रेशन कार्ड नसलेल्या गरजूनाच अन्नधान्याचे किट द्या मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे परराज्यातील, राज्यांतर्गंत परजिल्ह्यातील कामगार-नागरीकांसमोर अन्नधान्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर काही स्वंयसेवी संस्थांनी अन्नधन्नाची पाकिटे वाटप करण्यास सुरुवात केली असून ही पाकिटे रेशन कार्ड नसलेल्या गरजू नागरीकांनाच द्यावी असे आदेश मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाने दिले.

विशेष म्हणजे या अन्नाची पाकिटे वाटताना रेशन दुकानात नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत वाटप करण्याच्या सूचनाही देण्यात आली असून या वाटपाच्या सर्व नोंदी मुंबई महापालिका आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयास पाठवून द्यावी असे आदेशही बजाविण्यात आलेत.

त्यासाठी प्रभागनिहाय गरजूंची संख्या पाहून त्या त्या भागत वाटप करावे अशी सूचना करत हि अन्नधान्याचे किट फक्त गरजू ज्यांच्याकडे शिधापत्रिका अर्थात रेशन कार्ड नाही त्यांनाच वाटप करण्याचे आदेश दिले आहेत

.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची ग्वाही, आरे परिसरात भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी जंगल निर्माण करणार आरे परिसरात ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘हरित महाराष्ट्र – ३०० कोटी वृक्षारोपण’ मोहिमेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *