भारत जपानपेक्षा मोठी अर्थव्यवस्था बनणार एस अँड पी ग्लोबलचा दावा

गेल्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेने अनेक मोठे टप्पे गाठले आहेत आणि सध्या ती जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. भारत हे जागतिक अर्थव्यवस्थेचे सुवर्ण केंद्र मानले जात आहे. एस अँड पी ग्लोबल मार्केटने असा दावा केला आहे की अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत लवकरच जपानला मागे टाकेल आणि २०३० पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.

एका अहवालानुसार, एस अँड पी ग्लोबल मार्केटने अंदाज लावला आहे की २०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ७.३ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल आणि ती जपानला मागे टाकून आशिया क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनेल.

एस अँड पी ग्लोबल मार्केटने आपल्या अहवालात म्हटले की, २०२१ आणि २०२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग खूप मजबूत होता. भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) आर्थिक वर्ष २०२४ पर्यंत ६.२ टक्के ते ६.३ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत जागतिक स्तरावर भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत येतो. त्याच वेळी, एप्रिल ते जून या तिमाहीत भारताचा जीडीपी ७.८ टक्के होता. गेल्या काही वर्षांत देशात परदेशी गुंतवणूक वाढली आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत त्याचा परिणाम आता अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहे.

या अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की, जपान व्यतिरिक्त भारत २०३० पर्यंत जर्मनीलाही मागे टाकेल. सध्याच्या काळात भारताचा जीडीपी २०२२ मध्ये ३.५ ट्रिलियन डॉलर आहे जो २०३० पर्यंत वाढून ७.३ ट्रिलियन डॉलर होईल. या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेतील तेजीसाठी वाढत्या देशांतर्गत मागणीला जबाबदार धरण्यात आले आहे.

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेचा जीडीपी २५.५ ट्रिलियन डॉलर आहे. तर १८ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसह चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. जपान आणि जर्मनीच्या अर्थव्यवस्था ४.२ आणि ४ ट्रिलियन डॉलर्स आहेत.

About Editor

Check Also

कच्च्या तेलाच्या प्रति बॅरल किंमतीत वाढ मात्र बाजार २५०० अंशाने घसरला निफ्टी बाजारही घसरणीला

तेलाच्या किमती वाढल्याने आणि एचडीएफसी बँकेबद्दलच्या चिंतेमुळे गुंतवणूकदार अस्वस्थ झाल्याने, गुरुवारी दलाल स्ट्रीटवर विक्रीची नवी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *