बंद पडलेल्या कंपन्यांच्या जमिनी विकून कामगारांची देणी द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील अनेक भागात लहान-मोठ्या कंपन्या बंद पडत आहेत. मात्र या कंपन्यांमध्ये काम करत असलेल्या कामगारांना त्यांच्या पगारी व अन्य देणी अद्याप मिळात नाहीत. त्यामुळे अशा बंद पडलेल्या कंपन्यांच्या जमिनी विकून कामगारांची थकीत देणी देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपसरचिटणीस अमर देशमुख यांनी राज्य सरकारकडे एका निवेदनाद्वारे केली.
आर्थिक मंदीमुळे अनेक कंपन्यांना आर्थिक फटका बसत आहे. तसेच यातील अनेक कंपन्यांना टाळे लागत आहे. त्यामुळे या बंद पडत असलेल्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. कामगारांचे अधिकचे नुकसान होवू नये यासाठी सरकारने पुढाकार घेत बंद पडलेल्या कंपन्यांच्या जमिनी विकून कामगारांची देणी द्यावीत आणि त्या जमिनी गरजू उद्योजकाला उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, यूएई आणि भारतामधील बँकिंग भागीदारी भारतीय अर्थव्यवस्थेच्या उत्कर्षाचे प्रतीक केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांचा दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सहभाग

जगभरातील गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेतील विश्वास वाढत आहे. त्यामुळेच अरबी समुद्राच्या दोन्ही टोकांवरील मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *