Editor

उद्धव, राज ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून भाजपाला भरली धडकी हिंदी भाषेच्या विरोधात दोन्ही ठाकरे एकत्र

उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख, आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे  हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येणार आहेत. मराठी माणूस, मराठी भाषा यासाठी लढणारे ठाकरे बंधू मैदानात उतरत असताना भाजपाच्या मनात धडकी भरली आहे. आपल्या विरोधात जनमत तयार होऊ नये, म्हणून भाजपाने नवी रणनीती आखण्याची तयारी केली आहे. राज्यात पहिली पासून हिंदीची …

Read More »

शरद पवार यांचा विरोध, पहिली ते चौथी इयत्तेत हिंदी भाषा सक्ती करणं योग्य नाही हिंदीची सक्ती नको, महाराष्ट्रात विरोध किंवा द्वेश नाही

पहिली ते चौथी इयत्तेत हिंदीची सक्ती करणं योग्य नाही. सरकारने तसा हट्ट करू नये. आज देशातील ५५ टक्के लोक हिंदी बोलतात ती सुसंवादाची भाषा असू शकते. हिंदीबद्दल महाराष्ट्रात विरोध किंवा द्वेष नाही पण म्हणून हिंदीची सक्ती नको अशी परखड भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात धोरण सादर करा दीर्घकालीन व पर्यावरणपूरक धोरण सादर करावे

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात प्रथा, परंपरांचा मान राखत पर्यावरणाच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेले धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार, बृहन्मुंबई …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, मनुस्मृती लादण्याचा संघ व भाजपाचा अजेंडा आजही कायम संघाच्या होसबळेंचे विधान त्याच व्यापक कटाचा भाग

भाजपा व त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पहिल्यापासूनच संविधान मान्य नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा त्यांचा अजेंडा लपून राहिलेला नाही. संविधानाच्या उद्देशिकेतून सेक्युलर आणि सोशालिस्ट हे शब्द काढण्याच्या रा. स्व. संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांच्या मागणीतून आज ते पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे, असे महाराष्ट्र …

Read More »

अवकाळीग्रस्त शेती नुकसानीचे पंचनामे पूर्ण ३४ हजार ६७० हेक्टर क्षेत्र बाधित, मुदत व पुनर्वसन विभागाचा १०० कोटींचा प्रस्ताव

मार्च एप्रिल महिन्यात राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. अवकाळी पावसामुळे शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अवकाळी पावसामुळे राज्यात ३४७६० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून ८२ हजार ९९९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानी पोटी राज्य सरकारने १०० कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बाजारमूल्य निश्च‍ितीमुळे शेतकऱ्यांना मिळणार अधिक फायदा स्मार्ट प्रकल्पांतर्गत कापूस, हळद आणि मका पिकांसाठी हेजिंग डेस्क

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारमूल्य मिळावे यासाठी, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, स्मार्टअंतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे येथे कापूस, हळद आणि मका या पिकांसाठी ‘हेजिंग डेस्क’ सुरू केला आहे. टप्प्या-टप्प्याने इतर पिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शेतकरी त्यांच्या उत्पादनांच्या भविष्यातील किंमतीतील चढ-उतारामुळे होणारे नुकसान टाळू …

Read More »

अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून इराणला ३० अब्ज डॉलर्सचे पॅकेज अणुऊर्जा विकासासाठीही भरगच्च निधी देणार

तेहरान आणि तेल अवीव यांच्यातील युद्धबंदीनंतर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने इराणसोबत बॅकचॅनल कूटनीति तीव्र केली आहे, इराणला पुन्हा वाटाघाटीच्या टेबलावर आणण्यासाठी आर्थिक आणि अणुऊर्जा प्रोत्साहनांचा एक संच सादर केला आहे. या चर्चेशी परिचित असलेल्या चार सूत्रांचा हवाला देत सीएनएनच्या वृत्तानुसार, अमेरिका इराणला निर्बंधमुक्ती आणि अब्जावधी इराणी मालमत्तेचे गोठवणे रद्द करण्याबरोबरच समृद्ध …

Read More »

आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या विनंतीवर केंद्र सरकार म्हणते, विनंती विचारात एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या चौकशीत सहभागी होऊ देण्याची विनंती

१२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ विमानाच्या अपघाताच्या चौकशीत सामील होण्याची आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेची (ICAO) असामान्य विनंती सरकार विचारात घेत आहे, असे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणावरील कोणताही निर्णय हवाई अपघात चौकशीसाठी अवलंबल्या जाणाऱ्या प्रक्रिया आणि प्रोटोकॉल आणि या विशिष्ट चौकशीच्या गरजा लक्षात घेऊन …

Read More »

राजनाथ सिंह म्हणाले की, भारत-चीन दरम्यानची समस्या कायमस्वरूपी कमी… एससीओ बैठकीनंतर समकक्ष अ‍ॅडमिरल डोंग जून याच्यासोबत द्विपक्षिय चर्चेत आवश्यकता अधोरेखित

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या वेळी त्यांचे चिनी समकक्ष अ‍ॅडमिरल डोंग जून यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत भारत आणि चीनमधील जटिल सीमा समस्या “कायमस्वरूपी संबंध आणि तणाव कमी करण्याच्या संरचित रोडमॅप” द्वारे सोडवण्याची आवश्यकता अधोरेखित केली. दोन्ही देशांमधील सीमा समस्या सोडवण्यासाठी कायमस्वरूपी तणाव …

Read More »

कोलकाता येथील विधी महाविद्यालयातच विद्यार्थींनींवर सामूहिक बलात्कार तीघांना अटक, तिघांपैकी एकजण तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा नेता

या आठवड्याच्या सुरुवातीला कोलकाता येथील एका विधी महाविद्यालयात एका विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थी महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणासंदर्भात तीन पुरूषांना अटक करण्यात आली होती, ज्याचे तीव्र पडसाद उमटले होते आणि आरजी कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात अशाच प्रकारच्या गुन्ह्यामुळे शहर आणि देशभरात निदर्शने …

Read More »