्यावतीने २५ नोव्हेंबरला राजगृहापासून रँली काढणार

मुंबई: प्रतिनिधी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींना प्रणाम करुन त्यांच्या संविधानाच्या पालखीचे भोई होणार असून देशातील वाढत्या फॅसिझमच्याविरोधात युनायटेड यूथ फ्रंट आणि १४ संघटनाच्या माध्यमातून युवकांचा हा लढा तीव्र करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केले. तसेच या रँलीत गुजरातचे आमदार जिग्नेश …

Read More »

आदीवासींच्या वनजमिनींची प्रकरणे तीन महिन्यात निकाली काढणार मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिल्याची प्रतिभा शिंदे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आदीवासींच्या जमिनीच्या प्रश्नी आठ महिन्यानंतरही दिलेल्या आश्वासनानुसार कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे पुन्हा याप्रश्नी मोर्चा काढल्यानंतर प्रलंबित राहीलेल्या जमिनीचे दावे पुढील तीन महिन्यात निकाली काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आदीवासी शेतकरी मोर्चाच्या समन्वयक प्रतिभा शिंदे यांनी दिली. आदीवासींच्या जमिनीच्या संदर्भात आठ महिन्यापूर्वी विधानभवनावर …

Read More »

राज्यातील सरकारी जमिनीवरील अतिक्रमणेही आता नियमित होणार ५०० चौरस फुट क्षेत्रफळाची जमिन मोफत तर त्यापेक्षा जास्तीच्या जमिनीला पैसे भरावे लागणार

मुंबई : प्रतिनिधी मुंबई वगळता राज्यातील विविध भागातील शासकिय जमिनीवरील अतिक्रमित झोपडीधारक अथवा निवासी वापर करणाऱ्यांना आतापर्यत कायदेशीर मान्यता नव्हती. मात्र पंतप्रधान आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीमधील सरकारी जमिनीवरील अतिक्रमणधारकांनाही पात्र करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यासंबधीचा शासन निर्णयही राज्य सरकारने नुकताच जाहीर केला. मुंबईतील …

Read More »