Editor

पुनर्वसित व्यक्तींना निर्बंधमुक्त सवलती द्याव्यात लोकशाही दिनात मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विविध प्रकल्पातील पुनर्वसित व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या सवलती निर्बंधमुक्त असाव्यात. प्रकल्पग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या जमिनींना वर्ग एकचा दर्जा देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. मंत्रालयात झालेल्या १०७ व्या लोकशाही दिनात वर्धा येथील प्रकल्पग्रस्ताच्या तक्रारीवर सुनावणी करताना मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. यावेळी मुख्य सचिव दिनेश कुमार …

Read More »

मुख्यमंत्री म्हणतात एकाही विकास कामांचा आर्थिक व्यवहार्य अहवाल नको कर्जातील निधी व्यतीरिक्त वाढीव रकमेचा बोजाही राज्याच्या तिजोरीवर पडणार

मुंबई : गिरिराज सावंत राज्याच्या डोक्यावर तब्बल ४ लाख १३ हजार कोटी रूपयांचे कर्ज असतानाच आणखी ३ लाख ४१ हजार कोटी रूपयांचे कर्ज काढून ठिकठिकाणी विकास कामे राज्य सरकारकडून करण्यात येत आहेत. मात्र सध्या सुरु असलेल्या एकाही विकास कामाचा अर्थात पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आर्थिक व्यवहार्य अहवाल अर्थात फायनान्शियल व्हायबल रिपोर्ट …

Read More »

राज्यातील विविध विभागाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यातच सर्वाधिक खर्च एप्रिल अखेर ८९ टक्के खर्च

मुंबई : प्रतिनिधी राज्याला गतीमान सरकार देण्याचा नारा देत सत्तेवर आलेल्या भाजपनेही विविध विकास कामांवर वर्ष अखेरीसच खर्च करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. सरकारच्या अखत्यारीत असलेल्या बहुतांष विभागांकडून फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यातच विकास कामांवर खर्च केल्याचे दिसून येत असून या शेवटच्या तीन महिन्यात जवळपास अर्थसंकल्पिय तरतूदीच्या ४५ टक्के रक्कम …

Read More »

स्वरगंगेच्या काठावरती वचन दिलेला शुक्रतारा सोडून गेला पहाटे अखेरचा स्वरश्वास घेतला

मुंबई : प्रतिनिधी मागील तीन दशकाहून अधिक काळ आपल्या स्वरावजाने अबालवृध्दांवर शुक्रताऱ्याची मोहिनी घालणारे आणि मराठी स्वरविश्वात शुक्रताऱ्यासारखे अढळस्थान निर्माण करणारे गायक अरूण दाते यांनी आज रविवारी पहाटे सहा वाजता कांजूर मार्ग येथील आपल्या राहत्या घरी अखेरचा स्वरश्वास घेतला. ते ८४ वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते सतत आजारी होते. …

Read More »

स्मार्ट सिटी- क्लिन सिटीबरोबरच “ग्रीन सिटी” संकल्पना अंमलात आणा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे बांधकाम व्यावसायिकांना आवाहन

मुंबई  : प्रतिनिधी स्मार्ट सिटी- क्लिन सिटी संकल्पनेबरोबर “ग्रीन सिटी” संकल्पना अंमलात आणा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.  राज्यात जुलै महिन्यात होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी आज वनमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम व्यावसायिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. हरित शहरांच्या निर्मितीमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी योगदान …

Read More »

शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे खरीप पीक हंगाम आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुढील महिना-दीड महिना महत्वाचा असून खरीपात गुणवत्तापूर्ण बियाणे, खते पुरवठा करतानाच हंगामातील शेतकऱ्यांची आर्थिक गरज भागवण्याची आवश्यकता आहे. ज्या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळाली आहे. अशांना नव्याने कर्ज मिळते की नाही, याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार विभागाच्या यंत्रणेची मदत घेऊन खरीप पीक कर्ज …

Read More »

‘मस्का’ लावत अभिनेता बनला दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत

मुंबई : प्रतिनिधी प्रियदर्शन जाधवची मुख्य भूमिका असलेला बहुचर्चित ‘सायकल’ हा विविध पुरस्कार सोहळ्यांपासून चित्रपट महोत्सवांपर्यंत गाजलेला सिनेमा कालच प्रदर्शित झाला आहे. अशातच ‘खाण्यापेक्षा लावण्यात मजा आहे’ अशी धमाकेदार टॅगलाईन असलेल्या ‘मस्का’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझरही लाँच करण्यात आला आहे. आजवर कधी छोट्या पडद्यावरील तर कधी मोठ्या पडद्यावरील विविध …

Read More »

टकमक टोकावर बसून दिग्पालने लिहिली सिनेमाची पटकथा सिनेमासाठी जवळजवळ सहा वर्षे संशोधन

मुंबई : संजय घावरे एखादा सिनेमा लिहायचा म्हटला की त्यासाठी त्या पोषक वातावरण गरजेचं असतं असं सर्वच लेखक सांगतात. पटकथेसाठी आवश्यक असणाऱ्या कल्पना विस्तारासाठी काहीजण एकांतात जातात, तर काही गर्दीच्या शहरातही स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतात… काही ध्येयवेडे लेखक-दिग्दर्शक मात्र याला अपवाद ठरतात. या पठडीत मोडणारे लेखक पटकथेसाठी आवश्यक असणारी …

Read More »

वृक्षरोपणामुळे महाराष्ट्र देशात पहिला भारतीय वन सर्व्हेक्षण अहवालानुसार वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात वाढ

मुंबई :प्रतिनिधी राज्यातील जनतेने “मन की बात” ऐकताना “वन की बात” केली त्यामुळे वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादनामध्ये राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आले.  भारतीय वन सर्व्हेक्षण अहवालानुसार राज्यात  दोन वर्षात या क्षेत्रात २७३ चौ.कि.मी ची वाढ झाली. याचे सर्व श्रेय शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमात, पर्यावरण रक्षणात सहभागी झालेल्या जनतेला आणि संस्थांना आहे, असे प्रतिपादन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. राज्यात १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत होणाऱ्या १३ कोटी …

Read More »

उध्दव ठाकरेच्यां आश्वासनामुळे शेतकऱ्याने आत्महत्येचा विचार बदलला उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी मारूती कुदळेंनी केले स्वत:ला परावृत्त

मुंबई : प्रतिनिधी देशात आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही म्हणून काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पत्र लिहीत आत्महत्या केल्याच्या घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आल्या. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर आत्मदहनाच्या विचारापासून शेतकरी पारावृत्त झाल्याची चांगली घटना नुकतीच उघडकीस आली. मागील ८ ते …

Read More »