भारतात संकेतांसाठी ज्यांच्या तिमाही कमाईचा बारकाईने मागोवा घेतला जातो, अशा अॅक्सेंचरने दुसऱ्या तिमाहीत व्यापक वाढ नोंदवली आहे. आयटी क्षेत्रातील या प्रमुख कंपनीने त्यांचे मार्गदर्शन ४-७ टक्क्यांवरून ५-७ टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. त्यांनी त्यांचे आर्थिक वर्ष २०२५ चे ईबीआयटी मार्जिन मार्गदर्शन १५.६-१५.८ टक्क्यांवरून किंचित कमी करून १५.६-१५.७ टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. ऑर्डर …
Read More »महिंद्रा आणि महिंद्राच्या वाहन किंमतीत एप्रिल महिन्यापासून वाढ एसयुव्ही आणि सीव्ही किंमतीत ३ टक्क्यापर्यतची वाढ
एप्रिलपासून, महिंद्रा अँड महिंद्रा त्यांच्या एसयूव्ही आणि व्यावसायिक वाहनांच्या किमती ३ टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे. कंपनीने सांगितले की त्यांनी वाढत्या इनपुट खर्चाचा बहुतांश भाग उचलला आहे परंतु आता त्यांना काही प्रमाणात भार खरेदीदारांवर टाकावा लागत आहे. वेगवेगळ्या एसयूव्ही आणि व्यावसायिक वाहनांच्या मॉडेल्समध्ये ही किंमत वाढ वेगवेगळी असेल, असे महिंद्रा यांनी त्यांच्या …
Read More »औरंगजेबची कबर हटवा; ही कबर राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येत नाही उच्च न्यायालयात याचिका
मुघल बाहशाह औरंगजेब याची छत्रपती संभाजीनगरमधील खुल्ताबाद येथे असलेली कबर राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येत बसत नसल्यामुळे, ती हटवण्याचे आदेश भारतीय पुरातत्व विभागाला (एएसआय) द्या, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या कबरीपासून पुढल्या पिढीने वारसा किंवा शिकवण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे, या कबरीला ऐतिहासिक वारसा वास्तू किंवा राष्ट्रीय स्मारकांच्या …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा हज धोरण २०२५ च्या धोरणात हस्तक्षेप करण्यास नकार हज यात्रेकरूंच्या कोट्याला दिले होते आव्हान
सौदी अरेबियाच्या राज्याशी सल्लामसलत करून तयार केलेल्या केंद्र सरकारच्या हज धोरण, २०२५ च्या अंमलबजावणीत सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. हज धोरण, २०२५ च्या अंमलबजावणीला आव्हान देणाऱ्या अनेक रिट याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकाकर्त्यांनी, जे हज ग्रुप ऑर्गनायझर्स (“एचजीओ”) होते, त्यांनी हज-२०२५ धोरणांतर्गत हज यात्रेकरूंच्या कोट्याच्या …
Read More »मुंबई उच्च न्यायालयाचा बीसीसीआयला सवाल, दात नसलेली संस्था आहे का? आंध्र प्रदेश क्रिकेट संस्थेला सदस्य करून घेण्यावरून केला सवाल
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही दात नसलेली प्रशासकीय संस्था आहे का?” असा प्रश्न शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने विचारला. सर्वोच्च क्रिकेट संस्थेने हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (एचसीए) आणि तेलंगणा क्रिकेट असोसिएशन (टीसीए) या दोघांनाही एकत्र बसवून बीसीसीआयमधील सदस्यत्वावरील वाद सोडवू शकत नाही, या याचिकेची दखल घेतली. बीसीसीआयच्या वतीने उपस्थित राहिलेल्या वरिष्ठ …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, सरकारी शाळा सीबीएसई पॅटर्नवर आणण्याच्या निर्णयाचा फेरविचार करा सीबीएसई पॅटर्न मराठी शाळांसाठी घातक, मराठी शाळा संपवण्याचा नियोजित डाव
महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी शाळा सीबीएसई CBSE पॅटर्नवर पुढील शैक्षणिक वर्षापासून आणण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपा युती सरकारचा हा निर्णय राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व बालभारतीच्या अस्तित्वावर गदा आणणारा आहे. सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी माजी शालेय शिक्षण मंत्री खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. …
Read More »शिवसेना उबाठाचे भास्कर जाधव आणि शिवसेनाओएफसी निलेश राणे यांच्यात चकमक लक्षवेधी सूचनांवरून उडाली चकमक
विधानसभेच्या कामकाजात दाखवण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनांच्या संख्येवरून शुक्रवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. या दोघांमधील वाद इतका वाढला की दोघांनी एकमेकांचा एकेरी उल्लेख केला. या गोंधळामुळे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊ लागले. तेव्हा तालिका अध्यक्ष योगेश सागर …
Read More »महसूल सुनावण्या डिजिटल होणार! महसूल विभागाचे महत्वाकांक्षी पाऊल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात 'प्रत्यय' ऑनलाइन प्रणालीची अंमलबजावणी
राज्यभरातील महसूल प्रकरणांवरील सुनावण्या डिजिटल स्वरूपात होणार असून, त्यादिशेने आज प्रत्यय ही पेपरलेस रिव्हिजन व अपील प्रणाली सुरू महसूल विभागाने आज महत्वाकांक्षी पाऊल टाकले. प्रत्यय प्रणालीमुळे फेरफार, तक्रारी, अपील, पुनर्विलकन अर्ज आदी विषय ऑनलाईन पद्धतीने हाताळता येतील. यामुळे नागरिकांना मुंबई किंवा इतर ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज भासणार नाही. असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, उद्भव योजनांचे बळकटीकरण करण्याचे निर्देश तिसऱ्या योजनेसाठी पर्यायांचा अभ्यास करावा
इचलकरंजी शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी पंचगंगा नदी स्त्रोत, कृष्णानदीवरील मजरेवाडी उद्वभव या अस्तित्वातील योजनांचे बळकीटकरण करावे. त्याबरोबरच तिसरी योजना तयार करण्यासाठी पर्यायांचा अभ्यास करावा. पूरस्थितीतील पाणी साठवून त्याचा वापर करण्यासंदर्भातही विचार करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. इचलकरंजी शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात विधानभवनातील समिती कक्षात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »मुंबईतील रस्त्यांवरून भाजपा आमदारांकडून उपमुख्यमंत्र्यांचा नगरविकास विभाग लक्ष्य उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेणार असल्याची उदय सामंत यांची माहिती
मुंबईतील रस्त्यांचे वेगाने काँक्रिटीकरण करणे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी संकल्प आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईतील सर्व आमदारांच्या मागण्या जाणून घेतल्या जातील आणि त्या लवकरच …
Read More »
Marathi e-Batmya