Editor

शासन साखर उत्पादकांची पाठिशी एफआरपी देण्यात महाराष्ट्र अव्वल असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

पुणे : प्रतिनिधी साखर उद्योग शेतकऱ्यांचा कणा असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ऊसाच्या हार्व्हेस्टरसाठी राज्य शासनाने ४० लाखांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून एफआरपी देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. तसेच मराठवाड्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू करण्यासाठी …

Read More »

महात्मा फुले, डॉ. आंबेडकर चरित्र साधने समितीवरील सदस्यांना कोणी ओळखता का? लिंबाळे, गवस व्यतीरिक्त एकाचीही माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे नाही

मुंबई : गिरिराज सावंत-खंडूराज गायकवाड राज्याला समतेच्या मार्गावर चालण्यासाठी दिशा दाखविणारे महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य आणि विचार नव्या पिढीला समजावे यासाठी राज्य सरकारकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समितीच्या माध्यमातून त्यांचे साहित्य प्रकाशित केले जाते. या महापुरूषांची योग्य ते विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि …

Read More »

डॉ. दाभोलकर यांच्या मारेक-यांना सरकारच्या इच्छेनुसार जामीन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमध्ये सामील असलेल्या तीन आरोपींना केवळ ९० दिवसांत आरोपपत्र दाखल केले नाही म्हणून मिळालेला जामीन हा अतिशय संतापनक असून या आरोपींना जामीन मिळावा ही सरकारचीच इच्छा असल्याचा घणाघाती आरोप करून सरकारमधील साधकांचे चेहरे जनतेसमोर उघडे पडत चालले आहेत, अशी कठोर टीका महाराष्ट्र प्रदेश …

Read More »

दुष्काळ आणि आपत्तीसाठीचा १४ हजार कोटींचा निधी सरकारकडून इतर कामावर खर्च मराठवाडा अनुशेष निर्मुलन आणि विकास मंचचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्यात यंदा तीव्र दुष्काळ असताना जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापनाचे बँक खाते उघडून त्यातील रकमेच्या आधारे दुष्काळासाठी मदत निधी उपलब्ध करणे राज्य सरकारवर बंधनकारक आहे. तरीही राज्य सरकारने जिल्हापातळीवर खाते उघडण्याऐवजी राज्याच्या आपत्ती निवारणासाठी राखीव असलेली १३ हजार ५०० कोटी रूपयांची रक्कम मागील चार वर्षापासून इतर कामावर खर्च करण्यात …

Read More »

राफेलबाबत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि देशाची माफी मागावी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहाराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या निकालामुळे सत्याचा विजय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राजकीय फायद्यासाठी खोटे आरोप करून देशाची सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, देशातील जनतेची आणि सैनिकांची माफी मागावी अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब …

Read More »

जलसंधारण विभागाचे प्रणेते अरुण बोंगीरवार यांचे निधन मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी वाहीली श्रध्दांजली

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी सुक्ष्म जलसंधारण प्रकल्पाची कामे सुरु करत त्यासाठी स्वतंत्र संकल्पनेच्या माध्यमातून जलसंधारण विभागाचे प्रणेते ठरलेल्या आणि राज्याचे माजी मुख्य सचिव राहीलेले अरुण बोंगीरवार यांचे आज शुक्रवारी पहाटे दीर्घ आजाराने वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा पियुष, कन्या दीप्ती आणि गार्गी असा परिवार आहे. मुख्यमंत्र्यांचे …

Read More »

नोटिशीवरून मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणे राष्ट्रवादीची बौद्धिक दिवाळखोरी भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा टोला

मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा प्रयत्न केला असता ती दाखल करून घ्यावी की नाही याविषयी बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे नोटीस बजावली. या घटनेचे भांडवल करून राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांचा  राजीनामा मागणे ही त्या पक्षाची बौद्धिक दिवाळखोरी असल्याचा टोला भाजपाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी लगावला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात त्यांच्यावर दाखल असलेल्या सर्व प्रकरणांची माहिती स्पष्टपणे देण्यात आली होती. या संदर्भात यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका उच्च न्यायालयाने तथ्यहीन मानून फेटाळली होती. संबंधित …

Read More »

मुख्यमंत्र्यांना आलेली ती नोटीस फक्त विचारणा करणारी मुख्यमंत्री कार्यालयाचा खुलासा

मुंबई : प्रतिनिधी निवडणूकीच्या कालावधीत दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये स्वत:बद्दलची सर्व माहिती दिलेली आहे. तरीही अँड.सतीश उके यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सदरची याचिका न्यायालयात दाखल करून घ्यायची की नाही याबाबत विचारणा करणारी नोटीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविली असल्याचा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाने …

Read More »

स्वत:वरील गुन्हे लपविल्याने मुख्यमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी निवडणूक प्रतिज्ञापत्रात फौजदारी गुन्हे लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार देवेंद्र फडणवीस यांनी गमावला आहे. सुप्रीम कोर्टात त्यांची निवडणूक रद्द होईल तेव्हा होईल. परंतु त्यांनी मुख्यमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा दयावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना …

Read More »

भाजपा नेत्यांनाच पडला विसर स्व. गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीचा आम्ही फक्त ट्विटरवर अभिवादन वाहणार

मुंबई : प्रतिनिधी भाजपला मराठावाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या गावागावात पोहोचविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती. परंतु या नेत्याच्या माध्यमातून पक्षाच्या पदावर तर कधी सरकार दरबारी कामे करून घेण्यासाठी फिरणाऱ्या आताच्या भाजप वरिष्ठ नेत्यांना मुंडे यांच्या जयंती दिनीच त्यांचा विसर पडला आहे. केवळ प्रदेश कार्यालयातील …

Read More »