Editor

स्टेट बँक ऑफ इंडिया करणार आयएमपीएस दरात सुधारणा आयएमपीएस व्यवहारावर नाममात्र शुल्क आकारणार

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने १५ ऑगस्ट २०२५ पासून किरकोळ ग्राहकांसाठी त्यांच्या तात्काळ पेमेंट सेवा (IMPS) व्यवहार शुल्कात सुधारणा करण्याची घोषणा केली आहे. हा बदल ऑनलाइन आणि शाखा व्यवहारांवर परिणाम करेल, उच्च-मूल्याच्या हस्तांतरणासाठी नवीन शुल्क लागू केले जाईल, तर काही व्यवहार स्लॅब अपरिवर्तित राहतील. २५,००० रुपयांपेक्षा जास्त उच्च-मूल्याच्या ऑनलाइन …

Read More »

व्ही. अनंत नागेश्वरन म्हणाले, टॅरिफचा प्रभाव सहा महिन्यात कमी होईल, त्याच्या पुढील विचार करा अमेरिकन टॅरिफ प्रश्नी मुख्य आर्थिक सल्लागार नागेश्वरन यांची स्पष्टोक्ती

मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी बुधवारी सांगितले की, भारतीय निर्यातीवरील अमेरिकेच्या वाढीव शुल्काचा आर्थिक परिणाम एक किंवा दोन तिमाहीत कमी होईल, परंतु त्यांनी असा इशारा दिला की देशाने खोल, दीर्घकालीन आव्हानांसाठी तयार राहावे, खाजगी क्षेत्राला धोरणात्मक दृष्टिकोनाने काम करण्याचे आवाहन केले. व्ही. अनंत नागेश्वरन पुढे बोलताना म्हणाले की, …

Read More »

आयकर रिटर्न करण्यास मुदतवाढ मिळणार? १५ सप्टेंबर नंतरची मुदत वाढ मिळण्याची शक्यता

२०२४-२५ (करांकन वर्ष २०२५-२६) या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२५ आहे, ज्यामुळे करदात्यांना मूळ ३१ जुलैच्या तारखेपेक्षा ४६ दिवस जास्त वेळ मिळाला आहे. एक महिन्यापेक्षा जास्त वेळ शिल्लक असताना, आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार मे महिन्यात प्रक्रिया सुरू झाल्यापासून २.९३ कोटी रिटर्न दाखल झाले आहेत. त्यामुळे …

Read More »

गुगलने केले बातम्यांच्या पेजचे अपडेट टॉप स्टोरिज विभागात अधिक सामग्री पाहता येणार

गुगलने भारतातील शोधासाठी पसंतीचे स्रोत नावाचे एक नवीन वैशिष्ट्य सादर केले आहे, जे वापरकर्त्यांना त्यांच्या आवडत्या बातम्या आउटलेटमधून थेट टॉप स्टोरीज विभागात अधिक सामग्री पाहण्याची परवानगी देते. रोलआउट आजपासून सुरू झाले आहे आणि येत्या काही दिवसांत सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल. गुगलच्या अधिकृत ब्लॉगनुसार, हे अपडेट लोकांना विश्वसनीय प्रकाशने किंवा स्थानिक …

Read More »

नवाब मलिक यांच्याकडे आता राष्ट्रवादीच्या मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपद अजित पवार आणि सुनिल तटकरे यांनी सोपवली मोठी जबाबदारी...

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावर मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुखमैदान तोफ अशी ओळख असलेले आणि मुंबई अध्यक्ष राहिलेले नवाब मलिक यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय …

Read More »

नितेश राणे यांचे आवाहन, अमेरिकेने टॅरिफ वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर मत्स्योत्पादनांसाठी नवीन बाजारपेठ देशांतर्गत बाजारातही मत्स्य विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत

अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर मोठ्या प्रमाणावर टेरिफ वाढवले आहे. त्यामुळे भारतीय उत्पादने अमेरिकेत महाग होऊन त्याची मागणी घटण्याची शक्यता आहे. देशातून मोठ्या प्रमाणावर मत्स्योत्पादन अमेरिकेत निर्यात केले जाते. या टेरिफ वाढीच्या पार्श्वभूमीवर मत्स्योत्पादनासाठी नवनवीन बाजारपेठांकडे लक्ष केंद्रीत करावे. तसेच देशांतर्गत बाजारातही मत्स्यविक्री आणि मत्स्य पुरवठा वाढण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना मत्स्यव्यवसाय …

Read More »

धनंजय मुंडेचे मुंबईत १६ कोटीचं घर, तरीही शासकीय बंगला सोडला नाही शासनाने ४२ लाख रूपयांचा दंड ठोठावूनही मुंडे शासकिय बंगल्यातच

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरणी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मंत्री पदाचा राजीनामा देऊन अनेक महिने झाले तरी त्यांनी शासकीय बंगला अद्याप सोडला नाही. त्यावरून शासनाने त्यांना ४२ लाखाचा दंडही ठोठावला. मुंबईत घर नसल्याने आपण बंगला सोडला नसल्याचे सांगितले मात्र, …

Read More »

मुंबईतील कबुतरखान्याचा वाद चिघळला … मराठी आणि जैन समुदायाचे शक्ती प्रदर्शन

दोन दिवसापुर्वी जैन धर्मियांनी दादर येथील कबुतरखाना बंदी संदर्भात आंदोलन केले त्याच्यावर कारवाई नाही. मात्र आज मराठी एकीकरण समितीने आंदोलन करताच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. त्यामुळे आता कबुतरखान्याचा वाद अधिक चिघळला आहे. जैन मुनींच्या शस्त्र उचलण्याच्या वक्तव्यानंतर हे आंदोलन अधिक तीव्र झाले. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. समितीने कोर्टाच्या निर्णयाचा …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, स्वातंत्र्यदिनी कोणी काय खावे हे सरकार ठरवणार का? भाजपा आणि स्वातंत्र्यदिनाचा संबंधच काय?

स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण आहे, स्वातंत्र्य दिन व भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही. अख्खा देश स्वातंत्र्यासाठी लढत होता तेव्हा भाजपाचे पूर्वज ब्रिटिशांसोबत होते, काहीजण ब्रिटिशांची पेन्शन खात होते, इंग्रजांना मदत करत होते. भाजपाच्या पूर्वजांवरचे हे काळे डाग लपवण्यासाठीच स्वातंत्र्यदिनी कोणी काय खायचे याचे फतवे काढले जात आहेत, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »

भाजपाचा अजेंडा गणेशोस्तवात राबविण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे मंडळांना आवाहन ऑपरेशन सिंदूर चे देखावे सादर करण्याचे केले आवाहन

जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरीक ठार झाले. या अतिरेकी हल्ल्याला प्रतित्युर म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरतंर्गत कारवाई करत पाकिस्तानातील दहशतवादी स्थळांना उद्धवस्तही केले. मात्र भारतीय सैन्याकडून कारवाई सुरु असतानाच अचानक भारताने पाकिस्तानबरोबर युद्धबंदी केली. परंतु या युद्धबंदीची घोषणा सर्वात आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड …

Read More »