Breaking News

एसटी महामंडळ कृती समितीची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक उच्चाधिकार समितीने बैठक घेऊन आठवडाभरात अहवाल सादर करावा

राज्य परिवहन महामंडळातील कामगार संघटनांच्या कृती समितीने ९ ऑगस्ट पासून पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीची बैठक झाली. समितीच्या मागण्यांच्या अनुषंगाने उच्चाधिकारी समितीने बैठक घेऊन त्याचा अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी राज्य शासन अजून दोन हजार नविन बसेस घेण्याबाबत सकारात्मक …

Read More »

नाना पटोले यांची टीका, महाराष्ट्र गुजरातला विकण्याचे पाप… मविआ हाच विधानसभा निवडणुकीत चेहरा

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला धक्का दिला आहे. स्वयंघोषित विश्वगुरु यांनीही राज्यात १७ जाहीर सभा घेतल्या परंतु जनतेने त्यांना जागा दाखवली आहे. जनता विसरून जाते असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत पण महाराष्ट्र गुजरातला विकण्याचे महायुती सरकारचे पाप महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता विसरलेली नाही. जनतेच्या विश्वास घाताची किंमत महायुतीला विधानसभा निवडणुकीतही …

Read More »

अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला शरदचंद्र पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रेचे प्रत्युत्तर जयंत पाटील, अमोल कोल्हे यांनी केली शिवस्वराज्य यात्रेची घोषणा

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकिय पक्षांकडून विविध क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. आता त्यातच अजित पवार यांच्या महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जनसन्मान यात्रेची घोषणा केली असून या यात्रेची सुरुवात ८ ऑगस्टपासून नाशिकमधील दिंडोरी येथून होणार आहे. ३९ विधानसभा मतदारसंघातून प्रवास करणार आहे. अजित पवार यांच्या पक्षाकडून …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे प्रमुख घेतले निर्णय १३ विषयावर घेतला निर्णय

विधानसभा निवडूकांना कालावधी जसजसा जवळ येत चालला आहे, तसा राज्य सरकारकडून राज्यातील विविध घटकांना आणि खुष करण्याचा आणि केंद्राच्या धोरणाप्रमाणे निर्णय घेण्याचा सपाटाचा राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये सिंचनाचा निर्णय, प्रकल्प बाधितांना सदनिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय, लहान शहरातील विकास प्रकल्पांसाठी कर्ज उभारणीस …

Read More »

महाराष्ट्र लॉजिस्टीकमधून पाच वर्षात तीस हजार कोटींचे उत्पन्न मिळणार राज्यात लॉजिस्टिक धोरण राबविणार

महाराष्ट्र लॉजिस्टीक धोरण-२०२४ ला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्य आर्थिक सल्लागार परिषदेने केलेल्या शिफारसीनुसार लॉजिस्टीक धोरण तयार करण्यात आले आहे. हे धोरण पुढील १० वर्षातील विकासाला समोर ठेऊन तयार करण्यात आले आहे. या धोरणामुळे राज्यात सुमारे ५ लाख इतकी प्रत्यक्ष व …

Read More »

विना परवानगी झाड तोडाल तर आता ५० हजार रूपये भरावे लागणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

विना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार दंड वसूल करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या १ हजार रुपये दंडाची तरतूद आहे. दंडाशिवाय अशारितीने तोडलेले कोणतेही झाड आणि ते वाहून नेण्यासाठी वापरलेली हत्त्यारे, नौका, वाहने सरकार जमा करण्यात येतील. या संदर्भातील दुरुस्ती …

Read More »

भाजपाचा हर घर तिरंगा अभियान कार्यक्रम राज्य सरकार राबविणार ९ ऑगस्टपासून राज्यात राबवित अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार

काही दिवसांपूर्वी भाजपाच्या आमदार आणि हर घर तिरंगा अभियांच्या संयोजिका उमा खापरे यांनी भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपाकडून स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा राबविणार असल्याचे सांगत या अभियानाची सुरुवात ९ ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार असल्याचे जाहिर केले होते. तसेच राज्यातील किमान १ कोटी नागरिकांच्या घरावर तिरंगा झेडा …

Read More »

आशिष शेलार यांचा सवाल, काँग्रेसवाल्यांची भांडी घासायला उध्दव ठाकरे दिल्लीत आरक्षणासाठी गेले नाहीत तर मला मुख्यमंत्री करा हे सांगायला गेलेत

उध्दव ठाकरे हे दिल्लीला महाराष्ट्राच्या शेतकरी, महिला, तरुण अथवा मराठा आरक्षण या विषयासाठी गेलेले नाहीत तर मला मुख्यमंत्री करा हे काँग्रेसला सांगायला गेलेत. ते दिल्लीत काँग्रेसवाल्यांची भांडी घासायला गेलेत, असा थेट आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात आमदार अॅड आशिष शेलार …

Read More »

अल्पसंख्यांक बांधवांच्या विकासासाठी बार्टीच्या धर्तीवर मार्टी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांना यश

राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी टार्टी’, ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’, ‘अमृत’च्या धर्तीवर ‘अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे ‘एमआरटीआय’ची स्थापना करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने आज घेतलेला निर्णय म्हणजे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांचे यश असल्याचे सांगत राज्यातील अनेक मुस्लिम तसेच अल्पसंख्यांक बांधवांच्या संस्था, संघटनांनी …

Read More »

राज्यसभेच्या १२ रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर उदयनराजे भोसले, पियुष गोयल यांच्या महाराष्ट्रातील जागांसाठी मतदान

देशभरातील विविध राज्यातून रिक्त होणाऱ्या १२ राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले हे लोकसभेवर निवडूण गेल्याने राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे ही मुंबईतून लोकसभेवर निवडूण गेल्याने त्यांचीही राज्यसभेतील जागा रिक्त झाली आहे. या रिक्त झालेल्या …

Read More »