जीएसटी परिषदेअंतर्गत भरपाई उपकरावरील मंत्र्यांच्या गटाच्या (जीओएम) बैठकीत बुधवारी भरपाई उपकर आणि वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अंतर्गत राज्यांना होणाऱ्या महसुली नुकसानाची भरपाई करण्याची गरज यावर चर्चा झाली. भरपाई उपकरावरील मंत्रिगटाचे सदस्य असलेले पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा म्हणाले की, कोविड दरम्यान उपकरातून वसूल केलेल्या कर्जाची देयके ऑक्टोबरमध्ये संपणार आहेत. …
Read More »उच्च न्यायालय बीएमसीला फटकारले, सम्राट अकबराला पटवून देणे सोपे…. कत्तलखान्यांवरील बंदी उठविण्याच्या प्रकरणावरील सुनावणी वेळी उच्च न्यायालयाचे मत
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) तुलनेत सम्राट अकबराला पटवून देणे सोपे होते, असा युक्तिवाद जैन समुदायाच्या सदस्यांनी मुंबई उच्च न्यायालयात केला. बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्यांना पवित्र पर्युषण पर्वादरम्यान शहरातील कत्तलखान्यांवर संपूर्ण आठवडा बंदी हवी असल्यास महानगरपालिकेला पटवून देण्यास सांगितले, असे लाईव्ह लॉने वृत्त दिले. पर्युषण पर्वाच्या संपूर्ण कालावधीसाठी मुंबईत कत्तलखान्यांवर बंदी घालण्याची मागणी …
Read More »कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती, राज्यात अतिवृष्टीमुळे ८ लाख हेक्टर पीकांचे नुकसान सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, तातडीने मदत करणार
राज्यात ९ ऑगस्टपासून आजपर्यंत १९ जिल्ह्यातील १८७ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या काळात ८ लाखांपेक्षा जास्त हेक्टर पीकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून, जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून पीडित शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय …
Read More »मंत्र्यावर गंभीर आरोप, पदावरून काढणारः अमित शाह यांनी मांडले विधेयक संघराज्य तत्वाला तडे जाणार असल्याचा आरोप
लोकसभेने रिअल मनी गेमिंग कंपन्यांना बंदी घालणारा कायदा मंजूर केला. या कायद्याच्या महत्त्वाबद्दल युक्तिवाद करताना, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधोरेखित केले की रिअल मनी गेमिंगचे व्यसन हे अनेक आत्महत्या आणि सामाजिक दुष्कृत्यांचे कारण आहे. त्यांनी अधोरेखित केले की ऑनलाइन गेमिंगच्या या विभागामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कृत्रिम बुध्दीमत्तेचे आव्हान…शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा रौप्य महोत्सव कार्यक्रम
कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगवान लाटेत समाजात होणारे नवे बदल स्वीकारणारी आणि त्यांना सक्षमपणे सामोरे जाणारी पिढी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने घडवावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘एमकेसीएल’च्या नावीन्यपूर्ण आणि विकासाभिमूख उपक्रमांत राज्य शासनही अग्रेसर राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. बाणेर येथील बंटारा भवन येथे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) …
Read More »मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवादरम्यान जड वाहनांना वाहतूक बंदी सकाळी ८ ते रात्रो ११ वाजेपर्यत वाहनांना नो एन्ट्री
गणेशोत्सवासाठी मुर्तीचे आगमन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक हितास्तव मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर वजनक्षमता १६ टन किंवा १६ टनापेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १५५ मधील तरतूदीनुसार वाहतूक बंदी करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास म्हणून २३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री …
Read More »प्रताप सरनाईक यांचे आदेश, स्कुल व्हॅन नियमावली अंतिम करून अधिसूचना जारी करा अत्याधुनिक सुरक्षा व सुविधांनी युक्त असलेली अधिकृत स्कूल व्हॅन
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन नियमावली आणण्यात येत आहे. ही नियमावली अंतिम करून याबाबत तातडीने अधिसूचना जारी करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत स्कूल व्हॅन बाबत सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी परिवहन मंत्री बोलत होते. बैठकीस परिवहन आयुक्त विवेक …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते चिंचभुवन गावठाणातील तयार नागरी सुविधा मनपाला हस्तांतरीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मिहान लि. कडून ५० लाखांचा धनादेश सुपूर्द
चिंचभुवन येथील पर्यायी गावठाणातील सेक्टर क्रमांक ३४, ३५ व ३६ मध्ये तयार करण्यात आलेल्या नागरी सुविधा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर महानगरपालिकेस हस्तांतरीत करण्यात आल्या. तसेच मिहान इंडिया लिमिटेडकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५० लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. रामगिरी शासकीय निवासस्थानी एका छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, राज्यात… ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्या
राज्यात मागील तीन चार दिवसात मुसळधार पावसाने अनेक भागात पुरस्थिती उद्भवली आहे. या पावसाचे पाणी शेतात शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, उभी पिके वाहून गेली आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास १५ लाख एकर पेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतपिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे समजते. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करा …
Read More »रायगड, पुणे घाट भागात रेड अलर्ट तर सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS)तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यांला १९ ऑगस्ट रोजी सकाळी ५.३० ते २१ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० पर्यंत ३.४ ते ४.४ मीटर तसेच, सिंधुदुर्ग जिल्ह्याला १९ ऑगस्ट रोजीपासून सायं. ५.३० ते २१ ऑगस्ट दुपारी २.३० पर्यंत २.९ ते ४.० मीटर …
Read More »
Marathi e-Batmya