Editor

राजनाथ सिंह म्हणाले, सध्या सुरक्षेत ड्रोनचे महत्व वाढतेय उत्तर प्रदेश संरक्षण उपकरणे आणि ड्रोन उत्पादन युनिट उद्घाटन

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी आधुनिक युद्धात ड्रोनचे वाढते महत्त्व अधोरेखित केले आणि भारताच्या युद्ध धोरणात त्यांचा समावेश केला पाहिजे यावर भर दिला. त्यांनी सांगितले की ड्रोन आता अशा ठिकाणीही तैनात केले जात आहेत जिथे मोठी उपकरणे चालत नाहीत, रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष त्यांच्या मोठ्या प्रमाणात वापराचे उदाहरण …

Read More »

पंतप्रधान मोदी यांनी युक्रेन अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्सकी यांना केले आश्वस्त फोनवरील संभाषणा दरम्यान भारताचे पूर्ण सहकार्य असल्याचे दिले आश्वासन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (३० ऑगस्ट २०२५) युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात युक्रेनमधील शांततापूर्ण तोडग्याला आपला पाठिंबा असल्याचे पुन्हा एकदा सांगितले, असे मोदींच्या कार्यालयाने म्हटले आहे. व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी युक्रेनशी संबंधित अलीकडील घडामोडींबद्दल आपले मत मांडले, तर पंतप्रधान मोदींनी शांतता लवकरात लवकर पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नांना …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी मुंबईत मराठा आंदोलकांचा महापूर कायम आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी नव्याने मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर सहभागी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर ठाण मांडून बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत येणाऱ्या मराठा आंदोलकांचा महापूर कायम आहे. जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळेपर्यंत मुंबई न सोडण्याचा निर्धार केल्याने त्यांच्यासोबतच्या आंदोलकांनी आणि पुन्हा राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून मुंबईत नव्याने दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तसेच …

Read More »

आशिष शेलार यांची माहिती, मुंबई उपनगर जिल्ह्यात अद्यावत क्रीडा संकुल विकसित करणार विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणार

आजच्या युगात अभ्यासासोबत खेळाचे महत्त्व आहे. शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत खेळाडूंना देण्यात येत आहे. याशिवाय मुंबई उपनगर जिल्ह्यात या वर्षांमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाअंतर्गत एक अद्यावत क्रीडा संकुल विकसित करण्यात येत असून यामध्ये विविध प्रकारांच्या क्रीडा सुविधा उपलब्ध असतील असे मुंबई उपनगरचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले. महाराष्ट्र …

Read More »

९ सप्टेंबर पर्यंत पगार न दिल्यास शिक्षकांचे ठिय्या आंदोलन शिक्षक भारती संघटनेचा सरकारला इशारा

शासनाने आदेश देवूनही रात्र शाळा, ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर महिन्याचे पगार झाले नाहीत. त्यामुळे शुक्रवार २९ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षक भारती संघटनेच्या शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक यांची भेट घेऊन पगार विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच ९ सप्टेंबर २०२५ पर्यंत पगार न झाल्यास शिक्षक भारती संघटना शिक्षण …

Read More »

प्रताप सरनाईक यांचा निर्धार, अनाधिकृत बाईक टॅक्सी वर निरंतर कारवाई चालू राहील उच्च न्यायालयात याचिकेवरील सुनावणी सुरु असली तरी कारवाई

राज्य शासनाने ई-बाईक टॅक्सी धोरण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार संबंधित संस्थांनी परवाने काढून आपली ई -बाईक टॅक्सी सेवा सुरू करावी. *तथापि, शासनाच्या आदेशाला न जुमानता परवान्या शिवाय अनाधिकृत पणे बाईक टॅक्सी सेवा सुरू असलेल्या रॅपिडो ,ओला, उबर या सारख्या कंपन्या* वर मोटार परिवहन विभागामार्फत सातत्याने कारवाई सुरू राहील, …

Read More »

मराठा आरक्षण प्रश्नी न्या शिंदे समिती आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चर्चा अंमलबजावणीचे आदेश काढण्याची जरांगे पाटील यांची मागणी, तर मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानंतर

मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस. काल राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चर्चेची फेरी पार पडल्यानंतर आज चर्चेची दुसरी फेरी झाली. तत्पूर्वी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. त्यानंतर न्या शिंदे समितीने चर्चेसाठी आझाद मैदानावर पोहोचले. यावेळी झालेल्या चर्चेत काही मुद्यांवर मनोज जरांगे पाटील आणि …

Read More »

मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांचे मोठे विधान, आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केले विधान

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीन-चार महिन्यापूर्वी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार काल सकाळपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जथ्याने मराठा आरक्षण प्रश्नी आझाद मैदान येथे आंदोलन सुरु करण्यात आले. आज आझाद मैदानावरील आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. एकाबाजूला राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटील …

Read More »

मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ मनोज जरांगे पाटील यांच्या चर्चेच्या तोंडावर राज्य सरकारचा निर्णय

राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस शासनाने ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी …

Read More »

मराठा आंदोलनावर राज ठाकरे यांची स्पष्टोक्ती, सगळ्यांच उत्तर एकनाथ शिंदेच देऊ शकतील मराठा-ओबीसी वादावर राज ठाकरे यांनी मांडली भूमिका

जवळपास वर्षभरापासून राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी मराठा आंदोलक समर्थक मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत अनेकवेळा आंदोलन केले. तसेच मागील काही वर्षी नवी मुंबईत मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः विशेष शासन निर्णय जारी करत त्याची …

Read More »