अजितदादांनी तुमच्या जीवावर महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी घेतली आहे ती आपल्याला पार पाडायची आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी वैचारिक मंथन शिबीरात केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक मंथन शिबिराची सुरुवात आज कर्जत येथे झाली. शिबीराच्या सुरुवातीला ध्वजारोहण राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हस्ते पार पडले. पुढे बोलताना सुनिल …
Read More »राज्यात एकूण ११ हजार ५०२ सोनोग्राफी केंद्र: तक्रारदारास १ लाख रुपयांचे बक्षिस
गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्यांतर्गत राज्य सल्लागार समितीची बैठक पुणे येथील सहसंचालक कार्यालयात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झाली. ही बैठक जे.जे. रुग्णालयाच्या प्रसूती व स्त्रीरोगशास्र विभागाचे प्रमुख डॉ. विलास कुरुडी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस कुटुंब कल्याण, माताबाल संगोपन व शालेय आरोग्य पुणे, आरोग्य सेवेच्या सह संचालक डॉ. बबिता …
Read More »कोंकणचा विकास हाच आमचा ध्यास ; कोका-कोला ब्रेव्हरेज कंपनी प्रकल्पाचे भूमिपूजन
कोंकण हे महाराष्ट्राचे वैभव आहे. कोंकणावर मी मनापासून प्रेम करतो. कोंकण विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी लवकरच होईल. कोंकणचा विकास हाच आमचा ध्यास आहे. कोंकणात जे आवश्यक आहे ते सर्व शासन पूर्ण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. खेड लोटे एमआयडीसी येथे हिंदुस्थान कोका-कोला ब्रेव्हरेज कंपनीच्या प्रकल्पाचे भूमिपुजन मुख्यमंत्री …
Read More »परराष्ट्र मंत्री कसा असावा, उत्तम उदाहरण असणारे हेन्ऱी किसिंजर यांचे निधन
जगातील सर्वश्रेष्ठ शक्तीमान कोण हे ठरविण्याच्या प्रयत्नात असलेल्या अमेरिका आणि तेव्हांच्या सोव्हिएत युनियन ऑफ रशियामध्ये शीतयुध्द सुरु झाले. नेमक्या त्याच कालावधीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री हेन्ऱी किसिंजर ही जोडगोळी अमेरिकेसह जगभरात आपल्या तिरकस बुध्दीमत्तेच्या आधारे अधिराज्य गाजवित होते. निक्सन यांचे सरकार वॉटरगेट प्रकरणामुळे पायउतार झाल्यानंतरही माजी …
Read More »…पंतप्रधान मोदी यांनी तीन राज्यांसोबत मुंबईतल्या वार्डातील जनतेशीही साधला संवाद
विकसित भारत संकल्प यात्रेत नागरिकांनी सहभागी होऊन याला जन आंदोलनाचे रुप द्यावे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. महिला, युवा, शेतकरी आणि गरीब हे समाजातील अमृतस्तंभ असून, यांचा विकास हाच शासनाचा ध्यास आहे. या चार वर्गाच्या विकासाद्वारे भारताचा विकास साधण्यासाठी नागरिकांनी सहभाग नोंदवून ‘विकसित …
Read More »नाना पटोले यांची खोटक टीका, …शिंदेंच्या मंत्रिमंडळ बैठकीत फक्त कोरड्या घोषणा
राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे, हे वर्ष शेतकऱ्याचे मोठे नुकसान करणारे ठरले आहे. नैसर्गिक संकटात अडकलेला शेतकरी सरकारकडे मदतीची आशा लावून बसलेला असताना भाजपा सरकार मात्र केवळ घोषणाबाजी व जाहीरातबाजी करत आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केवळ कोरड्या घोषणा करण्यात आल्या. आता मंत्री नुकसानीचा दौरा करत आहेत, हा केवळ …
Read More »Telangana Election : मतदारांना उत्साहाने मतदान करण्याचे आवाहन, जाणून घ्या, कोणत्या जागा विशेष !
Telangana Election : ११९ सदस्यीय तेलंगणा विधानसभेसाठी गुरुवारी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. निवडणूक लढवणाऱ्या २२९० उमेदवारांचे भवितव्य तीन कोटी २६ लाख मतदार ठरवणार आहेत. यासाठी ३५,६५५ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. या निवडणुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये मतदारांना उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले – …
Read More »शेती महामंडळाच्या जमिनीबाबत आणि मुद्रांक शुल्काबाबत मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बैठक
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जसजशी जवळजवळ येत चालली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटाच्या आमदार अपात्रतेची सुनावणीची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंतिम तारीख जसजशी जवळ जवळ येत आहे. तसतशी राज्य मंत्रिमंडळाकडून महत्वाच्या विषयावर निर्णय घेत लोकोपयोगी निर्णय घेण्यात येत असल्याचा सपाटाच विद्यमान राज्य मंत्रिमंडळाकडून …
Read More »राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान शाळांचे मूल्यांकन करणार
शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे म्हणून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळांचा समावेश करण्यात आला …
Read More »अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढवून ५०० कोटी इतकी करण्याच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या ३० कोटी इतकी शासन हमी देण्यात येते. या शासन हमीचा कालावधी ८ वर्षाचा राहील. या महामंडळाकडून मुदतकर्ज तसेच डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम …
Read More »
Marathi e-Batmya