बंद पडलेल्या कंपन्यांच्या जमिनी विकून कामगारांची देणी द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील अनेक भागात लहान-मोठ्या कंपन्या बंद पडत आहेत. मात्र या कंपन्यांमध्ये काम करत असलेल्या कामगारांना त्यांच्या पगारी व अन्य देणी अद्याप मिळात नाहीत. त्यामुळे अशा बंद पडलेल्या कंपन्यांच्या जमिनी विकून कामगारांची थकीत देणी देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपसरचिटणीस अमर देशमुख यांनी राज्य सरकारकडे एका निवेदनाद्वारे केली.
आर्थिक मंदीमुळे अनेक कंपन्यांना आर्थिक फटका बसत आहे. तसेच यातील अनेक कंपन्यांना टाळे लागत आहे. त्यामुळे या बंद पडत असलेल्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. कामगारांचे अधिकचे नुकसान होवू नये यासाठी सरकारने पुढाकार घेत बंद पडलेल्या कंपन्यांच्या जमिनी विकून कामगारांची देणी द्यावीत आणि त्या जमिनी गरजू उद्योजकाला उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली.

About Editor

Check Also

आरबीआयचा अहवाल म्हणतो, देशातून बाहेर जाणाऱ्या डॉलरचे प्रमाण जास्त येणाऱ्या डॉलर्सपेक्षा ३०.८ अब्ज डॉलर्सने जास्त जाणारी रक्कम

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अर्थात आरबीआय (RBI) ताज्या आकडेवारीवरून हे दिसून येते की, देशातून बाहेर जाणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *