Breaking News

अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) ची स्थापना राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून शासन निर्णय जारी

राज्यातील मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय असा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थेच्या धर्तीवर मातंग समाजासाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था(आर्टी) संस्था कंपनी नोंदणी कायदा, २०१३ अंतर्गत नियम ८ नुसार स्थापन करण्यास मान्यता …

Read More »

नाना पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, विशाळगडावर दंगली घडवण्याचे षडयंत्र… गजापूर दंगलीला वेगळा रंग देण्याचा गृहमंत्र्यांचा प्रयत्न; गृहमंत्र्यांचे विधान दंगेखोरांना पाठबळ देणारे

राजर्षी शाहू महाराज यांनी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन राज्य केले म्हणूनच त्यांना लोकराजे म्हणतात पण त्यांच्याच करवीर नगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप केले जात आहे आणि तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे अत्यंत दुर्देवी आणि चिंताजनक आहे. विशाळगड हिंसाचाराचे प्रकरण हे महाराष्ट्राला काळीमा फासणारे आहे. विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली गजापूर गावात …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, बहिणीबरोबर लाडक्या भावासाठीही योजना तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध

आषाढी एकादशी निमित्त राज्यातील लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले असून पंढरपूर नगरी भक्ती रसात न्हाऊन निघाली आहे. वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि पंढरपूर तीर्थ क्षेत्र सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देत राज्यातील बहिणीसाठी जाहिर करण्यात आलेल्या योजनेसोबतच राज्यातील लाडक्या …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, सरकारमधील दोघेजण काय बोलत होते आम्हाला माहित नाही अजित पवार यांच्या पक्ष प्रवेशाबाबत आधी सहकाऱ्यांशी बोलू

राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा समाजाकडून आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलन सुरु आहे. तर दुसऱ्याबाजूला ओबीसी समाजाकडून आंदोलन सुरु आहे. या दोन्ही आंदोलकांशी राज्य सरकारमधील एक बाजू मराठा आंदोलकांशी चर्चा करत होत. तर सरकारमधील दूसरी बाजू असलेले काही मंत्री ओबीसी समाजातील लोकांशी संवाद साधत होते. सरकारमधील या दोन्ही बाजूंनी कोणी काय आश्वासन …

Read More »

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल मुंबईत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन रणनिती ठरवणार

राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाला व महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत असेच यश मिळावून राज्यात काँग्रेस विचाराचे सरकार आणण्यासाठी प्रदेश काँग्रेसने तयारी सुरु केली असून या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल व महाराष्ट्र प्रभारी रमेश …

Read More »

एडीस डासांद्वारे होणारा झिका विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हे नियम पाळा आरोग्य विभागाची प्रशासनाची यंत्रणा सज्ज

झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. झिका विषाणू हा मुख्यत्: एडीस डासांद्वारे प्रसारीत होणाऱ्या विषाणूमुळे होतो. हा डास दिवसा चावत असतो. या विषाणूच्या प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असून एकात्मिक किटक व्यवस्थापन अंतर्गत एडीस डास प्रतिबंधात्मक उपाय योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये जलद ताप सर्वेक्षण …

Read More »

मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालय चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरू परिवहन विभागाकडून प्रसिध्दी पत्रकान्वये माहिती

प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे चारचाकी संवर्गातील खाजगी परिवहनेत्तर वाहनांकरीता असलेली MH-01-EN ही मालिका संपुष्टात येत आहे. त्यामुळे या संवर्गातील वाहनांसाठी MH-01-ER ही आगाऊ स्वरूपात असलेली मालिका नियमित होईल. या नोंदणी क्रमाकांच्या मालिकेतील वाहन क्रमांक चारचाकी संवर्गातील परिवहनेत्तर वाहनांकरीता आरक्षीत करण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियमांतर्गत विहीत …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे विठ्ठलाला साकडे, राज्यात उत्तम पाऊस पडू दे आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा संपन्न झाली. यंदा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई बाळूPandh अहिरे यांना मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेला बसण्याचा मान मिळाला. त्यांच्यासोबत पूजा करणे हे आपले सौभाग्य असल्याचे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी या …

Read More »

२० लाख लीटर दुधाचे संकलन केले तरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ३५ रूपये देणे शक्य पशु व दुग्धविकास मंत्री विखे-पाटील यांची माहिती

राज्‍यातील अतिरिक्‍त दूधाचा प्रश्‍न सोडविण्‍यासाठी अमुल उद्योग समुहासह इतरही प्रक्रिया केंद्रानी अतिरिक्‍त २० लाख लिटर दूधाचे संकलन करावे असे आवाहन दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले आहे. या प्रक्रीया केंद्रानी सहकार्य केल्‍यास राज्‍यातील दूध उत्‍पादकांना ३५ रुपये भाव देणे शक्‍य होईल असा विश्‍वासही व्‍यक्‍त केला. राज्‍य सरकारने …

Read More »

अर्थसंकल्पात ४५ दिवसांच्या आत वेतन नियमात बदल करू शकणार नाही २००६ च्या कायद्यातील बदलामुळे अडचण

केंद्रीय अर्थसंकल्प आयकर कायद्यातील ४५-दिवसांच्या वेतन नियमात कोणताही बदल करू शकत नाही कारण सरकारने कंपनी कायदा आदेशात सुधारणा केली आहे आणि सूक्ष्म आणि लघु उद्योग पुरवठादारांना देय देण्यास विलंब झाल्याबद्दल कंपन्यांकडून अहवाल देण्यासाठी नवीन फॉर्म अधिसूचित केला आहे. मोठ्या कंपन्यांच्या अनुपालनाच्या ओझ्यावर हा बदल कसा परिणाम करेल यावर कर आणि …

Read More »