मुंबई : प्रतिनिधी राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. दुष्काळाची ही तीव्रता कमी करण्यासाठी शासनाने अधिकाधिक निधी वितरीत करणे गरजेचे असताना राष्ट्रकुल संसदीय परिषदेवर करोडो रुपये खर्च करणे योग्य नाही, त्यामुळे ही परिषद रद्द करावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. सातवी राष्ट्रकुल संसदीय परिषद १५जानेवारी …
Read More »सरकारबरोबरची चर्चा फिसकटल्याने कर्मचारी संपावर जाणार ३५९ स्थानिक स्वराज्य संस्थामधील ८० हजार कर्मचारी संपावर जाणार असल्याची डॉ.कऱ्हाड यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ३५९ नगरपरिषदा व नगरपंचायतीमधील तब्बल ८० हजार कर्मचाऱ्यांच्या मागण्याप्रकरणी १ जानेवारी २०१९ पासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तरीही राज्य सरकारने बोलाविलेल्या बैठकीत पुन्हा थातूर-मातूर उत्तर दिल्याने मागण्या मान्य झाल्याशिवाय शांत बंसणार नाही असा इशारा नगरपालिका, नगरपंचायत कर्मचारी संघटना संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आला. तसेच १ …
Read More »कांद्याचे भाव पडल्याने उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून बाजारात कांद्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर घसरण होत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बाजारात कांदा विकण्याऐवजी रस्त्यावर फेकून देणे पसंत केले. या घसरणाऱ्या किंमतीपासून हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल २०० रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आज बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात …
Read More »आर. के. लक्ष्मण यांचे काम ‘टाईमलेस’ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 'टाईमलेस लक्ष्मण' पुस्तकाचे प्रकाशनावेळी प्रतिपादन
मुंबई : प्रतिनिधी आर. के. लक्ष्मण यांनी व्यंगचित्राद्वारे केलेले काम ‘टाईमलेस’ राहील, असे गौरवोदगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. व्यंगचित्रकार म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त दिवंगत आर. के. लक्ष्मण अर्थात रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण यांच्या कारकिर्दीवर आधारित ‘टाईमलेस लक्ष्मण’ पुस्तकाचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजभवन येथे करण्यात आले आहे. यावेळी राज्यपाल चे. …
Read More »धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करुन घेण्याचा केंद्राकडे प्रस्तावच नाही फडणवीस सरकारने धनगर समाजाला फसविल्याचा खा.सुप्रिया सुळे यांचा आरोप
नवी दिल्ली : प्रतिनिधी राज्यातील धनगर समाजाला शेड्यूल्ड ट्राईब अर्थात एसटी प्रवर्गात समाविष्ट करुन घेण्यासंदर्भातला प्रस्तावच राज्य सरकारने पाठविला नसल्याची माहिती जनजातीय मंत्रालयाने लोकसभेत दिल्याने देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाची फसवणूकच केली असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. धनगर आरक्षणाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत प्रश्न उपस्थित …
Read More »वडार समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार नाईक महामंडळाच्या माध्यमातून १०० कोटींची तरतूद करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
सोलापूर : प्रतिनिधी वडार समाजाच्या विकासासाठी वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उपआराखडा तयार करून त्यासाठी १०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करणार आहे. तसेच या समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत या समाजाच्या विविध समस्या निराकरण करण्यासाठी इदाते आयोगाच्या शिफारशींचा विचार करणार …
Read More »मेगा भरती आधी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा महाराष्ट्र कंत्राटी कर्मचारी महासंघाकडून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारच्या विविध विभागात १ लाख ५० हजार पदे रिक्त असून यातील ७२ हजार रिक्त पदांसाठी मेगा भरती घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र त्या आधी राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समाविष्ट करावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्यावतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्याची …
Read More »राफेलच्या निकालाबाबत सरकारने केलेल्या अर्जाबाबत सांगता येणार नाही संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांची सारवासारव
मुंबई: प्रतिनिधी संरक्षणासाठी राफेल विमान खरेदीप्रश्नी न्यायालयाने दिलेल्या निकालात दुरूस्ती करण्यासाठी केंद्र सरकारकडून सादर करण्यात आलेल्या अर्जाबाबत सांगता येणे योग्य होणार नाही. सदरची बाब न्यायालयीन असून न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्राने सर्व कागदपत्रे दाखल करण्यात आली होती. या दस्तऐवज नुसार न्यायालयाचे लेखी आदेश येणे अपेक्षित होते. या आदेशात काही शब्द या कागदपत्राला …
Read More »दुष्काळासह इतर प्रश्नांचा सामना करण्यासाठी पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विठ्ठलाला साकडे
पंढरपूर : प्रतिनिधी राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी आणि त्याच्या पशूधनला दिलासा देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ताकद मिळावी, असे साकडे घालत आशीर्वाद पांडुरंगाकडे मागितला असल्याचे प्रतिपादन मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. पंढरपूरमधील सर्व विकास प्रकल्प वारकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना सोबत घेऊनच मार्गी लावणार असल्याचेही …
Read More »मुंबईकरांसाठी कोस्टल रोड टोलमुक्त रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी मुंबईकरांनी शिवसेनेला भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे निवडणूकीत जी आश्वासन देतो ती आम्ही पूर्ण करत असून स्वप्न वास्तवतेत उतरविण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात येतात. निवडणूकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुंबईकरांच्या सेवेसाठी कोस्टल रोड उभारणीच्या कामास मुंबई महापालिकेकडून सुरुवात करण्यात येत असल्याचे जाहीर करत हा रोड टोल मुक्त राहणार असल्याची घोषणा …
Read More »
Marathi e-Batmya