Editor

नाणार प्रकल्प करारप्रश्नी शिवसेनेचा मंत्रिमंडळ बैठकीत निषेध गुरूवारी मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या मंत्र्यामध्ये होणार चर्चा

मुंबई : प्रतिनिधी कोकणातील नाणार प्रकल्पाला होत असलेल्या विरोधामुळे शिवसेनेचे उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी जमिन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा केली. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही सादर केले. तरी राज्य सरकारने नाणार प्रकल्पासाठी आखाती देशातील तीन कंपन्यांशी करार केला. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे …

Read More »

शिवसेनेसाठी फंड गोळा करण्यासाठीच प्लास्टीक बंदी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने आगामी निवडणुकांसाठी प्लास्टिक उत्पादक व्यापाऱ्यांकडून निवडणूक फंड गोळा करण्यासाठी प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतल्याचे अशी बोचरी टिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर केली. प्लॅस्टिकबंदीचा निर्णय हा सरकारचा आहे की एका खात्याचा आहे हे स्पष्ट होत नाही. मुख्यमंत्री …

Read More »

अघोषित आणीबाणी लादणाऱ्यांना लोकशाहीवर गप्पा मारण्याचा नैतिक अधिकार नाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा पंतप्रधानांवर पलटवार

मुंबई : प्रतिनिधी गेल्या चार वर्षांपासून देशावर अघोषीत आणीबाणी लादणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकशाहीच्या गप्पा मारण्याचा नैतिक अधिकार नसल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.    देशात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी यांना वेठीस धरले जात आहे. त्यांच्यावरील अत्याचारात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. दिवसाढवळ्या …

Read More »

लोकशाही पायदळी तुडविणारेच लोक आता संविधान बचावचा नारा देतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॉंग्रेसवर हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी व्यक्ती स्वातंत्र  हिरावून घेत ज्यांनी देशात जाचक आणीबाणी लादून संविधान पायदळी तुडवले, तेच लोक आता संविधान बचावचा नारा देत असल्याची टीका काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत २६ जून १९७५ साली इंदिरा गांधी सरकारने देशात आणबाणी जाहीर करत सरकार विरोधी बोलणाऱ्यांना तुरुंगात डांबण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी …

Read More »

एस.टी.च्या त्या १ हजार १० रोजंदारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा समावेश पण कंत्राटीवर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना उशीरा जाग

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या अघोषित संपात सहभागी झाल्याबद्दल १ हजार १० कर्मचाऱ्यांच्या सेवा एस.टी.च्या स्थानिक प्रशासनाने सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना पुन्हा सेवेत घेण्याबाबत अखेर दिवाकर रावते यांना उशीराने जाग आली असून तसे निर्देश त्यांनी एस.टी.प्रशासनाला दिले. मात्र या कर्मचाऱ्यांना कंत्राटी पध्दतीवरच नव्याने नियुक्ती …

Read More »

राज ठाकरे आदीत्यला घाबरतोय काय ? रामदास कदम यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला

मुंबई : प्रतिनिधी प्लास्टिक बंदीसाठी शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला असल्याने याच मुद्यावरून शिवसेना आणि मनसे मध्ये जुंपली आहे.  त्यातच आता राज ठाकरे अर्थात काका आपला पुतण्या आदीत्य ठाकरेला घाबरतोय काय ? असा सवाल करत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला चांगलाच लगावला. …

Read More »

प्लास्टिक बंदीवरून सामान्य जनतेवर कारवाई नाही थर्मोकोल बंदीबाबत अद्याप निर्णय नसल्याची पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी सामान्य जनतेने प्लास्टिक बंदीबाबत घाबरून जाऊ नये असे आवाहन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी करत याप्रश्नावरून शासन सामान्य जनतेवर कठोर पणे कारवाई करणार नसल्याचे आश्वासन देत सध्या उत्पादक आणि वितरक सरकारच्या रडारवर असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र थर्माकोलवर बंदी घालण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. …

Read More »

‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’करिता अर्ज करण्याचे आवाहन १० जुलै पर्यंत अर्ज करण्याचे साठे महामंडळाक़डून आवाहन

मुंबई : प्रतिनिधी मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील मातंग समाजातील १२ पोटजातीतील सरासरी ६०% पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती’ करिता महामंडळाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्येष्ठता व गुणक्रमांकानुसार यासाठी निवड करण्यात येणार आहे. या पोटजातीमध्ये मांग, मातंग, मिनी मादीग,मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा यांचा समावेश आहे. …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी काढले लोकशाही दिनामध्ये सर्व अर्ज निकाली शुन्य अर्ज प्रलंबित

मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयात मे २०१८ पर्यंत झालेल्या १०७ लोकशाही दिनांमधील  एकही अर्ज प्रलंबित नसून १ हजार ४७० तक्रारींवर  तोडगा काढण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १०८ वा लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी ११ तक्रारींवर मुख्यमंत्र्यांनी सुनावणी केली. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी मंत्रालयात ऑनलाईन लोकशाही दिन आयोजित केले जाते.आतापर्यंत …

Read More »

२७, २८ जूनला विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार

मुंबई : प्रतिनिधी मध्य-भारतात या आठवड्यात एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचे संकेत असल्याने २७ व २८ जूनला विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत, तसेच मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यांत चांगल्या पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मध्य-महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर आणि नाशिकसारख्या काही जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात …

Read More »