काही दिवसांपूर्वी मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात कधी दाखल होणार अशी विचारणा सातत्याने करण्यात येत होती. यापार्श्वभूमीवर पुणे हवामान वेधशाळेने अंदाज व्यक्त केला असून आगामी दोन दिवसात मान्सून दाखल होण्यास वातावरणीय परिस्थिती अनुकूल आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील ३ ते ४ तासात पावसाचे आमगन होणार असल्याचा इशारा पुणे …
Read More »देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारली, राजीनामा स्विकारा पक्षात काम करण्याची पूर्ण मोकळी द्यावी केंद्रातल्या नेत्यांना भेटून सांगणार
लोकसभा निवडणूकीची मतमोजणी नुकतीच झाली. या निकालात महाराष्ट्रातील लोकसभेच्या २३ जागांवर असलेली भाजपा अवघ्या ९ जागांवर आली. या पार्श्वभूमीवर या पराभवाची जबाबदारी स्विकारत भाजपा नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाला मिळालेल्या कमी जागांची जबाबदारी स्विकारत राजीनामा स्विकारण्याबाबात केंद्रीय नेतृत्वाला सांगणार असल्याचे सांगत पूर्ण वेळ पक्षाचे काम करण्यासाठीची जबाबदारी …
Read More »आता या बँकांचे आयपीओ बाजारात येणार १० टक्के भागीदारी कमी करण्यासाठी संचालक बोर्डांची मंजूरी
पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) बोर्डाने मंगळवारी त्याच्या सहयोगी कंपनी कॅनरा HSBC लाइफ इन्शुरन्समधील १० टक्के शेअरहोल्डिंग इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) मार्गाने विकण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता दिली. सध्या, कॅनरा HSBC लाईफ इन्शुरन्समध्ये पंजाब नॅशनल बँक PNB ची २३ टक्के हिस्सेदारी आहे. “बोर्डाने आज झालेल्या बैठकीत, म्हणजे ०४-०६-२०२४ मध्ये कंपनीला सूचीबद्ध …
Read More »निवडणूक निकालाने केंद्र सरकारच्या पीएसयु कंपन्यांनाही बसला फटका अनेक सरकारी कंपन्याचे शेअर्स घसरले
मंगळवारी निवडणूक निकालांभोवती अनिश्चिततेचा फटका सरकारी मालकीच्या कंपन्यांच्या समभागांना बसला कारण मतमोजणीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला एक्झिट पोलच्या अंदाजांच्या तुलनेत कमी विजयाचे अंतर दिसून आले. बीएसई पीएसयू निर्देशांक ३,५२६.८६ अंक किंवा १५.६८% ची घसरत १८,९६४.६३ अंकांवर बंद झाला, आरईसी २५% पेक्षा जास्त घसरत ४५२.५० वर बंद झाला, त्यानंतर पॉवर फायनान्स …
Read More »एक्झिट पोलचे अंदाज आणि प्रत्यक्ष मतमोजणीतील निकालाचा परिणाम शेअर बाजारावर भाजपाबाबत अपेक्षा वाढवून ठेवल्याने शेअर बाजार ६ हजार अंशाने गडगडला
बीएसई सेन्सेक्सने त्याची घसरण ६,१०० अंकांपर्यंत वाढवल्याने शेअर बाजारातील गुंतवणूकदार खचले आहेत. गुंतवणूकदारांना भीती वाटते की भाजपा २७२ चे स्पष्ट बहुमत मिळवण्यात अपयशी ठरू शकते आणि एनडीएच्या मित्रपक्षांसोबत सत्तेत आल्यास राजकीय प्रभाव सोडावा लागेल. टीम NDA सध्या २९७ जागांसह आघाडीवर आहे, ३५०-अधिक जागा जिंकण्यापेक्षा खूपच कमी, काही प्रकरणांमध्ये ४००-अधिक, एका …
Read More »निवडणूकीच्या मतमोजणीतून बेरोजगारी आणि वाढीव वेतनाचा प्रश्न ऐरणीवर उद्योजकांकडून सरकारच्या धोरणाचे मुल्यांकन करण्याची वेळ
लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली आणि निवडणूकीचा अंदाज व्यक्त केलेल्या एक्झिट पोल पेक्षा वेगळेच निकाल हाती यायला लागल्यामुळे नेहमीच्या व्यवसाय बैठकींपासून विचलित झालेले, अनेक व्यावसायिक एकतर टेलिव्हिजन समोर बसून होते किंवा मतमोजणीच्या ट्रेंडचा मागोवा घेत त्यांच्या मोबाईल फोनमध्ये डोकावत होते. अनेकांना, नाव सांगण्याची इच्छा नसताना, त्यांना चिंता आणि …
Read More »बीडात तणावः ईशान्य मुंबईत वायकर आणि किर्तीकर यांच्यात चुरसीची लढत अखेर रविंद्र वायकर १ मतांनी विजयी
लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून बीड लोकसभा मतदारसंघात कधी भाजपाच्या पंकजा मुंडे या पुढे तर कधी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे पुढे असे चित्र पाह्यला मिळत होते. तर अशीच काहीशी परिस्थिती ईशान्य मुंबईत शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर आणि शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर …
Read More »राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी अधिसूचना जारी १३ जून पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार
राज्यसभेचे सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून एका सदस्याची निवडणूक घेण्यासाठीची सूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयामार्फत जारी करण्यात आली आहे. यानुसार उमेदवार अथवा त्याच्या सूचकाला १३ जून पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार असून निवडणूक लढविली गेल्यास २५ जून २०२४ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांचा सवाल, स्ट्रॅटेजी कशी जाहिर करणार आम्ही उद्या सर्वांशी चर्चा करून निर्णय जाहीर करू
लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात होणार असल्याच्या एक दिवस आधी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीत चर्चा करून एक्झिट पोलचे आकडे खोटे असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला. तसेच २९३ जागा इंडिया आघाडीला मिळणार असल्याची घोषणाही त्यावेळी करण्यात आली. मात्र आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर त्यानंतर भाजपा प्रणित एनडीला मिळालेल्या लोकसभेच्या जागा आणि …
Read More »नाना पटोले यांचा टीका,… जनतेने अहंकारी, तानाशाही व्यवस्थेला धडा शिकवला राहुल गांधींच्या पदयात्रेने देशातील चित्र बदलले, ‘हम करे सो कायदा’ वृत्तीला चोख उत्तर मिळाले
लोकशाहीमध्ये जनता हीच सर्वश्रेष्ठ असते. जनतेपेक्षा कोणीही मोठा नाही, जे लोक स्वतःला सर्वात मोठे मानत होते, ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने वागत होते, अशा प्रवृत्तीला जनतेने लोकसभा निवडणुकीत चांगलाच धडा शिकवला आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले असून देशात परिवर्तनाचा संदेशही महाराष्ट्रानेच दिला आहे. केंद्रातील १० …
Read More »
Marathi e-Batmya