Editor

नमोप्रमाणे ‘महामित्र’ ची मालकी खाजगी कंपनीकडे लाखो युजरची माहिती धोक्यात असल्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे सुरु झालेल्या नमो अँपनंतर आता ‘महामित्र’ सोशल मिडीयीच्या माध्यमातून डेटा प्रायव्हसीचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. तसेच या अँपद्वारे जमा होणारी सर्व माहिती अनुलोम या खाजगी कंपनीकडे जमा होत असल्याचा गौप्यस्फोट  राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी …

Read More »

खेड येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळा विटंबनेची तात्काळ सीआयडी चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिस प्रशासनाला आदेश

मुंबई : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपालिकेच्या हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याची काल सोमवारी घटना घडली. यासंदर्भात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मुद्दा उपस्थित करत त्याचे पडसाद उमटले. विशेष म्हणजे काल भिमा कोरेगांव येथील दलितांवर झालेल्या हिसांचार प्रकरणी संभाजी भिडे याला अटकेसाठी एल्गार मोर्चा काढण्यात आला होता. विधिमंडळाच्या दोन्ही …

Read More »

भिमा कोरेगांव प्रकरणी भिडेंचा सहभाग नसल्याचा मुख्यमंत्र्याचा खुलासा विधानसभेतील चर्चेला उत्तर देताना माहिती

मुंबई : प्रतिनिधी १ जानेवारी २०१८ रोजी भिमा कोरेगांव येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला. मात्र गुन्ह्याच्या अनुषंगाने संभाजी भिडे यांचा सहभाग असल्याबाबतचा तपास केला. तसेच त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले. मात्र त्यांचा कोणताही सहभाग असल्याचे आतापर्यंत आढळून आले नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. …

Read More »

ईशा देणार पाणी वाचवण्याचा संदेश सामाजिकतेच्या भान जपणाऱ्या कलावंताच्या यादीत आता ईशा गुप्ताचे नाव

मुंबई : प्रतिनिधी आज बऱ्याच सेलिब्रिटीज एकीकडे ग्लॅमर विश्वात वावरत असताना दुसरीकडे समाजामध्ये विविध प्रश्नांवर जनजागृती करण्याचं कामही करीत आहेत. या सेलिब्रिटीज शासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आपल्या ग्लॅमर आणि लोकप्रियतेचा उपयोग लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी करीत असताना समाजोपयोगी कार्यांनाही हातभार लावत आहेत. आजच्या हॅाट अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट असणारी …

Read More »

विक्रम गोखले-यतिन कार्येकरांच्या अभिनयाची जुगलबंदी येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’

मुंबई : प्रतिनिधी काही मराठी कलाकारांनी केवळ हिंदीतच नव्हे तर इतर प्रादेषिक भाषांमधील चित्रपटांमध्येही आपलं वर्चस्व सिद्ध करीत रसिकांची दाद मिळवली आहे. विक्रम गोखले यांनी आजवर आपल्या अनुभवी अभिनय कौशल्याच्या बळावर मराठीपासून हिंदीपर्यंत बऱ्याच भूमिका सजीव केल्या आहेत. यांच्याच पावलावर पाऊल टाकत वाटचाल करणाऱ्या यतिन कार्येकरांनीसुद्धा लहान-सहान भूमिकांमध्येही जीव ओतला …

Read More »

दोन दिवस गोंधळ घालून अखेर विरोधकांकडून अविश्वास ठराव मागे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठराव मागे घेतल्याचे केले जाहीर

मुंबई : प्रतिनिधी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या कामकाज पध्दतीवर आक्षेप नोंदवित त्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव विरोधकांनी मांडला. मात्र हा ठराव चर्चेला येण्यापूर्वीच सत्ताधारी पक्षाकडून अध्यक्ष बागडे यांच्यावर विश्वासदर्शक ठराव मांडत विरोधकांच्या ठरावातील हवा काढून घेण्यात आली. त्यावरून विरोधकांनी दोन दिवस सतत गोंधळ घालत राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. मात्र …

Read More »

पंतप्रधान मोदी, आमच्या नादीला लागू नका ! एल्गार मोर्चाच्या समारोपाप्रसंगी अँड. प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी देशाचा रखवालदार म्हणवून घेणाऱ्या रखलवादाराकडून आता रखवालदारी काढून घेण्याची वेळ आली असून या रखवालदाराला एकच सांगतो आमच्या नादी लागू नको. आम्ही फकीर आहोत. त्यामुळे आम्ही उद्या जेलमध्ये गेलो, तरी फरक पडणार नाही. मोदींना असे वाटत असेल शिवाजी महाराजांच्या जयंतीला भिडे आणि स्वत:च फोटो टाकले म्हणजे झाले. मोदी, …

Read More »

आठ दिवसांत भिडेंवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन अॅड. प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारला अल्टीमेटेम

मुंबई : प्रतिनिधी भिमा कोरेगाव येथील दलितांवर झालेल्या हिंसाचाराप्रकरणातील सुत्रधार संभाजी भिडे याच्यावर पुढील आठ दिवसात कारवाई करण्यात आली नाही. तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा एल्गार मोर्चाचे निमंत्रक तथा भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांनी देत राज्य सरकारला आठ दिवसाचा अल्टीमेटम दिल्याचेही त्यांनी सांगितले. संभाजी भिडेला अटक करण्याच्या मागणीवरून एल्गार …

Read More »

अध्यक्षांवरील अविश्वास ठरावावरुन सत्ताधारी विरोधक आमने-सामने गोंधळामुळे विधानसभा तीनवेळा तहकूब

मुंबई : प्रतिनिधी विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावाऐवजी राज्य सरकारने विश्वासदर्शक ठराव मांडत तो लगबगीने शुक्रवारी मंजूर केला. त्यावरून आज सोमवारी सभागृहाचे कामकाज सुरु होताच सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर येत चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज तीनवेळा तहकूब करावे लागले. शुक्रवारी सत्ताधाऱ्यांनी जे कामकाज केले ते म्हणजे विधानसभेच्या …

Read More »

शेवटी एल्गार मोर्चा निघालाच ! जिजामाता उद्यानापासून मोर्चा निघाला आझाद मैदानाकडे

मुंबई : प्रतिनिधी भिमा कोरेगाव दंगल प्रकरणातील आरोपी संभाजी भिडेंना अटक करण्यात यावी या मागणीसाठी आंबेडकरी बांधवांनी काढलेल्या एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र तरीही वेळीच माहिती पोहोचली नाही. त्यामुळे हजारो कार्यकर्त्ये जिजामाता उद्यानाजवळ पोहोचले आणि तेथूनच या दलित समाजाने मोर्चाला सुरुवात केली. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी आझाद मैदानाच्या दिशेने जाण्यास सुरुवात …

Read More »