मुंबई: प्रतिनिधी कोरोनासंदर्भांत शासन व्यापक प्रमाणात जनजागृती करीत असतांना विविध वस्तुंची निर्मिती करणारे काही उत्पादक आणि जाहिरातदार विशिष्ट प्रकारच्या गादीचा/सोफ्याचा वापर केल्यास किंवा विशिष्ट आयुर्वेदिक औषधांचे सेवन केल्यास कोरोनाचा प्रादूर्भाव होणार नसल्याच्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणाऱ्या उत्पादकांवर आणि जाहिरातदारांवर व जाहिरात प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांवर अन्न व औषध …
Read More »खबरदार, मास्क, सँनिटायझरची साठेबाजी आणि काळाबाजार कराल तर जीवनाश्वक कायद्याखाली कारवाईचा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा
मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे केंद्र सरकारच्या १३ मार्च, २०२० च्या अधिसूचनेन्वये जीवनावश्यक वस्तु अधिनियम, १९५५ च्या परिशिष्टामध्ये कलम २ ए अंतर्गत ‘मास्क (२ प्लाई व ३ प्लाई सर्जिकल मास्क, एन-९५ मास्क) व हँन्ड सॅनेटाइझर यांचा समावेश जीवनावश्यक वस्तू म्हणून करण्यात आला आहे. या दोन वस्तुंचा काळाबाजार व …
Read More »शासकिय कार्यालयांचे कमी संख्येत कामकाज चालविण्याचा विचार करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांची मदत आवश्यक मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील कोरोना आजाराच्या अनुषंगाने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला. मात्र परिस्थिती नियंत्रणात असली तरी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने सरकारी कार्यालयात कमी उपस्थितीत कामकाज चालविण्याचा विचार सुरु असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत या आजाराचा सामना करण्यासाठी नागरिकांच्या मदतीशिवाय शक्य होणार नसल्याने नागरीकांनी गरज असेल तरच बाहेर …
Read More »मंत्रालयात प्रवेश बंदी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तीन महिन्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला बैठकीत निर्णय
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयात उद्यापासून सर्वसामान्य नागरीकांना प्रवेश बंदी करण्यात आली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज झालेल्या आढावा …
Read More »राज्यातील सर्व खाजगी-सरकारी शाळा, प्रशिक्षण केंद्रे ३१ मार्चपर्यंत बंद आरोग्य विभागाकडून आदेश जारी
मुंबईः विशेष प्रतिनिधी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि शालेय, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे या हेतूने राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि पंचायत क्षेत्रातील सर्व शासकिय आणि खाजगी शाळा, प्रशिक्षण केंद्रे ३१ मार्च अखेर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने एका परिपत्रकान्वये जारी केले. मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूपासून आजारी पडणाऱ्या संख्येत …
Read More »कोरोनाला रोखण्यासाठी चित्रपटगृहे, जीम, जलतरण तलाव अखेर बंद मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची घोषणा
मुंबईः विशेष प्रतिनिधी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि नागपूर येथे कोरोना व्हायरसचे रूग्ण आढळून आले आहेत. या आजाराला रोखण्यासाठी या पाच जिल्ह्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जीम, जलतरण तलाव आदी बंद करण्याचा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत यासंदर्भात निवेदन वाचून दाखवित याविषयीचा …
Read More »इटलीत मुंबईसह कोल्हापूर, सांगलीतील ४६ जण अडकले परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून परत आणण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी
मुंबईः विशेष प्रतिनिधी करोना व्हायरसमुळे इटलीतील रोम येथे १०२ भारतीय अडकले असून यात महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली येथील ४४ तर मुंबईतील २ दोघांचा समावेश आहे. या नागरीकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने केंद्राशी संपर्क साधून वैद्यकीय पथक पाठवून परत आणावी अशी मागणी काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. विधानसभेत …
Read More »कोरोनापासून बचाव करायचाय तर हात मिळवू नका, हात स्वच्छ धुवा मुख्यमंत्री, आरोग्य सचिव प्रदीव व्यास, आयुक्त परदेशींची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्यात करोनाचा एकही रूग्ण आढळून आला नाही. तसेच या आजाराचा सामना करण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य विभागाकडून पुरेशी खबरदारी घेण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. या आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, हात स्वच्छ धुवणे, हात मिळविण्याचे टाळावे, कोणाशीही बोलताना किमान तीन फुटाचे अंतर …
Read More »कोरोनाची भीती नका बाळगू मुख्यमंत्री ठाकरेंचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुरेशी खबरदारी घेतली आहे. नागरिकांनी भयभीत होवू नये. असे आश्वस्त करतानाच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका, होळी साजरी करताना तिचे स्वरुप मर्यादित ठेवा. मुंबई पाठोपाठ पुणे, नागपूर येथील विमानतळांवर थर्मल स्कॅनिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये येणाऱ्या परदेशी नागरिकांची तपासणी करण्याचे निर्देश …
Read More »हत्तीरोगाचे २०२१ पर्यंत उच्चाटन करा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे निर्देश
मुंबई: प्रतिनिधी हत्तीरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी २ मार्च ते २० मार्च २०२० पर्यंत नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नांदेड, या ६ जिल्ह्यात मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची व्यापकता लक्षात घेऊन कालमर्यादा वाढवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीच्या माध्यमातून अंतरविभागीय समन्वय पर्यवेक्षण व जनजागृती वर भर द्यावा. सर्व …
Read More »
Marathi e-Batmya