मुंबई : प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानीला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या एसआरए योजनेतील झोपडीधारकाच्या पात्र-अपात्रतेचे अधिकार पुन्हा एसआरएकडेच वर्ग करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने गृहनिर्माण विभागाकडून नवी नियमावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती झोपडपट्टी पुर्नविकास प्राधिकरणातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. एसआरए योजनेसाठी झोपडीधारकांना पात्र-अपात्र ठरविण्याच्या …
Read More »शांतता, सौहार्दाच्या वातावरणाची निर्मिती ही विश्व कल्याणासाठीची सर्वात मोठी गरज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे प्रतिपादन
मुंबई : प्रतिनिधी व्यक्तिगत, सामाजिक ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता, सौहार्दाच्या वातावरणाची निर्मिती ही आजची सर्वात मोठी गरज आहे. त्यादृष्टीने एक आश्वासक पाऊल म्हणून आंतरराष्ट्रीय अहिंसा संशोधन व अध्यात्म तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेने (आय-एआरटीआयएसटी-आय- आर्टिस्ट) विज्ञानाला अध्यात्माची जोड देण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांबरोबर काम करावे, असे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले. आंतरराष्ट्रीय …
Read More »रूग्णालय, क्षेत्रिय कार्यालयाच्या ठिकाणी गैरहजर राहील्यास थेट निलंबन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आदेश जारी
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सार्वजनिक रूग्णालय, क्षेत्रिय कार्यालयाच्या ठिकाणी वरिष्ठांची पूर्व परवानगी न घेता अधिकारी-कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसतात किंवा पूर्व कल्पना न देता गैरहजर राहतात. अशा कर्मचारी, अधिकाऱ्यांवर नागरी सेवा कायद्यांतर्गंत शिस्तपालनाची आणि निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सार्वजनिक रूग्णालय विभागाने एका आदेशान्वये सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिला. मागील काही …
Read More »राज्याच्या महाधिवक्त्यांना आता राज्यमंत्री पदाचा दर्जा राज्य सरकारचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयासह इतर न्यायालयात राज्याची न्यायिक बाजू मांडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या राज्याच्या महाधिवक्त्यांना राज्य सरकारने राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पहिल्यांदाच न्यायिक बाजू पाहणाऱ्या व्यक्तीला राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त होणार असून यासंदर्भातील शासकिय आदेशही गुरूवारी पारीत करण्यात आला आहे. महाधिवक्त्यांना यापूर्वी …
Read More »संविधानावर शरसंधान करेल त्याला उध्वस्त केल्याशिवाय गप्प बसायचं नाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर जर कोण शरसंधान करणार असेल तर त्यांना उध्वस्त केल्याशिवाय गप्प बसायचं नाही. ही लढाई सोपी नाही परंतु ती लढल्याशिवाय गत्यंतर नाही आणि ही लढाई राष्ट्रवादी काँग्रेस लढल्याशिवाय थांबणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत दिला. राष्ट्रवादी …
Read More »मुंबई महापालिकेच्या विकास आराखाड्यात राज्य सरकारचा हस्तक्षेप चिंताजनक शिवसेना मंत्र्यासह खासदार, आमदारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकार मुंबई महानगरपालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करत असून स्थानिक स्वराज्य संस्थांना दुबळे करण्याचा प्रयत्न करीत असल्याबद्दल शिवसेनेच्या मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. हरकती आणि सूचनांसाठी विकास आराखडा मराठीतून उपलब्ध करून देण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते,पर्यावरण मंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री …
Read More »मुळ विषयापासून लक्ष हटविण्यासाठीच राहुल गांधींना आयोगाची नोटीस कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी जळगांव जिल्ह्यातील दोन मुलांचा व्हीडीओ काँग्रेसचे राष्ट्रीय राहुल गांधी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून प्रसिध्द केल्याप्रकरणी राज्य बाल हक्क आयोगाने नोटीस बजाविली. मात्र जो व्हीडीओ आधीच प्रसारमाध्यमे आणि सोशल मिडीयावर व्हायरल झालेला असताना त्याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे सोडून उलट राहुल गांधी यांना नोटीस बजावणे म्हणजे मुळ विषयापासून लक्ष …
Read More »महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातल्या आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढेल आणि जिंकेल. या खेपेला विधानसभेवर भगवा फडकवावाच लागेल. पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असा निर्धार शिनवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी व्यक्त केला. शिवसेनेचा ५२वा वर्धापनदिन आज गोरेगावच्या नेस्को सभागारात साजरा झाला. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी पुन्हा केंद्रातील …
Read More »महाराष्ट्राचे त्रिभाजन करण्याचा भाजपाचा डाव मागासलेल्या मराठवाड्याकडे दुर्लक्ष केल्यानेच तेंलगणात जाण्याची मागणी असल्याचा चव्हाण यांचा आरोप
नांदेड : प्रतिनिधी स्वातंत्र्य सैनिकांच्या हौतात्म्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. पूर्वीच्या निजामराजवटीत असलेल्या मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रामध्ये बिनशर्त सहभागी झाला. परंतु या भागाकडे भाजप-शिवसेना सरकारचे वारंवार होणारे दुर्लक्ष यामुळेच तेलंगणात जाण्याची सिमालगतच्या नागरिकांची मागणी वाढली आहे. या मागणीचा फायदा घेत महाराष्ट्राचे त्रिभाजन करून वेगळे विदर्भ व मराठवाडा राज्य करण्याचा भाजपचा कुटील …
Read More »तीन वर्षाच्या अपयशी कारभारातून स्वत:ला वाचवण्यासाठी भाजप सत्तेबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी केंद्र आणि राज्य सरकार काश्मीरमध्ये शांतता राखण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरले आहेत त्यातून स्वत:ला वाचवण्यासाठी भाजपाने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. जम्मू-काश्मीरमधील पीडीपीसोबतची युती तोडण्याचा निर्णय भाजप सरकारने आज घेतला त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी भाजपावर …
Read More »
Marathi e-Batmya