आर्थिक वर्ष संपत आल्याने प्रत्येक संस्थांकडून त्यांच्या वित्तीय वर्षाचा जमा-खर्च सादर करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बँकींग क्षेत्रातील दोन बलाढ्य बँका असलेल्या संस्थांनी त्यांचा ताळेबंद जाहिर केल्यानंतर त्यांच्या शेअर्सचे लाभ धारक असलेल्यांना लाभांश जाहिर केला आहे. आयसीआयसीआय ICICI बँकेने मार्च तिमाहीत रु. १०,७०८ कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे, जो मागील …
Read More »MDH मसाले आता भारताच्या एफडीएच्या रडारवर यापूर्वी हाँगकाँगने या भारतीय उत्पादनावर आणली होती रोक
हाँगकाँगने त्यांच्या काही उत्पादनांची विक्री थांबवल्यानंतर MDH आणि एव्हरेस्ट आता यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (FDA) च्या रडारवर आहेत. एफडीएच्या प्रवक्त्याने रॉयटर्सला सांगितले की, “एफडीएला अहवालांची माहिती आहे आणि परिस्थितीबद्दल अतिरिक्त माहिती गोळा करत आहे. हाँगकाँगने या महिन्यात फिश करीसाठी तीन MDH मसाल्यांचे मिश्रण आणि एव्हरेस्ट मसाल्याच्या मिश्रणाची विक्री निलंबित …
Read More »इतिहासात पहिल्यांदाच ६० वर्षीय वकील महिला बनली मिस युनिव्हर्स सदरची महिला अर्जेटीनाची
ब्युनोस आयर्स प्रांतासाठी मिस युनिव्हर्सचा मुकुट जिंकल्यानंतर अर्जेंटिनातील ६० वर्षीय वकील अलेजांड्रा मारिसा रॉड्रिग्जने इतिहासाच्या पुस्तकांमध्ये तिचे नाव कोरले जाईल. यासह, असे प्रतिष्ठित सौंदर्य खिताब जिंकणारी ती तिच्या वयातील पहिली महिला ठरली आहे. तिने २४ एप्रिल रोजी झालेल्या सौंदर्य स्पर्धा जिंकण्यासाठी १८ ते ७३ वयोगटातील इतर ३४ जणांसोबत स्पर्धा केली. …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा नवा प्रस्ताव, काँग्रेस आणि वंचित एकत्र विधानसभा लढू….
सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे. त्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते, तेव्हा नाराजी काढा आणि वंचित बहुजन आघाडीला मदत करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आचारसंहिता …
Read More »विविध घोटाळ्यांची चौकशी करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू
जम्मू-काश्मीरमधील अनेक भरती घोटाळ्यांचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआय (CBI) अधिकाऱ्याचा जम्मूमध्ये अपघाती मृत्यू झाला. अधिका-यांनी पीडितेची ओळख प्रशांत शर्मा अशी करण्यात आली आहे, जो सीबीआयमधील पोलीस उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी होता. सीबीआय अधिकाऱ्याचा जम्मू शहरात “शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्री अपघात झाला”,अन्य एका पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. घरी जाताना त्याची …
Read More »नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व केवळ राजकीय द्वेषातून केलेला आहे. मोदी सातत्याने सनातन धर्म, अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख करत काँग्रेस व विरोधी पक्षांना हिंदू विरोधी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतात. नरेंद्र मोदी जातीच्या व धर्माच्या नावाने समाजात द्वेषाचे विष पसरवण्याचे पाप …
Read More »पंतप्रधान मोदी यांचा आरोप, ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कट
कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने मुस्लिमांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केले आणि ओबीसी समाजाचे संपूर्ण आरक्षण काढून घेऊन रातोरात मुस्लिमांना वाटून टाकले, आता हाच फॉर्म्युला देशभर राबविण्याचा काँग्रेसचा कट आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोल्हापूर येथे जाहीर सभेत बोलताना केला. कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत …
Read More »लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात ६२.७१ टक्के मतदान
मागील काही दिवसापासून वातावरणातील उष्मा वाढत आहे. तर दुसऱ्याबाजूला लोकसभा निवडणूकीच्या प्रचारामुळेही राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे. त्यामुळे लोकसभा उमेदवारासाठी मतदानाचा दिवस असूनही आपले राष्ट्रीय कर्तव्य अर्थात मतदार राजा सकाळ आणि संध्याकाळच्या कमी उन्हाच्या कालावधीतच घराबाहेर पडत आहे. यापार्श्वभूमीवर काल दुपारी ३ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील आठ लोकसभा मतदारसंघात जवळपास …
Read More »प्रियंका गांधी यांचा सवाल,… तर रोजगार व महागाईची समस्या का सोडवली नाही ?
देशात आज सर्वात जास्त महागाई व बेरोजगारी आहे, केंद्र सरकारमध्ये ३० लाख सरकारी पदे रिक्त आहेत पण मोदी सरकारने ती भरली नाहीत. बेरोजगारीबरोबरच महागाई प्रचंड वाढली आहे. पेट्रोल, डिझेल,गॅस सिलिंडर, खाद्यतेल, सोने, चांदी सर्वांच्या महागाईची भेट मोदींनी दिली. शेती साहित्यावर जीएसटी लावला, सर्व बाजूंनी मोदी सरकारने जनतेला संकटात टाकले आहे.नरेंद्र …
Read More »उत्तर मध्य मुंबईतून भाजपाकडून अॅड उज्वल निकम यांना उमेदवारी
नुकतीच मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार तथा विद्यमान मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी वर्षा गायकवाड यांना खासदार म्हणून लोकसभेत पाठविणार असल्याचा शब्द दिला. त्यानंतर भाजपानंतर या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. यापार्श्वभूमीवर भाजपाने आज …
Read More »
Marathi e-Batmya